शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

वसई परिवहन राम भरोसे

By admin | Updated: August 10, 2016 02:15 IST

हायवेवरून नालासोपारा येथे निघालेली वसई विरार परिवहनची बस इंधन संपल्याने रस्त्यातच बंद पडली. सर्व्हिस टेम्पोने इंधन आणून भरल्यानंतर ती मार्गस्थ झाली.

वसई : हायवेवरून नालासोपारा येथे निघालेली वसई विरार परिवहनची बस इंधन संपल्याने रस्त्यातच बंद पडली. सर्व्हिस टेम्पोने इंधन आणून भरल्यानंतर ती मार्गस्थ झाली. परंतु प्रवाशांची मात्र गैरसोय झाली. निरनिराळ्या घटनांमुळे वादग्रस्त ठरलेली वसई-विरार महापालिकेची परिवहनसेवा आता रामभरोसे चालल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवनवीन सेवा आणि बसेस देण्याचा पालिकेचा दावा फोल ठरल्याची चर्चा आहे. सेवा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी असल्याचे सांगून वसई तालुक्यासह थेट ठाण्यापर्यंत वाढवण्यात आली. एस.टी. पेक्षा कमी भाडे आणि गाड्यांच्या जास्त फेऱ्या असल्यामुळे अल्पावधीतच हजारो प्रवासी या सेवेकडे आकर्षीत झाले. मात्र, नंतर ही सेवा वादग्रस्तही ठरू लागली आहे.या गाड्यांची नियमीतपणे तपासणी केली जात नाही. इंधनाचीही तपासणी न करता त्या बंद पडेपर्यंत चालवण्यात येत असल्याचे तुळींज येथे उघडकीस आले आहे. हायवेवरून नालासोपाराकडे जाणारी एम.एच.४८ के-२१० ही बस काल दुपारी नालासोपारा टाकी रोडजवळ बंद पडली. त्यामुळे सर्व प्रवाशांना चालतच स्टेशनकडे जावे लागले. ही गाडी इंधन संपल्यामुळे बंद पडल्याचे कळल्यावर परिवहन सेवेच्या सर्व्हिस टेम्पोने या बसला डिझेलचा पुरवठा केला. हे दृश्य पाहणाऱ्या पादचाऱ्यांनी परिवहन सेवेची खिल्ली उडवली. तसेच अशा रामभरोसे बसमधून प्रवास करून वेळ फुकट घालायचा का असा सवाल करून याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. आता आयुक्त व प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करतात याकडे प्रवासी व शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)