शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उत्तन, वसईचे नाखवा दर्यावर !

By admin | Updated: August 6, 2015 02:50 IST

समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे

पालघर : समुद्रातील वादळी वारे व तुफानी लाटांच्या पार्श्वभूमीवर पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील मच्छीमारांनी ११ आॅगस्टनंतर समुद्रात मासेमारीला जाण्याचे एकमताने ठरविले होते. मात्र, अधिक मासे मिळण्याच्या हव्यासापोटी उत्तन, वसई भागातील काही मच्छीमारांच्या बोटींनी समुद्रात बोटी उतरविल्याने सातपाटी, मुरबे, डहाणू भागातील काही मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यासाठी घेतलेले पास, परवाने देण्यासाठी संस्थांकडे तगादा लावला आहे.केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेली १ जून ते ३१ जुलैपर्यंतची पावसाळी मासेमारीबंदी उलटल्यानंतर कस्टम विभागाने मासेमारीला जाण्यासाठी परवाने जारी केले आहेत. परंतु, समुद्रात अजूनही वादळी वारे व तुफानी लाटा उसळत असल्याने पालघर, डहाणू, वसई तालुक्यांतील सहकारी संस्थांनी एकमताने ११ आॅगस्टनंतर मासेमारीला जाण्याचा निर्णय घेतल्याचे काही मच्छीमार प्रतिनिधींनी जाहीर केले होते. परंतु, मच्छीमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था या सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांनी डिझेल, बर्फ वितरण बंद करून पासेस देण्यास नकार दिल्याचे राजन तरे या मच्छीमाराने लोकमतला सांगितले. गेल्या वर्षी मासेमारी उत्पादन कमी झाल्याने अनेक मच्छीमार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. समुदातील वादळी वाऱ्यांची सर्वांनाच भीती असते, परंतु सध्या वातावरण शांत असल्याने संस्थांनी पासेस दिल्यास अनेक मच्छीमार मासेमारीला जाण्यास तयार असल्याचे तरे यांनी सांगून वसई, उत्तन भागासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागातील अनेक ट्रॉलर्सही मासेमारीसाठी समुद्रात गेल्याने त्यांना तुम्ही कसे रोखणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन राजन मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता ११ आॅगस्टला मासेमारीला जाण्याचा निर्णय हा समुदात वित्तहानी व आर्थिकहानी होऊ नये, यासाठी सर्वानुमते घेण्यात आलेला निर्णय होता, त्याचे पालन एैच्छिक आहे असे सांगितले.