शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वसई पालिकेला ८० लाख दंड; घनकचरा व्यवस्थापनात अपयशी, रोज ६५० मेट्रिक टन कचरा जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 00:01 IST

१ एप्रिल २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० या काळात कचरा व्यवस्थापनासाठी कोणत्याही उपाययोजना न केल्याने आणखी ८० लाख रुपये दंड महानगरपालिकेला ठोठावण्यात आला आहे.

प्रतीक ठाकूरविरार : घनकचरा व्यवस्थापनात वसई - विरार महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. घनकचरा प्रक्रिया व त्यासंबंधी उपाययोजना केली नाही म्हणून राष्ट्रीय हरित लवादाने पालिकेला ८० लाख रुपये दंड ठोठावला असून, यापुढे दरमहिना २० लाख रुपये इतका दंड भरावा लागणार आहे.

याप्रकरणी राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना ७ डिसेंबर २०२० रोजी पत्र पाठवून एक महिन्याच्या आत हा दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. वसई- विरार महापालिका क्षेत्रातून दरदिवशी ६५० मेट्रिक टन इतका कचरा निघतो. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न होता, हा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. याशिवाय वसई-विरार महापालिकेने या कचऱ्यातून निघणाऱ्या जड वस्तूंच्या विल्हेवाटीकरिता कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे आपली महापालिका कचऱ्यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेली आहे, अशी निरीक्षणे नोंदवत घनकचरा व्यवस्थापन अधिनियम-२०१६ नुसार हरित लवादाने आदेश दिले आहेत. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमा-नुसार १ एप्रिल २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० या काळात हरित लवादाने दिलेल्या आदेशांचे अनुपालन झालेले नाही. कचऱ्यावर प्रक्रिया न झाल्याने पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भरपाई म्हणून ८० लाख रुपये भरणा करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत.

१ एप्रिल २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० या काळात कचरा व्यवस्थापनासाठी कोणत्याही उपाययोजना न केल्याने आणखी ८० लाख रुपये दंड महानगरपालिकेला ठोठावण्यात आला आहे. याशिवाय या दोन्हींचा अवलंब न केल्यास डिसेंबर २०२० नंतर दर महिना २० लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. हे पत्र मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत महापालिकेने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हा दंड भरण्याचे आदेशही राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयुक्तांना दिले आहेत. हरित लवादाने सर्व महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या संलग्न विभागांना शंभर टक्के कचरा जमा करणे, त्यांचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करणे, त्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी सूचित केले होते. या आदेशांचे अनुपालन न झाल्यास १ एप्रिल २०२० पासून दंड लावण्याचे सूचित करण्यात आले होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार