शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारला ५८७ इमारती धोकादायक, नोटिसा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:55 IST

वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी ऐरणीवर आला आहे.

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी ऐरणीवर आला आहे. मनपाने ५८७ धोकादायक इमारतींना नोटिसा धाडल्या असून १९८ इमारतींना अतिधोकादायक म्हणून घोषित केले आहे. नोटीस धाडलेल्या इमारतींना दुरुस्ती किंवा इमारतीखाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत पण मनपाकडे अद्यापपर्यंत एकही ट्रान्झिट कॅम्प (संक्रमण शिबिर) नाही. धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवून मनपाने आपला पल्ला झाडला आहे. पावसाळ्यात एखादी अप्रिय घटना घडून काही जीवितहानी झाली तर आम्ही नोटीस पाठवली होती असे सांगण्यास मनपा व अधिकारी मागे राहणार नाहीत एवढे मात्र खरे!पावसाळ्यापूर्वी महापालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची तीन वर्गात वर्गवारी केली जाते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात त्यांना तत्काळ खाली करायचे असते. पालिकेकडे संक्रमण शिबिर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतींच्या रहिवाशांना बाहेर काढून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या वर्षी पालिकेने ५८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी १९८ अतिधोकादायक इमारती, सी वन मध्ये ८१ इमारती, सी टू मध्ये १९७ इमारती तर सी थ्री मध्ये १११ इमारती अशी यादी मनपाने तीन गटात केली आहे. परंतु अद्यापही १९८ अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवासी रहात आहेत. पावसाळ्यात या धोकादायक इमारती केव्हाही कोसळू शकतात. यामुळे वसई विरार मनपाने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.>नालासोपाऱ्याात असंख्य धोकादायक इमारतीनालासोपारा पूर्वेकडील विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. वसई विरार मनपाने या इमारतीकडे लक्ष देवून कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. नालासोपारामध्ये धोकादायक इमारतींचा काही भाग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण नालासोपारा मनपा विभाग दरवर्षी पावसाळ्याआधी धोकादायक इमारतीना नोटीस देतो पण कारवाई मात्र शून्य असते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, पण कारवाई केली नसल्याने या इमारतीत राहणारे रहिवासी आपला जीव मुठीत घेवून राहतात.नालासोपारामधील टाकी रोड, ओस्तवाल नगरी, विजय नगर, साईनाथ नगर, आत्मवल्लभ सोसायटी, कपोल नगर, संखेश्वर नगर, आचोले रोड या विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. या इमारतीवर कारवाई झाली नाही तर मोठी घटना पावसाळ्यात होऊन मोठी जीवितहानी घडू शकते.>धोकादायक इमारतींना वेळोवेळी नोटिसा पाठवत असतो. या इमारतीमधील रहिवाशांनी त्यानुसार इमारतीची डागडुजी, मजबुतीकरण करून घ्यायचे असते. इमारत अतिधोकादायक असेल तर रहिवाशांनी ती स्वत:हून खाली करायची असते मनपाच्या नोटीसांकडे या इमारतीत राहणारे लोक काणाडोळा करतात. - रमेश मनाळे,(अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार