शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

वसईला सूर्याचे १०० एमएलडी!

By admin | Updated: January 1, 2017 03:53 IST

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या सूर्या पाणी योजनेने आता गती घेतली असून येत्या तीन महिन्यात वसई विरारला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे

- शशी करपे,  वसईअनेक अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या सूर्या पाणी योजनेने आता गती घेतली असून येत्या तीन महिन्यात वसई विरारला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षापासून वसईकरांची तीव्र पाणी टंचाई दूर होणार आहे. वसईकरांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी १०० एमएलडी सूर्या पाणी पुरवठा योजनेला मंजूरी मिळाली होती. २०१४ मध्ये योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेतून १ मार्च २०१५ पर्यंत १०० एमएलडी पाणी पुरवठा सुरु होणार होता. याच प्रश्नावर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने वसई विरार महापालिकेत पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता हस्तगत केली होती. परंतु वनखात्याने खोडा घातल्यानंतर ही योजना रखडून पडली होती. महापालिका निवडणुकीनंतर सहा महिन्या पाणी आणू, अशी घोषणा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने केली खरी पण, दीडवर्षे उलटून गेल्यानंतरही पाणी पुरवठा सुुरु न झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुुरुवात केली होती. मात्र, नव्या वर्षात या योजनेच्या कामाला गती देऊन येत्या तीन महिन्यात पाणी पुरवठा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही योजना तीनशे कोटींची आहे. मात्र, कामाला सुरुवात झाल्यापासून अनेक अडथळे येऊ लागले आहेत. या योजनेतील जलवाहिन्या वनखात्याच्या १९ किलोमीटरच्या जागेतून जाणार आहेत. याठिकाणी ११०० झाडे असल्याने वनखात्याने आक्षेप घेतला होता. महापालिका प्रशासनाने प्रयत्न करून वनखात्याला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे पर्यायी जमीन मिळवून दिली. त्यानंतर वनखात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यातच यातील काही क्षेत्र संरक्षित वने अंतर्गत राखीव असल्याने हरित लवादाने त्याला आक्षेप घेतल्याने काम पुन्हा रखडून पडले होते. यातील याचिकाकर्त्या शोभा फडणवीस यांना लवादाने पक्षकार म्हणून घेतले होते. लवादाने सुनावणी घेतल्यानंतर वनखात्याला ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंत्रालयात प्रमाणपत्र सादर झाल्यानंतर लवादाने कामाला हिरवा कंदील दाखवला होता. वनखात्याने पोलादपूरच्या १५ एकर जागेचा सातबारा नावावर झाल्याशिवाय या मार्गातील झाडे कापणार नाही, अशी भूमिका घेतली १५ एकर जागेपैकी काही जागेचा सातबारा वनखात्याच्या नावावर झाला आहे. उर्वरित सातबारा येत्या दोन-तीन दिवसात नावावर होणार असल्याची माहिती शहर अभियंत्यांनी दिली.११०० झाडे कापण्यासाठी महापालिकेने वनखात्याकडे १ कोटी रुपये यापूर्वीच जमा केले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सातबारा नावावर झाल्यानंतर वनखात्याकडून झाडे कापण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर त्याजागेतून जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात होणार आहे. वाहिन्या टाकण्याचे काम दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे येत्या तीन महिन्यात वसईकरांना आणखी १००एमएलडी पाणी पुरवठा सुरु होईल. सध्या वसईकरांना सूर्या योजनेतून १०० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंंड धरणातून १ एमएलडी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. त्यात आता आणखी १०० एमएलडी पाण्याची भर पडणार आहे. अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी दिली.