शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
IPL 2025: आता मी लहान मुलाप्रमाणे झोप घेईन... पहिली IPL ट्रॉफी अन् 'विराट' सुख
3
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
4
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
5
IPL 2025 : ऑरेंज-पर्पल कॅप GT कडे! MI च्या ताफ्यातील सूर्यालाही मिळाला मोठा पुरस्कार, इथं पाहा संपूर्ण यादी
6
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
7
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
8
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
9
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
10
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
11
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
12
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
13
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
14
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
15
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
16
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
17
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
18
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
19
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट

सेल्फीवेड्या तरुणाईसाठी वसईत जनजागृती मोहीम

By admin | Updated: July 3, 2017 05:54 IST

आजच्या मोबाईल युगात सेल्फी वेडी तरुणाई कुठेही कसलेही भान न बाळगता जीवाला धोका पत्करून सेल्फी काढण्यात दंग होतात

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : आजच्या मोबाईल युगात सेल्फी वेडी तरुणाई कुठेही कसलेही भान न बाळगता जीवाला धोका पत्करून सेल्फी काढण्यात दंग होतात आणि आपला जीव गमावून बसतात. त्यांना सावध करण्यासाठी सोमवंशी क्षत्रिय समाज संघाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी अ़र्नाळा समुद्रकिनारी सावधानतेचे फलक लावले आहेत. खऱ्या अर्थाने पावसाळा सुुरु झाले आहे. डोंगर कपारीतून धबधबे, नदीनाले वाहू लागले आहेत. उधाण आलेला समुद्र फेसाळून किनाऱ्यावर धडकू लागला आहे. अशा वातावरणात सहलीचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. आजची मोबाईलवेडी तरुणाई बेफामपणे आनंद लुटू पाहत आहे आणि त्यातूनच अपघात घडून जीव जात आहेत. म्हणूनच सेल्फी वेड्यांना सावध करण्यासाठी सहलीच्या ठिकाणी फलक लावण्याची गरज असल्याचे चोरघे यांचे म्हणणे आहे. २८ जून १७ रोजी मरीन ड्राई्व्ह येथे प्रिती पिसे हिने सेल्फीच्या वेडापायी जीव गमावला. सेल्फीच्या नादापायी १९ जानेवारी २०१६ रोजी बँडस्टँड समुद्रात पडून तरन्नुमचा जीव गेला. ८ आॅक्टोबर २०१६ रोजी अग्नील पायरीस याचा लोणावळा येथे पाय घसरून दरीत कोसळून मृत्यु झाला. सेल्फी काढताना मोहम्मद शाबीत खान याचा ४ नोव्हेंबर २०१६ रोजी मीरा रोड येथे लोकलची धडक बसल्याने मृत्यु झाला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये सर्पमित्र सोमनाथ म्हात्रे याचा बिषारी सापासोबत सेल्फी घेताना सापाने दंश केल्याने मृत्यु झाला होता. तर मे २०१७ रोजी मोनाक्षी राजेश हिचा बँडस्टँड समुद्रात सेल्फीच्या नादापायी मृत्यु झाला होता. त्यानंतरही जीवावर उदार होऊन तरुणाई सेल्फी काढताना दिसत आहे. म्हणूनच चोरघे यांनी अर्नाळा समुद्रकिनारी फलक लावून कळकळीचे आवाहन केले आहे. सहलीसाठी जाणाऱ्या मित्र-मैत्रिणींनो आयुष्य खूप सुंदर आहे. क्षणिक आनंदासाठी ते संपवू नका. काळजी घ्या. घरी आपली कोणीतरी वाट पहात आहे, असे आवाहन चोरघे यांनी फलकांमधून केले आहे.