शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वसईला सूर्याचे १०० एमएलडी!

By admin | Updated: January 1, 2017 03:53 IST

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या सूर्या पाणी योजनेने आता गती घेतली असून येत्या तीन महिन्यात वसई विरारला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे

- शशी करपे,  वसईअनेक अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या सूर्या पाणी योजनेने आता गती घेतली असून येत्या तीन महिन्यात वसई विरारला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षापासून वसईकरांची तीव्र पाणी टंचाई दूर होणार आहे. वसईकरांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी १०० एमएलडी सूर्या पाणी पुरवठा योजनेला मंजूरी मिळाली होती. २०१४ मध्ये योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेतून १ मार्च २०१५ पर्यंत १०० एमएलडी पाणी पुरवठा सुरु होणार होता. याच प्रश्नावर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने वसई विरार महापालिकेत पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता हस्तगत केली होती. परंतु वनखात्याने खोडा घातल्यानंतर ही योजना रखडून पडली होती. महापालिका निवडणुकीनंतर सहा महिन्या पाणी आणू, अशी घोषणा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने केली खरी पण, दीडवर्षे उलटून गेल्यानंतरही पाणी पुरवठा सुुरु न झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुुरुवात केली होती. मात्र, नव्या वर्षात या योजनेच्या कामाला गती देऊन येत्या तीन महिन्यात पाणी पुरवठा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही योजना तीनशे कोटींची आहे. मात्र, कामाला सुरुवात झाल्यापासून अनेक अडथळे येऊ लागले आहेत. या योजनेतील जलवाहिन्या वनखात्याच्या १९ किलोमीटरच्या जागेतून जाणार आहेत. याठिकाणी ११०० झाडे असल्याने वनखात्याने आक्षेप घेतला होता. महापालिका प्रशासनाने प्रयत्न करून वनखात्याला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे पर्यायी जमीन मिळवून दिली. त्यानंतर वनखात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यातच यातील काही क्षेत्र संरक्षित वने अंतर्गत राखीव असल्याने हरित लवादाने त्याला आक्षेप घेतल्याने काम पुन्हा रखडून पडले होते. यातील याचिकाकर्त्या शोभा फडणवीस यांना लवादाने पक्षकार म्हणून घेतले होते. लवादाने सुनावणी घेतल्यानंतर वनखात्याला ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंत्रालयात प्रमाणपत्र सादर झाल्यानंतर लवादाने कामाला हिरवा कंदील दाखवला होता. वनखात्याने पोलादपूरच्या १५ एकर जागेचा सातबारा नावावर झाल्याशिवाय या मार्गातील झाडे कापणार नाही, अशी भूमिका घेतली १५ एकर जागेपैकी काही जागेचा सातबारा वनखात्याच्या नावावर झाला आहे. उर्वरित सातबारा येत्या दोन-तीन दिवसात नावावर होणार असल्याची माहिती शहर अभियंत्यांनी दिली.११०० झाडे कापण्यासाठी महापालिकेने वनखात्याकडे १ कोटी रुपये यापूर्वीच जमा केले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सातबारा नावावर झाल्यानंतर वनखात्याकडून झाडे कापण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर त्याजागेतून जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात होणार आहे. वाहिन्या टाकण्याचे काम दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे येत्या तीन महिन्यात वसईकरांना आणखी १००एमएलडी पाणी पुरवठा सुरु होईल. सध्या वसईकरांना सूर्या योजनेतून १०० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंंड धरणातून १ एमएलडी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. त्यात आता आणखी १०० एमएलडी पाण्याची भर पडणार आहे. अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी दिली.