शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १०० दिवसांची मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:22 IST

जिल्ह्यात वनहक्क दाव्यांतर्गत जमिनी वाटप केलेल्या लाभार्थ्यांना त्यातून उत्पन्न मिळावे यादृष्टीने योजना राबविण्यात येणार आहेत

पालघर : जिल्ह्यात वनहक्क दाव्यांतर्गत जमिनी वाटप केलेल्या लाभार्थ्यांना त्यातून उत्पन्न मिळावे यादृष्टीने योजना राबविण्यात येणार आहेत. या वनहक्क जमिनीमध्ये उत्पन्न मिळवून देणाºया वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी लागणारी रोपे प्रशासनातर्फे मोफत दिली जाणार आहेत. त्याची जोपासना करण्यासाठी लाभार्थ्यांना वर्षाकाठी १०० दिवसांची मजुरीही देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.या वृक्ष संगोपनातून आलेले उत्पन्न त्यांच्या संवर्धक कुटुंबांना वाटून देण्यात येणार आहे. यामुळे त्यांना उत्पनाचे नवे साधन लाभेल. याचबरोबरीने हे दावे दिल्यानंतर त्यात असलेल्या झाडाच्या नोंदी ठेऊन त्यामार्फत वनसंवर्धनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कातकरी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने प्रशासनाने कातकरी समाज उत्थान अभियान घेण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील कातकरी पाड्यांचे १०० टक्के सर्वेक्षण करून शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी प्रयत्न होणार आहेत. कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांना प्रथम जात प्रमाणपत्राची आवश्यकता लागते. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना जात प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्यासाठी शाळेपासून ते ग्रामसेवकांपर्यंत सर्वांना प्रशिक्षण देऊन ही प्रमाणपत्रे लवकरच दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कातकरी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना शासनातर्फे राबविल्या जातात त्या त्यांच्यापर्यंत मिळून देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. या योजना राबविल्यानंतर त्याचा लेखाजोखा सादर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.१ आॅगस्ट रोजी जिल्हा निर्मितीस ३ वर्षे पूर्ण होण्याच्या निमीत्ताने १ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट अशी पंधरा दिवसासाठी सुवर्णदिप राजस्व अभियान हाती घेणार असून महसूल विभागामार्फत याअंतर्गत वनजमिनी वाटप, वृक्षलागवड, कर्जमाफीसाठी विविध शिबिरे, कातकरी समाज जात प्रमाणपत्र वाटप आदी योजना राबविणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.