शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

वसई परिवहनचे कामगार बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:04 IST

प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करून वसई परिवहनमधील श्रमजीवी कामगार संघटनेने सोमवारपासून बेमुदत काम बंद सुुरु केले आहे.

शशी करपे ।वसई : किमान वेतनासह इतर मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केल्यानंतरही ठेकेदार आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करून वसई परिवहनमधील श्रमजीवी कामगार संघटनेने सोमवारपासून बेमुदत काम बंद सुुरु केले आहे. किमान २० हजार रुपये वेतन दिल्याशिवाय आता माघार नाही असा पवित्रा संघटनेने घेतला आहे. तर ठेकेदाराने आपण राज्य सरकारच्या धोरणानुसारच वेतन देत असून संघटनेच्या मागण्यांबाबत महापौर आणि आयुक्तांनी निर्णय घ्यावा असे सांगून संघटनेच्या मागण्या जवळपास फेटाळून लावल्या आहेत.वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा भागिरथी ट्रन्स प्रा. लिमिटेड या ठेकेदारामार्फत चालवली जाते. सध्या १७० बसेस रस्त्यावर धावत असून ठेका पद्धतीवर ४३३ कामगार कार्यरत आहेत. गेल्या सहा महिन्यापासून किमान वेतनासाठी श्रमजीवी कामगार संघटना ठेकेदार आणि प्रशासनाशी भांडत आहे. पण, राज्य सरकारच्या धोरणानुसार कामगारांना वेतन दिले जाते असा दावा करून ठेकेदाराने संघटनेची मागणी दुर्लक्षित केली आहे. त्यामुळे श्रमजीवी कामगार संघटनेने सोमवारी दिवसभर काम बंद आंदोलन पुकारले होते. पण, दिवसभरात प्रशासन अथवा ठेकेदाराने संपर्क न साधल्याने सोमवारी संध्याकाळी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सोमवारी पहाटेपासून परिवहनच्या बस बंद असल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरु झाले आहेत. वसई तालुक्यात सध्या फक्त २१ रुटवर एसटीची बस सेवा सुरु आहे. उर्वरित सर्व रुटवर परिवहनच्या बसेस धावतात. ठाणे, मुलुंड या परिसरातही परिवहनच्या बसेस धावतात.संपामुळे या मार्गावरील सर्व बसेस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांचे सकाळपासूनच हाल सुरु झाले आहेत. त्याचा फायदा रिक्शाचालक उठवू लागले असून प्रवाशांची अडवणूक करून आर्थिक लुटमार सुरु झाल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.सफाई कामगारांना १५ हजार रुपये वेतन मिळते. तर परिवहन सेवेतील कुशल कामगारांना किमान २० हजार रुपये वेतन मिळालेच पाहिजे यासाठी आता आम्ही आग्रही आहोत. मागण्यांसाठी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले असताना ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा प्रश्न ठेकदाराने सोडवला पाहिजे. आम्ही महापौर आणि आयुक्तांशी चर्चा करणार नाही. तीन वर्षात ४०० गाड्या आणण्याचे बंधन असताना पाच वर्षात फक्त १७० बसेस आहेत. त्यातील ४० बसेस महापालिकेच्या मालकीच्या आहेत. लाखो रुपये किंमतीच्या बसेस चालवून फायदा कमावणारा ठेकेदार एका बसचे वर्षाला फक्त एक हजार रुपये भाडे देऊन लुटमार करीत आहे. अनेक बसेस खटारा आणि कालबाहय आहेत. अशा स्थितीत जीव धोक्यात घालून बसेस चालविणाºया चालक, वाहक व कामगारांना विम्याचे संरक्षण नाही. म्हणूनच सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आता माघार नाही. प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे बेमुदत बंदचा निर्णय घ्यावा लागत आहे. -वसई परिवहन श्रमजीवी कामगार संघटनाकामगारांना देत असलेले वेतन योग्य असल्याचे राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने म्हटलेले आहे. सध्या प्रत्येक कामगारांना सर्व भत्ते मिळून किमान १५ हजार रुपये वेतन दिले जाते. परिवहन सेवा तोट्यात असूनही कामगारांना सर्व सुविधा दिल्या जातात. कामगार आणि प्रवाशांचा फायदा होईल अशाच पद्धतीने सर्व गाडीचा विमा काढला जातो. कामगार सध्या अवास्तव मागण्या करीत असून यासंंबंधी महापौर आणि आयुक्त निर्णय घेतील.- मनोहर सकपाळ,ठेकेदार, परिवहन सेवा