शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वसईकरांवर सरणावर लाकडे रचण्याची पाळी, कर्मचाºयांअभावी अंत्यविधीसाठी होते परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:39 IST

वसई विरार महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीत लाकडांची टंचाई आहे. तर कर्मचारी नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनाच दूरुन लाकडे आणून सरणावर रचावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

- शशी करपे वसई : वसई विरार महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीत लाकडांची टंचाई आहे. तर कर्मचारी नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनाच दूरुन लाकडे आणून सरणावर रचावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तर याठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याचेही समोर आले आहे.अंत्यविधीसाठी वसईकरांची परवड होत असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. सुनिल तिवारी यांचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव एव्हरशाईन येथील स्मशानभूमीत नेले होते. त्याठिकाणी पोचल्यानंतर स्मशानात लाकडे नसल्याचे तेथील कर्मचाºयाने सांगितले. यावेळी उपस्थित असलेले मनसेचे प्रशांत खांबे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह लाकडांसाठी सोपारा पश्चिम आणि तुळींज स्मशानभूमीत धाव घेतली. तुळींज स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध नसल्याचे तेथील कर्मचाºयांनी सांगितले. तर सोपारा येथील स्मशानभूमीतील लाकडे ओली असल्याचे निमित्त सांगण्यात आले, अशी माहिती खांबे यांनी दिली.तब्बल एक तास हिंडल्यानंतर खांबे आपल्या सहकाºयांसह स्मशानभूमीत आले असता रस्त्यावर स्मशानभूमीच्या बाहेर ओली लाकडे ठेवण्यात आल्याचे त्यांना दिसले. पण, लाकडे सरणापर्यंत घेऊन जाण्यासाठी स्मशानभूमीत एकही कर्मचारी नव्हता. अखेर खांबे यांचे सहकारी तिवारी यांच्या नातेवाईकांनी दूरवर असलेली लाकडे स्मशानात नेऊन स्वत: चिता रचली. ही लाकडे ओली असल्याने पुढचा त्रास त्यांना सहन करावा लागला.हे कमी म्हणून की काय त्या स्मशानभूमीत हातपाय धुवायलाही पाणी नव्हते. स्मशानात पाण्याची तीव्र टंचाई असते. अनेक लोक अंत्यविधीपूर्वी आणि नंतर स्नान करतात. नातेवाईक हातपाय धुतात. पण, याठिकाणी कधीच पाणी उपलब्ध नसते, असे खांबे यांनी सांगितले.दरम्यान, याप्रकरणी खांबे यांनी थेट आयुक्तांनाच तक्रार केली. स्मशानात लाकडे उपलब्ध होती. एव्हरशाईन स्मशानभूमीत टेम्पो आत जात नसल्याने लाकडे रस्त्याकडेला ठेवण्यात आली होती. लाकडे आतमध्ये नेण्यात येणार होती, अशी सारवा सारव आयुक्त सतीश लोखंडे यांनी तक्रारीनंतर केली. पाचूबंदर येथील स्मशानभूमीला रात्री अकरा वाजता टाळे लावून कर्मचारी गायब झाला होता. तेव्हा बालकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांना मृतदेह मांडीवर ठेऊन तब्बल दोन तास ताटकळत बसावे लागल्याचे प्रकार लोकमतने यापूर्वी चव्हाट्यावर आणला होता.

टॅग्स :Governmentसरकार