शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

वसई परिवहन राम भरोसे

By admin | Updated: August 10, 2016 02:15 IST

हायवेवरून नालासोपारा येथे निघालेली वसई विरार परिवहनची बस इंधन संपल्याने रस्त्यातच बंद पडली. सर्व्हिस टेम्पोने इंधन आणून भरल्यानंतर ती मार्गस्थ झाली.

वसई : हायवेवरून नालासोपारा येथे निघालेली वसई विरार परिवहनची बस इंधन संपल्याने रस्त्यातच बंद पडली. सर्व्हिस टेम्पोने इंधन आणून भरल्यानंतर ती मार्गस्थ झाली. परंतु प्रवाशांची मात्र गैरसोय झाली. निरनिराळ्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेली वसई-विरार महापालिकेची परिवहनसेवा आता रामभरोसे चालल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवनवीन सेवा आणि बसेस देण्याचा पालिकेचा दावा फोल ठरल्याची चर्चा आहे. सेवा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी असल्याचे सांगून वसई तालुक्यासह थेट ठाण्यापर्यंत वाढवण्यात आली. एस.टी. पेक्षा कमी भाडे आणि गाड्यांच्या जास्त फेऱ्या असल्यामुळे अल्पावधीतच हजारो प्रवासी या सेवेकडे आकर्षीत झाले. मात्र, नंतर ही सेवा वादग्रस्तही ठरू लागली आहे.या गाड्यांची नियमीतपणे तपासणी केली जात नाही. इंधनाचीही तपासणी न करता त्या बंद पडेपर्यंत चालवण्यात येत असल्याचे तुळींज येथे उघडकीस आले आहे. हायवेवरून नालासोपाराकडे जाणारी एम.एच.४८ के-२१० ही बस काल दुपारी नालासोपारा टाकी रोडजवळ बंद पडली. त्यामुळे सर्व प्रवाशांना चालतच स्टेशनकडे जावे लागले. ही गाडी इंधन संपल्यामुळे बंद पडल्याचे कळल्यावर परिवहन सेवेच्या सर्व्हिस टेम्पोने या बसला डिझेलचा पुरवठा केला. हे दृश्य पाहणाऱ्या पादचाऱ्यांनी परिवहन सेवेची खिल्ली उडवली. तसेच अशा रामभरोसे बसमधून प्रवास करून वेळ फुकट घालायचा का असा सवाल करून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. आता आयुक्त व प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करतात याकडे प्रवासी व शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)