शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वसई-विरार महापालिका डेंग्यू, हिवतापाने जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 06:11 IST

यंत्रणा ठरल्या कुचकामी : आजार वाढत असताना प्रशासन म्हणते २१ रुग्ण

नालासोपारा : सप्टेंबर संपून आॅक्टोबर सुरू होताच वसई विरारमध्ये साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जुलै महिन्यातील वसईतील पुरानंतर शहराची आरोग्य व्यवस्था बिघडली असून डेंग्यूची साथ असताना आता त्याता हिवतापाची भर पडली आहे. शहरातील अनेक खाजगी रु ग्णालयात डेंग्यू आणि हिवतापाचे रु ग्ण उपचार घेत आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून पालिकेची यंत्रणा साथीचे आजार रोखण्यास अपयशी ठरली आहे.

शहरातील अनेक नागरिकांना डेंग्यू व मलेरियाची लागण झाल्याचे चित्र आहे. मात्र यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आले आहे. डेंग्यू व मलेरिया यासारखे आजार होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता, जनजागृती, औषध फवारणी केले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु या साथीच्या आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्य विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वसईने डेंग्यू रोगाने धुमाकूळ घातला होता. पालिकेने मात्र डेंग्यूची संख्या कमी असल्याचा दावा करत डेंग्यूचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले होते. मात्र आता डेंग्यू पुन्हा शहरात दाखल झाला आहे. एव्हरशाईन परिसरात पुन्हा डेंग्यूचे रु ग्ण आढळले आहेत.याआधी विरार मधील एम जी एम नगर येथे खोदण्यात आलेल्या जलवाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात डेंग्यूचे मच्छर आढळले होते. मात्र यावर पालिकेने उपाययोजना न केल्याने आता या रोगांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. अनेक रु ग्णालयात डेंग्यूचे रु ग्ण असताना पालिकेने केवळ डेंग्यूचे २१ रु ग्ण असल्याचा दावा केला होता. एव्हरशाईन येथील सामाजिक कार्यकर्ते मेलविन सिक्वेरा यांनी सांगितले की, माङया मुलाला देखील डेंग्यूची लागण झाली असून शहरातील अनेक ठिकाणी डेंग्यूचे रु ग्ण मोठ्या संख्येने आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.साथीच्या आजारांवर आम्ही लक्ष ठेवूनमहापालिकेच्या साथ रोग विभागाच्या अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे यांनी सांगितले की, जानेवारी ते सप्टेंबर २०१८ पर्यंत २१ डेंग्यू चे रु ग्ण व ३५ ते ४० हिवतापाचे रु ग्ण आढळले आहेत. तसेच शहरात होणाऱ्या डेंग्यू रु ग्णांची यादी इतर रु ग्णालयातून मागवून त्यांची पुन्हा तपासणी करून उपचार केले जातात. व साथीच्या होणाºया आजारांवर आरोग्य विभागामार्फत पूर्ण पणे लक्ष दिले जात असते व वेळो वेळी याची जनजागृती करून अनेक ठिकाणी असे साथीचे आजार होऊ नये यासाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन केले जाते असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यूVasai Virarवसई विरार