शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

वसई-विरारला ५८७ इमारती धोकादायक, नोटिसा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:55 IST

वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी ऐरणीवर आला आहे.

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी ऐरणीवर आला आहे. मनपाने ५८७ धोकादायक इमारतींना नोटिसा धाडल्या असून १९८ इमारतींना अतिधोकादायक म्हणून घोषित केले आहे. नोटीस धाडलेल्या इमारतींना दुरुस्ती किंवा इमारतीखाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत पण मनपाकडे अद्यापपर्यंत एकही ट्रान्झिट कॅम्प (संक्रमण शिबिर) नाही. धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवून मनपाने आपला पल्ला झाडला आहे. पावसाळ्यात एखादी अप्रिय घटना घडून काही जीवितहानी झाली तर आम्ही नोटीस पाठवली होती असे सांगण्यास मनपा व अधिकारी मागे राहणार नाहीत एवढे मात्र खरे!पावसाळ्यापूर्वी महापालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची तीन वर्गात वर्गवारी केली जाते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात त्यांना तत्काळ खाली करायचे असते. पालिकेकडे संक्रमण शिबिर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतींच्या रहिवाशांना बाहेर काढून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या वर्षी पालिकेने ५८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी १९८ अतिधोकादायक इमारती, सी वन मध्ये ८१ इमारती, सी टू मध्ये १९७ इमारती तर सी थ्री मध्ये १११ इमारती अशी यादी मनपाने तीन गटात केली आहे. परंतु अद्यापही १९८ अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवासी रहात आहेत. पावसाळ्यात या धोकादायक इमारती केव्हाही कोसळू शकतात. यामुळे वसई विरार मनपाने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.>नालासोपाऱ्याात असंख्य धोकादायक इमारतीनालासोपारा पूर्वेकडील विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. वसई विरार मनपाने या इमारतीकडे लक्ष देवून कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. नालासोपारामध्ये धोकादायक इमारतींचा काही भाग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण नालासोपारा मनपा विभाग दरवर्षी पावसाळ्याआधी धोकादायक इमारतीना नोटीस देतो पण कारवाई मात्र शून्य असते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, पण कारवाई केली नसल्याने या इमारतीत राहणारे रहिवासी आपला जीव मुठीत घेवून राहतात.नालासोपारामधील टाकी रोड, ओस्तवाल नगरी, विजय नगर, साईनाथ नगर, आत्मवल्लभ सोसायटी, कपोल नगर, संखेश्वर नगर, आचोले रोड या विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. या इमारतीवर कारवाई झाली नाही तर मोठी घटना पावसाळ्यात होऊन मोठी जीवितहानी घडू शकते.>धोकादायक इमारतींना वेळोवेळी नोटिसा पाठवत असतो. या इमारतीमधील रहिवाशांनी त्यानुसार इमारतीची डागडुजी, मजबुतीकरण करून घ्यायचे असते. इमारत अतिधोकादायक असेल तर रहिवाशांनी ती स्वत:हून खाली करायची असते मनपाच्या नोटीसांकडे या इमारतीत राहणारे लोक काणाडोळा करतात. - रमेश मनाळे,(अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार