शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

वसईत तीन हजार किलो दूषित बर्फ नष्ट

By admin | Updated: May 29, 2017 05:44 IST

ऐन उन्हाळ््यात वसईत सुमारे तीन हजार किलो दूषित बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क वसई : ऐन उन्हाळ््यात वसईत सुमारे तीन हजार किलो दूषित बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. त्यामुळे वसई विरार परिसरात आरोग्याला हानीकारक असलेल्या दूषित बर्फाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची बाबही उजेडात आली आहे. वसई विरार परिसरात बर्फाचे कारखाने नाहीत. मात्र, सध्या उन्हाने लोकांना भंडावून सोडले आहे. त्यामुळे शहरात लिंबू सरबत, उसाचा रस, सरबते, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, शितपेये विक्री करणाऱ्यांचा धंदा तेजीत आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जात आहे. मात्र, हा बर्फ दूषित असून आरोग्याला घातक असल्याचे अन्न व प्रशासनाच्या कारवाईनंतर उजेडात आले आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी धाडी टाकून तब्बल तीन हजारो किलो बर्फ जप्त करून तो नष्ट केला. वसई विरार परिसरात ठाणे, कल्याण आणि कोपर खैरणे येथून बर्फ आणला जातो. हा बर्फ गोदामात साठवून ठेवला जातो. त्यानंतर मागणीनुसार त्याचा विक्रेत्यांकडे पुरवठा केला जातो. बर्फाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या दूपित पाण्याचा वापर करून बर्फ बनवत असतात. या बर्फात असलेले ई कोलाय आरोग्यास घातक जीवाणू आढळून आले आहेत. या यामुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, विषमज्वर, कावीळ आणि साथीच्या रोगांची लागण होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अन्न व प्रशासन विभागाने छापे मारून जप्त केलेला बर्फ नष्ट करून टाकला आहे. तसेच याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहेत. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख शंकर बने यांनी केली आहे.