शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

श्रमदानातून बांधला वनराई बंधारा; पाण्याची केली साेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 23:55 IST

बंधारा बांधताना खाली सिमेंटच्या गोण्यांत खडी भरून त्या गोण्या एकावर एक रचून बांध तयार केला आहे.

जव्हार : तिलोंडा ग्रामपंचायत हद्दीतील बांबरेपाडा येथील रांजना नदीवर तारा आदिवासी सामाजिक संस्था, स्थानिक तरुण आणि विद्यार्थी यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.

हा अतिदुर्गम आदिवासी व घनदाट जंगल, डोंगरदऱ्यांनी वेढलेला तालुका आहे. या भागात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत असतो. मात्र, पाणी साठवणुकीची व्यवस्था नसल्याने पाणी वाहून जाते. परिणामी, उन्हाळ्यात स्थानिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या बंधाऱ्यांचा उपयोग शेतीसाठी, जनावरांना पाणी पिण्यासाठी, कपडे धुणे आदींसाठी व्हावा तसेच पाण्यासाठी होणारी पायपीट थांबावी यासाठी वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न येथील तरुणांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू केला आहे. 

बंधारा बांधताना खाली सिमेंटच्या गोण्यांत खडी भरून त्या गोण्या एकावर एक रचून बांध तयार केला आहे. यासाठी प्रशांत कामडी, कैलास भोये, सूरज गांगोडा, पंकज चौधरी, आनंद भोये, भावेश साठे, हेमंत हिरकुडा आदी तरुण आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा बंधारा बांधण्यात आला.

उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांसह वनराई बंधारे उपयुक्त ठरतील. या संकल्पनेतून रांजना ओहळ येथे वनराई बंधारा तयार केला आहे. - मोहन हिरकुडा, माजी सरपंच, तिलोंडा ग्रामपंचायत