शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

वसई परिवहन राम भरोसे

By admin | Updated: August 10, 2016 02:15 IST

हायवेवरून नालासोपारा येथे निघालेली वसई विरार परिवहनची बस इंधन संपल्याने रस्त्यातच बंद पडली. सर्व्हिस टेम्पोने इंधन आणून भरल्यानंतर ती मार्गस्थ झाली.

वसई : हायवेवरून नालासोपारा येथे निघालेली वसई विरार परिवहनची बस इंधन संपल्याने रस्त्यातच बंद पडली. सर्व्हिस टेम्पोने इंधन आणून भरल्यानंतर ती मार्गस्थ झाली. परंतु प्रवाशांची मात्र गैरसोय झाली. निरनिराळ्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेली वसई-विरार महापालिकेची परिवहनसेवा आता रामभरोसे चालल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवनवीन सेवा आणि बसेस देण्याचा पालिकेचा दावा फोल ठरल्याची चर्चा आहे. सेवा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी असल्याचे सांगून वसई तालुक्यासह थेट ठाण्यापर्यंत वाढवण्यात आली. एस.टी. पेक्षा कमी भाडे आणि गाड्यांच्या जास्त फेऱ्या असल्यामुळे अल्पावधीतच हजारो प्रवासी या सेवेकडे आकर्षीत झाले. मात्र, नंतर ही सेवा वादग्रस्तही ठरू लागली आहे.या गाड्यांची नियमीतपणे तपासणी केली जात नाही. इंधनाचीही तपासणी न करता त्या बंद पडेपर्यंत चालवण्यात येत असल्याचे तुळींज येथे उघडकीस आले आहे. हायवेवरून नालासोपाराकडे जाणारी एम.एच.४८ के-२१० ही बस काल दुपारी नालासोपारा टाकी रोडजवळ बंद पडली. त्यामुळे सर्व प्रवाशांना चालतच स्टेशनकडे जावे लागले. ही गाडी इंधन संपल्यामुळे बंद पडल्याचे कळल्यावर परिवहन सेवेच्या सर्व्हिस टेम्पोने या बसला डिझेलचा पुरवठा केला. हे दृश्य पाहणाऱ्या पादचाऱ्यांनी परिवहन सेवेची खिल्ली उडवली. तसेच अशा रामभरोसे बसमधून प्रवास करून वेळ फुकट घालायचा का असा सवाल करून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. आता आयुक्त व प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करतात याकडे प्रवासी व शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)