शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

वसई तालुक्यात अवघे ७६ वाहतूक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:26 IST

चार शहरांमधील वाहतूक कोंडी : पुरेसे पोलीस बळ देण्याची नागरिकांची मागणी

नालासोपारा : वसई तालुक्याच्या विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव या चार शहरांमधील वाहतूककोंडी रोखण्यासाठी केवळ ७६ वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. या तुटपुंज्या पोलीस बळावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडते. लाखोंच्या घरात असलेली लोकसंख्या आणि रस्त्यावर धावणारी वाहने यासाठी असलेले हे तुटपुंजे पोलीस बळ पाहता सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

नालासोपारा आणि विरार येथील एकमेव ओव्हरब्रीजवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांची दमछाक होते. वसई तालुक्यातील वाहतूक पोलीस खात्यात १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस अधिकारी आणि ७३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. तिसरी मुंबई ओळखल्या जाणाऱ्या आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई तालुक्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी एवढेच पोलीस दल उपलब्ध असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील परिसरात आचोळे, तुळिंज, सेन्ट्रल पार्क, संतोष भवन येथे मोठ्या प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. तर वसईच्या पूर्वेकडील गोखिवरे, सातिवली, वालीव या औद्योगिक वसाहतीत दररोज कोंडी होते. विरारच्या पूर्व आणि पश्चिमेकडील स्टेशन परिसरातही हेच चित्र असते. या सर्व गोष्टींकडे राज्य सरकारने लक्ष देऊन वसई तालुक्यातील कोंडी रोखण्यासाठी पुरेसे पोलीस बळ देण्यात यावे अशी मागणी जनसामान्यांमध्ये जोर धरते आहे.वाहतूक पोलिसांकडे एकही टोइंग व्हॅन नाहीवसई तालुक्यातील नो पार्र्किं ग, रस्त्यावर, गटारावर तसेच स्टेशन परिसरात गाड्या लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया वाहनांना बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे एकही टोर्इंग व्हॅन नाही. पोलिसांना काही कारणास्तव टोइंग व्हॅन हवी असेल तर महानगरपालिकेच्या मुख्यालयात फोन करून ती मागवावी लागते. वाहतूक पोलिसांना किमान दोन तरी टोर्इंग व्हॅन कायमस्वरूपी मिळायला हव्यात.

सिग्नल यंत्रणेमुळे होते वाहतूककोंडीमहानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून शहरात सिग्नल यंत्रणा उभी केली. पण याचा उपयोग होण्याऐवजी काही ठिकाणी कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्य रस्त्यावर आणि जेथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत आहे तेथील सिग्नल यंत्रणेमधील टायमिंग केवळ २० सेकंद आहे, तर आतील रस्त्यांचे टायमिंग ६० सेकंद आहे. हे टायमिंग बदलले तर हा त्रास वाचू शकतो. 

वाहतूक शाखेत एकूण ७६ पोलीस कार्यरत आहे. भंगार गाड्या उचलून जमा करण्यासाठी जागा मिळावी आणि टोर्इंग व्हॅन मिळावी यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे. सिग्नल यंत्रणेमधील मुख्य रस्त्यावरील असलेला वेळ बदलण्यासाठी कंत्राटदाराशी चर्चा झाली असून लवकरच ती बदलणार जेणेकरून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार नाही.

- विलास सुपे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई