शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

कचरा वर्गीकरणाचा बोजवारा, आरोग्याबाबत वसई-विरार महानगरपालिका उदासीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 23:32 IST

वसई-विरार शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

- आशिष राणेवसई - वसई-विरार शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तर कचरा व्यवस्थापनासाठी अर्थात ओला - सुका कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करत देऊ केलेले निळे आणि हिरवे डबे तर सोसायटीच्या आवारात चक्क फुटलेल्या अवस्थेत दिसत असल्याचे चित्र सर्वच प्रभागात दिसते आहे. किंबहुना महापालिकेने वाटप केलेले ते निळे व हिरवे डबे आता फुटलेल्या स्थितीत असल्याने त्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण होणेच अक्षरश: थांबले असल्याने शहरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. मात्र, यामुळे नागरिकांच्या आरोग्याप्रती पालिकेचे धोरण उदासीन असल्याचे समोर येत आहे.दरम्यान, पुन्हा निळे आणि हिरवे डबे मिळणार नाहीत अशी भूमिका महापालिकेने घेतल्याने आता याचा परिणाम शहरात दिसतो आहे. कचºयामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि रोगराईला आमंत्रण मिळाल्याची सध्याची शहरातील अवस्था आहे. एकीकडे महापालिका सांगते की, आपला ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो निळ्या आणि हिरव्या डब्यात टाकावा. पण, आज वसई - विरार शहरातील अनेक सोसायट्यांच्या तसेच चाळींच्या आवारातील कच-याचे हे डबे पूर्णपणे तुटलेलेच दिसतात. यामुहे कचरा जमिनीवर पडत असून नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागते आहे.वसई पश्चिमेस व पूर्वेस आणि पेल्हार भागात हे कचºयाचे डबे धूळ खात पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे महापालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत व शहरातील स्वच्छतेबाबत किती जागरूक आहे, हे दिसून येत आहे.महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात मोठमोठ्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना सुका कचरा निळ्या डब्यात तर ओला कचरा हिरव्या डब्यात टाकून कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले. तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी तर यासाठी खास ‘महिला ब्रँड अँबेसेडर’ची नियुक्ती केली होती. या आवाहनानंतर शहरातील प्रत्येक प्रभागाप्रमाणे कचºयाच्या डब्याचे वितरण करण्यात आले. मात्र दोन वर्षांनी महापालिकेचे हे निळे आणि हिरवे डब्बे फुटले. या फुटक्या डब्यातून आता कचरा व घाणेरडे पाणी बाहेर पडत आहे.ही समस्या कुठल्याही एका प्रभागापुरती मर्यादित नाही, तर ती वसई, विरार, नालासोपाºयाच्या म्हणजेच ९ प्रभागात आणि त्यांच्या परिसरातील हजारो सोसायट्यांमध्ये निर्माण झाली आहे. यासंदर्भात असंख्य स्थानिकांनी महापालिकेकडे नवीन डबे पुरवण्याची मागणी केली असता पालिकेकडून नकार दिला जात आहे. आता डबे मिळणार नाहीत. त्याचे वाटप एकदाच केले गेले. काही करदाते वर्षभर तर कोणी सहा महिन्यांपासून महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधीकडे नवीन डब्याची मागणी करत आहेत. तरीही पालिकेने डबे पुरवलेले नाहीत.महापालिका काही महिन्यांपासून कचºयाचे डबेच नसल्याची भूमिका घेत असतानाच, दुसरीकडे मात्र पूर्व - पश्चिम आणि पेल्हारमध्ये कचºयाचे डबेच चक्क धूळखात पडल्याचे दिसले आहे.वसई पूर्वेकडे रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या एका मोठ्या गोडावूनमध्ये हे डबे दिसतात. तर दुसरीकडे पेल्हारच्या जलशुद्धी केंद्राच्या अडगळीच्या ठिकाणीसुद्धा हे निळे आणि हिरवे डबे कुणालाही दिसू नयेत असे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका जनतेची दिशाभूल करत असून शहरात रोगराईला आमंत्रण देत असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात आयुक्त आणि शहर अभियंता माधव जवादे यांना संपर्क केला असता ते जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.

कुठे गेल्या महिला ब्रँड अँबेसेडर ?तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी मोठा गाजावाजा करून स्वच्छ भारत अभियान मोहीम आणि शहरात प्रभाग निहाय ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन तसेच वर्गीकरणासाठी आधी डबे वाटले. नंतर काही महिलांना महिलाना प्रभागनिहाय ब्रॅण्ड अँबेसेडर बनवले.काही काळ पालिकेचे स्वछता निरीक्षक आणि आरोग्य कर्मचारी प्रभागात फिरले. मात्र नंतर हे सर्वण गायब झाले. मग सर्वत्र आवाहन करून सभा बैठका घेण्यासाठी या महिला अँबेसेडर फिरताना आढळून आल्या. तत्कालीन आयुक्त लोखंडे गेले आणि या ब्रँड अँबेसेडरही शहरातून गायब झाल्या.कचरा वर्गीकरणाच्या नुसत्याच भूलथापानागरिकांना सुका कचरा निळ्या डब्यात तर ओला कचरा हिरव्या डब्यात टाकून कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले होते. मात्र, आज हजारो हाऊसिंग सोसायट्यांमधील कचरापेट्या फुटलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत असल्याने एकाच कचरा पेटीत सुका व ओला कचरा टाकला जात आहे. कचरा वर्गीकरणाची मोहीम अपयशी ठरताना दिसते आहे.शहरातील निळे व हिरवे डबे तुटलेल्या अवस्थेत आहेत, याची पालिकेला कल्पना आहे. पुन्हा एकदा शहरातील हाऊसिंग सोसायटी आणि इतर विभागात त्यांची नावे टाकून त्या डब्याचे वाटप लवकरच केले जाईल. मात्र सोबत आपणच त्या डब्यांची जातीने देखभाल करून सक्तीने ओला व सुका कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करायचे आहे. याबाबत आता माघार नाही. किंबहूना याबाबत एक संयुक्त बैठकही घेतली जाईल.- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई विरार शहर महापालिका, मुख्यालय

टॅग्स :Vasai Virarवसई विरार