शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

डबल मास्क वापरा; कोरोनाबाधा टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 23:35 IST

धोका ९५ टक्केने होतो कमी : श्वास घेण्यात अडथळा असल्याचा दावा

जगदीश भोवड

पालघर : डबल मास्क वापरल्याने कोरोनाचा धोका ९५ टक्के कमी होतो, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना संसर्ग होण्याची शक्यता हवेतून अधिक आहे, असे आता दिसून आले आहे. त्यामुळे केवळ एक मास्क न घालता दुहेरी मास्कचा वापर हा अत्यंत प्रभावी ठरू शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र त्याच वेळी श्वास घेण्यास अडथळा येण्याची शक्यताही अन्य डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे.

१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यास परवानगी मिळालेली आहे. मात्र लशींची उपलब्धता अजूनही पुरेशा प्रमाणात झालेली नाही. हा पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत दुहेरी मास्क घालणे फायदेशीर आहे. आधी साधा थ्री फाय मास्क वापरून त्यावर कपड्याचा मास्क लावावा त्यामुळे जवळपास ९५ टक्के संरक्षण मिळते. या मास्कचा वापर लसीकरणाइतकाच प्रभावी आहे. कोरोना चाचण्या करणारे अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या मास्कमुळे निश्चित संरक्षण मिळाले आहे. 

आपल्याला कोविड होऊन गेला असेल, वा नसेल, शरीरामध्ये अँटिबॉडी असेल वा नसेल, तरीही दुहेरी मास्क वापरणे हे अधिक फायदेशीर आहे. अनेकदा आपल्याला गर्दीत जावे लागते. अशा वेळी दुहेरी मास्कमुळे निश्चित संरक्षण मिळते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असल्यामुळे दुहेरी मास्कचा वापर करावा, असे मुंबईस्थित जगप्रसिद्ध डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनोर येथील डॉक्टर आदित्य सातवी यांनी मात्र यामुळे श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो, असे सांगितले.

कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हाच पर्यायकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. कोरोनावर आता प्रतिबंधक लस आलेली आहे, लस घेणे आवश्यक आहे. मात्र तरीही कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हाच उत्तम पर्याय आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रत्येकाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करायलाच हवा. मास्क दुहेरी असेल तर त्याचा प्रत्येकाला फायदा होऊ शकतो.

डॉ. शशांक जोशी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुहेरी मास्क अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आधी साधा थ्री फाय मास्क वापरून त्यावर कपड्याचा मास्क लावावा, त्यामुळे जवळपास ९५ टक्के संरक्षण मिळते. या मास्कचा वापर लसीकरणाइतकाच प्रभावी आहे. कोरोना चाचण्या करणारे अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या मास्कमुळे निश्चित संरक्षण मिळाले आहे.

हे करा, हे करू नकाप्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे, सॅनिटायझर करणे, सामाजिक अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ही त्रिसूत्री अत्यंत आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही कारणानिमित्त जावेच लागले तर कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होणार नाही हे पाहावे. एखादी व्यक्ती खोकत असेल तर तिच्याजवळ जाऊ नये.

एकावर एक दोन मास्क वापरले तर श्वास घेण्यास त्रास होणार. तसेच शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणार. ऑक्सिजन पुरेपूर भेटला नाही तर कमजोरी येऊन आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा एन-९५ मास्क हे उत्तम आहे. सरकारनेही त्यास परवानगी दिली आहे. त्याच्या वापराने कोणताही त्रास होत नाही.- डॉ. आदित्य सातवी, मनोर

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार