शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची अखेर बदली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 18:23 IST

रमेश मनाळे यांच्या बदलीचा परिणाम थेट आरोग्य यंत्रणेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनात मार्च मध्ये रुजू झालेले गंगाधरन डी. यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले होते. त्यातील काही निर्णय अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना पटले नव्हते.

- आशिष राणे

वसई : वसई-विरार शहर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने अखेर त्यांची गुरुवारी बदली झाली आहे. राज्य सरकारने 2018 मध्ये रमेश मनाळे यांची वसई-विरार शहर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केली होती. रमेश मनाळे यांच्या बदलीचा परिणाम थेट आरोग्य यंत्रणेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

रमेश मनाळे यांचा तीन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्ठात आणावी, अशी विनंती सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांना केली होती. त्यानुसार रमेश मनाळे यांची प्रतिनियुक्त संपुष्ठात आणून त्यांच्या सेवा सनियंत्रित विभाग, सामान्य प्रशासन विभाग-मंत्रालय यांच्याकड़े प्रत्यावर्तित करण्यात आल्याचे आदेश दि.24 जून रोजी राज्य शासनाचे उप सचिव कैलास बधान यांनी काढून ते पालिकेला बजावले असल्याची माहिती पालिका जनसंपर्क अधिकाऱ्यांनी गुरुवारी 'लोकमत'ला दिली.

रमेश मनाळे यांच्याकडे महापालिकेतील अनेक महत्वाची अशी विविध खाती सुरुवातीपासूनच होती त्यात पालिकेच्या पूर्वेमधील सर्व प्रभाग समित्या,कोरोनाच्या संदर्भातील आरोग्य यंत्रणा, उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरण, महिला बाल कल्याण, जाहिरात याशिवाय मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. 

दरम्यान, महापालिका प्रशासनात मार्च मध्ये रुजू झालेले गंगाधरन डी. यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले होते. त्यातील काही निर्णय अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना पटले नव्हते. त्यांनी आयुक्तांना हे निर्णय मागे घेण्याची विनंती सुद्धा केली होती. यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय होता, तो म्हणजे महिला बाल कल्याण विभागातील कर्मचारी कमी करण्याचा होता. हे कर्मचारी कमी केल्याने त्याचा परिणाम योजनांवर झाला होता. परंतु आयुक्तांनी रमेश मनाळे यांचे काहीच न ऐकता अशा निर्णयाला केराची  टोपली दाखविल्याने  दिवसेंदिवस पालिकेत त्यांना काम करणे अवघड जात होते. त्यामुळेच की काय त्यांनी आपली बदली स्वतः हून करून घेतल्याची जोरदार चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार