शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

वसई :२९ गावांचा न्यायनिवाडा नाहीच; अंतिम सुनावणीसाठी पुन्हा वाट पाहावी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:37 IST

गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय प्रलंबित. शुक्रवारीही सुनावणी न झाल्याची माहिती.

ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षांपासून निर्णय प्रलंबित. शुक्रवारीही सुनावणी न झाल्याची माहिती.

आशिष राणे वसई : 29 गावांचा समावेश महापालिकेतच राहणार की त्या वगळलेल्या 29 गावांची स्वतंत्र नगरपंचायत निर्माण होणार याबाबतीत 11 जून 2021 रोजी मुंबईउच्च न्यायालयात मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सदरच्या याचिकेवर निर्णय येणार होता. मात्र शुक्रवारी ही सुनावणी झालीच नसल्याची माहिती गाव बचाव आंदोलनचे मिलिंद खानोलकर यांनी लोकमतला दिली.या गावांच्या अंतिम सुनावणीच्या बाबतीत बोलताना कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईउच्च न्यायालयातील कामकाज केवळ ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. तर आता दि 15 जून नंतर पुन्हा एकदा उच्च न्यायालयास विनंती करून या 29 गावांच्या सुनावणी बाबतीत पुन्हा तारीख घेतली जाईल, असे मिलिंद खानोलकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान, मागील 10 वर्षांपासून वसई विरार महापालिकेतून 29 गावे वगळण्याचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. किंबहुना दोन महिन्यांपूर्वी दि 9 एप्रिल 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निर्णय टप्प्यावर असताना सुनावणी संपन्न झाली. मात्र सरकारी पक्षाचे ज्येष्ठ वकील तांत्रिक कारणांमुळे गैरहजर राहिल्याने तो निर्णय झाला नाही.याउलट त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 29 गावे वगळण्याच्या संदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलून  राज्य सरकार सोबत सल्लामसलत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला होता आणि तोच अवधी शुक्रवार दि 11 जून रोजी संपुष्टात येऊन मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवार दि.11 जून 2021 रोजी 29 गावा संदर्भात अंतिम निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी गावं वगळण्याच्या याचिकेबाबत काहीही निर्णय आला नाही. त्यासाठी आता पुन्हा काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईGovernmentसरकार