शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

वसई, विरारमधील नाले सफाई ३० पर्यंत होईल? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:26 IST

पालिकेने ३० मे ला नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शाश्वती दिली असली तरीही छोट्या नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नसून त्यातील गाळ व कचरा तसाच आहे.

विरार : पालिकेने ३० मे ला नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शाश्वती दिली असली तरीही छोट्या नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नसून त्यातील गाळ व कचरा तसाच आहे. तसेच मोठया नाल्यांची सफाई योग्यरित्या होत नसल्यामुळे महापालिकेची नाले सफाई कधी किती व कशी पूर्ण होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसाळा आला की वसई तालुक्यातील नागरिकांना पाणी भरण्याची चिंता सतावत असते. गेल्यावर्षी सर्व प्रयत्न केल्यानंतर व १०० टक्के नाले सफाई झाली असल्याचा दावा करूनही नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला होता तर यावर्षी ते होऊ नये यासाठी पालिकेने जमेल तितके प्रयत्न सुरु केले आहेत. असा दावा महापालिकेकडून होत आहे. पूरस्थिती निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण हे नाले सफाई न होणे हे असल्याने मार्चमध्ये नाले सफाईला सुरवात झाली असून आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे असे महापालिकेचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पालिकेने ४.५ करोड नाले सफाई वर खर्च केला होता यावर्षीही तितकाच खर्च नालेसफाईकरिता करण्यात येणार आहे. तर मोठ्या मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे असा दावा महापालिकेचा आहे. परंतु शहरातील अनेक भागात असलेली छोटी गटारे व नाले यांची सफाई अद्यापही झालेली नाही. तसेच ज्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे त्यांचा गाळ काढून बाहेरच ठेवल्यामुळे तो पुन्हा नाल्यात पडल्याने पावसात नाले पुन्हा तुंबण्याची शक्यता वाढली आहे.गेल्या वर्षी सर्वत्र नाले सफाई करून देखील नागरिकांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला होता तर माजी आयुक्त सतीश लोखंडे यांनी जागो जागी जाऊन स्वत: नाल्यांची पाहणी केली होती. स्वत: आॅडीट केले होते व त्यांचे फोटो काढून सफाईबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवली होती. तसेच लोकांकडूनही तक्र ार व माहिती घेण्यासाठी व्यासपीठ तयार केले होते. मात्र, यावेळी असं काहीच घडतांना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीमुळे अधिकारी व आयुक्त हे निवडणुकीच्या कामात व्यस्त होते तर आता पुन्हा मतमोजणीचे काम सुरु होणार असून अधिकारी त्यात व्यस्त असतील. त्यामुळे ठेकेदाराचे चांगलेच फावले असून नाले सफाईत हात सफाई होतांना दिसत आहे. वसई पश्चिमेकडील माणिकपूर बºहामपूर, आनंदनगर, पांचाळनगर या परिसरातील पाण्याचा निचरा ७६ ओहोळातून होतो. हा भाग रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या खालून गेला आहे. त्यामुळे तेथील सफाई झालेली नाही.कॅल्व्हर्टची सफाई नाहीविशालनगर, शास्त्री नगर, अंबाडी रोड येथील नाल्यामधून सोपारा खाडीत पाणी जाते. याठिकाणी अडथळे येतात त्यामुळे योग्य ती सफाई होत नाही. नालासोपारा पश्चिम, गास, निर्मळ, गिरीज, सांडोर, सालोली व तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपरिषदेचा भाग हा कॅल्व्हर्ट ७८ मधून जातो.छोटया नाल्यांच्या सफाईकडे झाले आहे दुर्लक्षपावसाळयात माणिकपूर, स्टेशन परिसर, आनंद नगर, पूर्र्व भाग, नालासोपारा ते स्टेशन परिसर, आचोळे रोड, अलकापुरी, गालानगर, एव्हर शाइन, शिर्डी नगर, सेंट्रल पार्क, विजय नगर, ओसवाल नगरी, मोरेगांव, तुळींज रोड पश्चिम के निलेमोरे, लक्ष्मीछेडा मार्ग, पाटणकर पार्क, हनुमान नगर, श्रीप्रस्था, विरार पूर्व मनवेलपाडा, कारगिल नगर, नाना नानी पार्क, फुलपाडा, स्टेशन परिसर, पश्चिम ते एमबी इस्टेट, बोलींज, स्टेशन रोड इत्यादी ठिकाणी पाणी साचण्याची समस्या होते. याठिकाणी असलेल्या नाल्यांमध्ये अद्यापही घाण साचलेली असून त्याकडे महापालिकेचे लक्ष नाही. ते आता जाणार कधी आणि सफाई होणार कधी?

टॅग्स :Vasai Virarवसई विरार