शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

वसई तालुक्यात अवघे ७६ वाहतूक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:26 IST

चार शहरांमधील वाहतूक कोंडी : पुरेसे पोलीस बळ देण्याची नागरिकांची मागणी

नालासोपारा : वसई तालुक्याच्या विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या चार शहरांमधील वाहतूककोंडी रोखण्यासाठी केवळ ७६ वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. या तुटपुंज्या पोलीस बळावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडते. लाखोंच्या घरात असलेली लोकसंख्या आणि रस्त्यावर धावणारी वाहने यासाठी असलेले हे तुटपुंजे पोलीस बळ पाहता सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

नालासोपारा आणि विरार येथील एकमेव ओव्हरब्रीजवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांची दमछाक होते. वसई तालुक्यातील वाहतूक पोलीस खात्यात १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस अधिकारी आणि ७३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. तिसरी मुंबई ओळखल्या जाणाऱ्या आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई तालुक्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी एवढेच पोलीस दल उपलब्ध असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील परिसरात आचोळे, तुळिंज, सेन्ट्रल पार्क, संतोष भवन येथे मोठ्या प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. तर वसईच्या पूर्वेकडील गोखिवरे, सातिवली, वालीव या औद्योगिक वसाहतीत दररोज कोंडी होते. विरारच्या पूर्व आणि पश्चिमेकडील स्टेशन परिसरातही हेच चित्र असते. या सर्व गोष्टींकडे राज्य सरकारने लक्ष देऊन वसई तालुक्यातील कोंडी रोखण्यासाठी पुरेसे पोलीस बळ देण्यात यावे अशी मागणी जनसामान्यांमध्ये जोर धरते आहे.वाहतूक पोलिसांकडे एकही टोइंग व्हॅन नाहीवसई तालुक्यातील नो पार्र्किं ग, रस्त्यावर, गटारावर तसेच स्टेशन परिसरात गाड्या लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया वाहनांना बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे एकही टोर्इंग व्हॅन नाही. पोलिसांना काही कारणास्तव टोइंग व्हॅन हवी असेल तर महानगरपालिकेच्या मुख्यालयात फोन करून ती मागवावी लागते. वाहतूक पोलिसांना किमान दोन तरी टोर्इंग व्हॅन कायमस्वरूपी मिळायला हव्यात.

सिग्नल यंत्रणेमुळे होते वाहतूककोंडीमहानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून शहरात सिग्नल यंत्रणा उभी केली. पण याचा उपयोग होण्याऐवजी काही ठिकाणी कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्य रस्त्यावर आणि जेथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत आहे तेथील सिग्नल यंत्रणेमधील टायमिंग केवळ २० सेकंद आहे, तर आतील रस्त्यांचे टायमिंग ६० सेकंद आहे. हे टायमिंग बदलले तर हा त्रास वाचू शकतो. 

वाहतूक शाखेत एकूण ७६ पोलीस कार्यरत आहे. भंगार गाड्या उचलून जमा करण्यासाठी जागा मिळावी आणि टोर्इंग व्हॅन मिळावी यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे. सिग्नल यंत्रणेमधील मुख्य रस्त्यावरील असलेला वेळ बदलण्यासाठी कंत्राटदाराशी चर्चा झाली असून लवकरच ती बदलणार जेणेकरून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार नाही.

- विलास सुपे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई