शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

वाहतूककोंडीने वाढवला वसई-विरारकरांचा मानसिक ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:55 IST

अनेकांना नोकरी गमावण्याची भीती : प्रवासातच जातात तासन्तास, रोज कार्यालयात लागत आहेत लेटमार्क

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना कार्यालय गाठण्यासाठी दररोज तासन्तास प्रवासात वेळ घालवणारे वसई-विरारकर आता मानसिक आजारांचे बळी पडू लागले आहेत. वसई ते घोडबंदरदरम्यान काशिमीरा आणि दहिसर चेकनाका येथील वाहतूककोंडीत सापडणारे नागरिक ठरावीक वेळेत कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. यामुळे अनेकांना रोजगार गमावण्याचीही भीती वाटू लागली आहे.

मुंबई-अहमदाबाद या वसई-विरारमधून जाणाऱ्या महामार्गावरून मुंबई, भिवंडी आणि ठाण्याच्या दिशेने रोज ये-जा करताना येथील नोकरदारांना कामण, भिवंडी व कल्याण आदी भागात होत असलेल्या वाहतूककोंडीचा दररोज सामना करावा लागत आहे. यामुळे नित्यनेमाने कामावर लेटमार्क लागणे, नोकरीच्या ठिकाणी ताण वाढणे, असुरक्षितता वाटणे अशा कारणांनी अनेकांना ग्रासले असून नोकरी जाण्याची भीती आता वाटू लागली आहे.मुंबई, ठाण्यातील खासगी कंपन्या सुरू असल्याने वसई, विरार, नालासोपारा, नायगाव आदी भागांत राहणारे हजारो कामगार हे खासगी वाहनांनी मुंबई आणि ठाणे गाठू लागले आहेत. मात्र, या परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे कामगारांना दररोज तीन ते चार तास वाहतूककोंडीत घालवावे लागत आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम या नोकरदारांच्या कामावर होऊ लागला आहे.

मालाड येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनीअर ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करत असलेली तरुणी व तिच्या सहकारी टीमने आपली व्यथा मांडली. आम्ही रविवार सोडून सहा दिवस कार्यालयात काम करतो, मात्र घरून काम होत नाही. याउलट ५० टक्केच पगार मिळतो, तर कार्यालयाच्या ठिकाणी काम केले तर पूर्ण पगार मिळतो, मात्र दुर्दैवाने याच कार्यालयात पोहोचण्यासाठी सकाळी बसेसची व्यवस्था नाही. वसई-विरारमधून रिक्षाने एकावेळी ५०० रुपये होतात. वसईतून मुंबई उपनगर येथे जाण्यासाठी बसेसची कुठलीच व्यवस्था नाही. त्यामुळे केवळ खाजगी मोटार व रिक्षा हे दोनच पर्याय आहेत, मात्र ते खर्चिक आहेत आणि ते सुद्धा वेळेवर मिळत नाहीत. त्यासाठीही बरीच गर्दी असते. गाडी असेल तरीही रांगेत साधारण अर्धा तास लागतो. त्यानंतर महामार्गावरील वाहतूककोंडीतून सुटका होऊन कसेबसे कार्यालयात पोहोचतो, असे त्या म्हणाल्या.मी वसई ते लोअर परेल मोटारीने प्रवास करतो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दररोज पेट्रोलवर होणाºया खर्चामुळे अतिरिक्त ताण वाढला आहे. शिवाय, कामावर पोहोचण्यास उशीर होत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी जी नोकरकपात व पगारकपात सुरू आहे, त्यात आपले तर नाव पुढे नसेल ना, याचीच रोज चिंता सतावत राहते.- सतीश सुळे, वसई