शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

शहरी विद्यार्थ्यांनी लुटली भातलावणीची मौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:18 IST

ग्रामीण जीवन ओढ लावणारे : मित्रांनाही प्रेरित करण्याचा मानस

डहाणू/बोर्डी : खेड्यातील निसर्ग शेती आणि शाश्वत जीवनाच्या ओढीने मुंबई शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नरपड गाव गाठूनग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला. पहिल्यांदाच त्यांनी शेतात भात लावणीचे काम करून वनभोजनाचाही आनंद लुटला.

मुंबईस्थित पर्यावरण तज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांच्याकडून जागतिक तापमान वाढ आणि निसर्ग शेती यांविषयीची माहिती बनसोडे सरांच्या माध्यमातून मालाड येथील दालमिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाली. खेड्यातील जीवन पाहण्यासाठी दहा विद्यार्थ्यांचा गट तालुक्यातील नरपड गावात आला. त्यांनी येथील पर्यावरण प्रेमी आणि निसर्गशेतीचे पुरस्कर्ते कुंदन राऊत यांच्या शिवाराला भेट दिली. या परिसरातील शेती व बागायतींची वैशिष्ट आणि यापूर्वी येथे आढळलेल्या बिबट्या, मोर, रानडुक्कर, हायना अशा पशुपक्षांचा वावर आदींची माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली.

काही वेळााने बांधावरून भाताच्या रोपवाटिकेतून रोपांची खणणी करण्याचे प्रात्यक्षित आदिवासी मजुरांनी दाखवल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यास सांगण्यात आले. मात्र, आयुष्यातील हा पहिलाच अनुभव असल्याने हे तंत्र शिकताना त्यांना सुरुवातीला झगडावे लागले. त्यानंतर त्यांनी वन भोजनाचा आनंदही लुटला. दरम्यान या विद्यार्थ्यांना शिवारात अनवाणी येताना काटेकुटे, चिखल,साप इ. भीती वाटली होती. परंतु काही वेळातच हा मऊ चिखल तुडवताना आलेला आनंद अवर्णनीय होता. यापुढेही गवत व भात कापणी, झोडणी अशी कामे करण्यासह येथील चिकू वाडीतील कामाचा अनुभव, झाडावर चढणे याकरिता पुन्हा परतणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना, खेड्यातील शेतीची मौज लुटण्यास शहरी मित्रांना प्रोत्साहित करणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

पर्यावरण तज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत निसर्ग शेती आणि शाश्वत जीवन याविषयी तरु णांना प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी शिवारात उतरून काम केले. त्यांना खेड्यात येऊन काम करायचे आहे हे ऐकून सकारात्मक वाटले. - कुंदन राऊत (शेतकरी, नरपड गाव)

टॅग्स :Farmerशेतकरी