शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

उत्तन, वसईचे नाखवा दर्यावर !

By admin | Updated: August 6, 2015 02:50 IST

समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे

पालघर : समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे एकमताने ठरविले होते. मात्र, अधिक मासे मिळण्याच्या हव्यासापोटी उत्तन, वसई भागातील काही मच्छीमारांच्या बोटींनी समुद्रात बोटी उतरविल्याने सातपाटी, मुरबे, डहाणू भागातील काही मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यासाठी घेतलेले पास, परवाने देण्यासाठी संस्थांकडे तगादा लावला आहे.केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेली १ जून ते ३१ जुलैपर्यंतची पावसाळी मासेमारीबंदी उलटल्यानंतर कस्टम विभागाने मासेमारीला जाण्यासाठी परवाने जारी केले आहेत. परंतु, समुद्रात अजूनही वादळी वारे व तुफानी लाटा उसळत असल्याने पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील सहकारी संस्थांनी एकमताने ११ आॅगस्टनंतर मासेमारीला जाण्याचा निर्णय घेतल्याचे काही मच्छीमार प्रतिनिधींनी जाहीर केले होते. परंतु, मच्छीमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था या सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांनी डिझेल, बर्फ वितरण बंद करून पासेस देण्यास नकार दिल्याचे राजन तरे या मच्छीमाराने लोकमतला सांगितले. गेल्या वर्षी मासेमारी उत्पादन कमी झाल्याने अनेक मच्छीमार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. समुदातील वादळी वाऱ्यांची सर्वांनाच भीती असते, परंतु सध्या वातावरण शांत असल्याने संस्थांनी पासेस दिल्यास अनेक मच्छीमार मासेमारीला जाण्यास तयार असल्याचे तरे यांनी सांगून वसई, उत्तन भागासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागातील अनेक ट्रॉलर्सही मासेमारीसाठी समुद्रात गेल्याने त्यांना तुम्ही कसे रोखणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन राजन मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता ११ आॅगस्टला मासेमारीला जाण्याचा निर्णय हा समुदात वित्तहानी व आर्थिकहानी होऊ नये, यासाठी सर्वानुमते घेण्यात आलेला निर्णय होता, त्याचे पालन एैच्छिक आहे असे सांगितले.