शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

वसई, विरारमधील नाले सफाई ३० पर्यंत होईल? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:26 IST

पालिकेने ३० मे ला नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शाश्वती दिली असली तरीही छोट्या नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नसून त्यातील गाळ व कचरा तसाच आहे.

विरार : पालिकेने ३० मे ला नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शाश्वती दिली असली तरीही छोट्या नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नसून त्यातील गाळ व कचरा तसाच आहे. तसेच मोठया नाल्यांची सफाई योग्यरित्या होत नसल्यामुळे महापालिकेची नाले सफाई कधी किती व कशी पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसाळा आला की वसई तालुक्यातील नागरिकांना पाणी भरण्याची चिंता सतावत असते. गेल्यावर्षी सर्व प्रयत्न केल्यानंतर व १०० टक्के नाले सफाई झाली असल्याचा दावा करूनही नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला होता तर यावर्षी ते होऊ नये यासाठी पालिकेने जमेल तितके प्रयत्न सुरु केले आहेत. असा दावा महापालिकेकडून होत आहे. पूरस्थिती निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण हे नाले सफाई न होणे हे असल्याने मार्चमध्ये नाले सफाईला सुरवात झाली असून आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे असे महापालिकेचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पालिकेने ४.५ करोड नाले सफाई वर खर्च केला होता यावर्षीही तितकाच खर्च नालेसफाईकरिता करण्यात येणार आहे. तर मोठ्या मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे असा दावा महापालिकेचा आहे. परंतु शहरातील अनेक भागात असलेली छोटी गटारे व नाले यांची सफाई अद्यापही झालेली नाही. तसेच ज्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे त्यांचा गाळ काढून बाहेरच ठेवल्यामुळे तो पुन्हा नाल्यात पडल्याने पावसात नाले पुन्हा तुंबण्याची शक्यता वाढली आहे.गेल्या वर्षी सर्वत्र नाले सफाई करून देखील नागरिकांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला होता तर माजी आयुक्त सतीश लोखंडे यांनी जागो जागी जाऊन स्वत: नाल्यांची पाहणी केली होती. स्वत: आॅडीट केले होते व त्यांचे फोटो काढून सफाईबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवली होती. तसेच लोकांकडूनही तक्र ार व माहिती घेण्यासाठी व्यासपीठ तयार केले होते. मात्र, यावेळी असं काहीच घडतांना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीमुळे अधिकारी व आयुक्त हे निवडणुकीच्या कामात व्यस्त होते तर आता पुन्हा मतमोजणीचे काम सुरु होणार असून अधिकारी त्यात व्यस्त असतील. त्यामुळे ठेकेदाराचे चांगलेच फावले असून नाले सफाईत हात सफाई होतांना दिसत आहे. वसई पश्चिमेकडील माणिकपूर बºहामपूर, आनंदनगर, पांचाळनगर या परिसरातील पाण्याचा निचरा ७६ ओहोळातून होतो. हा भाग रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या खालून गेला आहे. त्यामुळे तेथील सफाई झालेली नाही.कॅल्व्हर्टची सफाई नाहीविशालनगर, शास्त्री नगर, अंबाडी रोड येथील नाल्यामधून सोपारा खाडीत पाणी जाते. याठिकाणी अडथळे येतात त्यामुळे योग्य ती सफाई होत नाही. नालासोपारा पश्चिम, गास, निर्मळ, गिरीज, सांडोर, सालोली व तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपरिषदेचा भाग हा कॅल्व्हर्ट ७८ मधून जातो.छोटया नाल्यांच्या सफाईकडे झाले आहे दुर्लक्षपावसाळयात माणिकपूर, स्टेशन परिसर, आनंद नगर, पूर्र्व भाग, नालासोपारा ते स्टेशन परिसर, आचोळे रोड, अलकापुरी, गालानगर, एव्हर शाइन, शिर्डी नगर, सेंट्रल पार्क, विजय नगर, ओसवाल नगरी, मोरेगांव, तुळींज रोड पश्चिम के निलेमोरे, लक्ष्मीछेडा मार्ग, पाटणकर पार्क, हनुमान नगर, श्रीप्रस्था, विरार पूर्व मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना नानी पार्क, फुलपाडा, स्टेशन परिसर, पश्चिम ते एमबी इस्टेट, बोलींज, स्टेशन रोड इत्यादी ठिकाणी पाणी साचण्याची समस्या होते. याठिकाणी असलेल्या नाल्यांमध्ये अद्यापही घाण साचलेली असून त्याकडे महापालिकेचे लक्ष नाही. ते आता जाणार कधी आणि सफाई होणार कधी?

टॅग्स :Vasai Virarवसई विरार