शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

वसई-विरारला ५८७ इमारती धोकादायक, नोटिसा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:55 IST

वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी ऐरणीवर आला आहे.

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमधील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी ऐरणीवर आला आहे. मनपाने ५८७ धोकादायक इमारतींना नोटिसा धाडल्या असून १९८ इमारतींना अतिधोकादायक म्हणून घोषित केले आहे. नोटीस धाडलेल्या इमारतींना दुरुस्ती किंवा इमारतीखाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत पण मनपाकडे अद्यापपर्यंत एकही ट्रान्झिट कॅम्प (संक्रमण शिबिर) नाही. धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवून मनपाने आपला पल्ला झाडला आहे. पावसाळ्यात एखादी अप्रिय घटना घडून काही जीवितहानी झाली तर आम्ही नोटीस पाठवली होती असे सांगण्यास मनपा व अधिकारी मागे राहणार नाहीत एवढे मात्र खरे!पावसाळ्यापूर्वी महापालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची तीन वर्गात वर्गवारी केली जाते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात त्यांना तत्काळ खाली करायचे असते. पालिकेकडे संक्रमण शिबिर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतींच्या रहिवाशांना बाहेर काढून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या वर्षी पालिकेने ५८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी १९८ अतिधोकादायक इमारती, सी वन मध्ये ८१ इमारती, सी टू मध्ये १९७ इमारती तर सी थ्री मध्ये १११ इमारती अशी यादी मनपाने तीन गटात केली आहे. परंतु अद्यापही १९८ अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवासी रहात आहेत. पावसाळ्यात या धोकादायक इमारती केव्हाही कोसळू शकतात. यामुळे वसई विरार मनपाने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.>नालासोपाऱ्याात असंख्य धोकादायक इमारतीनालासोपारा पूर्वेकडील विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. वसई विरार मनपाने या इमारतीकडे लक्ष देवून कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. नालासोपारामध्ये धोकादायक इमारतींचा काही भाग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण नालासोपारा मनपा विभाग दरवर्षी पावसाळ्याआधी धोकादायक इमारतीना नोटीस देतो पण कारवाई मात्र शून्य असते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, पण कारवाई केली नसल्याने या इमारतीत राहणारे रहिवासी आपला जीव मुठीत घेवून राहतात.नालासोपारामधील टाकी रोड, ओस्तवाल नगरी, विजय नगर, साईनाथ नगर, आत्मवल्लभ सोसायटी, कपोल नगर, संखेश्वर नगर, आचोले रोड या विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. या इमारतीवर कारवाई झाली नाही तर मोठी घटना पावसाळ्यात होऊन मोठी जीवितहानी घडू शकते.>धोकादायक इमारतींना वेळोवेळी नोटिसा पाठवत असतो. या इमारतीमधील रहिवाशांनी त्यानुसार इमारतीची डागडुजी, मजबुतीकरण करून घ्यायचे असते. इमारत अतिधोकादायक असेल तर रहिवाशांनी ती स्वत:हून खाली करायची असते मनपाच्या नोटीसांकडे या इमारतीत राहणारे लोक काणाडोळा करतात. - रमेश मनाळे,(अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार