शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

वसईकरांवर सरणावर लाकडे रचण्याची पाळी, कर्मचाºयांअभावी अंत्यविधीसाठी होते परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:39 IST

वसई विरार महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीत लाकडांची टंचाई आहे. तर कर्मचारी नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनाच दूरुन लाकडे आणून सरणावर रचावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

- शशी करपे वसई : वसई विरार महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीत लाकडांची टंचाई आहे. तर कर्मचारी नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनाच दूरुन लाकडे आणून सरणावर रचावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तर याठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याचेही समोर आले आहे.अंत्यविधीसाठी वसईकरांची परवड होत असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. सुनिल तिवारी यांचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव एव्हरशाईन येथील स्मशानभूमीत नेले होते. त्याठिकाणी पोचल्यानंतर स्मशानात लाकडे नसल्याचे तेथील कर्मचाºयाने सांगितले. यावेळी उपस्थित असलेले मनसेचे प्रशांत खांबे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह लाकडांसाठी सोपारा पश्चिम आणि तुळींज स्मशानभूमीत धाव घेतली. तुळींज स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध नसल्याचे तेथील कर्मचाºयांनी सांगितले. तर सोपारा येथील स्मशानभूमीतील लाकडे ओली असल्याचे निमित्त सांगण्यात आले, अशी माहिती खांबे यांनी दिली.तब्बल एक तास हिंडल्यानंतर खांबे आपल्या सहकाºयांसह स्मशानभूमीत आले असता रस्त्यावर स्मशानभूमीच्या बाहेर ओली लाकडे ठेवण्यात आल्याचे त्यांना दिसले. पण, लाकडे सरणापर्यंत घेऊन जाण्यासाठी स्मशानभूमीत एकही कर्मचारी नव्हता. अखेर खांबे यांचे सहकारी तिवारी यांच्या नातेवाईकांनी दूरवर असलेली लाकडे स्मशानात नेऊन स्वत: चिता रचली. ही लाकडे ओली असल्याने पुढचा त्रास त्यांना सहन करावा लागला.हे कमी म्हणून की काय त्या स्मशानभूमीत हातपाय धुवायलाही पाणी नव्हते. स्मशानात पाण्याची तीव्र टंचाई असते. अनेक लोक अंत्यविधीपूर्वी आणि नंतर स्नान करतात. नातेवाईक हातपाय धुतात. पण, याठिकाणी कधीच पाणी उपलब्ध नसते, असे खांबे यांनी सांगितले.दरम्यान, याप्रकरणी खांबे यांनी थेट आयुक्तांनाच तक्रार केली. स्मशानात लाकडे उपलब्ध होती. एव्हरशाईन स्मशानभूमीत टेम्पो आत जात नसल्याने लाकडे रस्त्याकडेला ठेवण्यात आली होती. लाकडे आतमध्ये नेण्यात येणार होती, अशी सारवा सारव आयुक्त सतीश लोखंडे यांनी तक्रारीनंतर केली. पाचूबंदर येथील स्मशानभूमीला रात्री अकरा वाजता टाळे लावून कर्मचारी गायब झाला होता. तेव्हा बालकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना मृतदेह मांडीवर ठेऊन तब्बल दोन तास ताटकळत बसावे लागल्याचे प्रकार लोकमतने यापूर्वी चव्हाट्यावर आणला होता.

टॅग्स :Governmentसरकार