शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्रामीण भागात विनामास्क एसटी प्रवासी वाहतूक; ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ घोषवाक्याला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:03 IST

‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ घोषवाक्याला तिलांजली

खोडाळा : प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना आणि त्याला लाभलेले नागरिकांचे चांगले सहकार्य यामुळे कोविड-१९चा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून कमी झाला होता. तथापि, कोरोना काळात लागू केलेले निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. मात्र, मास्क वापरणे बंधनकारकच होते. ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हे शासनाचे धोरण असले तरी सार्वजनिक ठिकाणी  तथा प्रवासात त्याचा काटेकोर अवलंब होताना दिसत नसल्याने जनतेची बेफिकिरी दिसून येत आहे. 

कोविड-१९चे लसीकरण  अद्याप पूर्ण  झालेले नाही. मोखाडा तालुक्यात आणि प्रामुख्याने खोडाळा बाजारपेठेत रुग्ण दगावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मास्कचा नियमित वापर हाच सध्या तरी कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मास्कचे महत्त्व जनमानसात प्रसारित करण्यासाठी ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ मोहीम  प्रभावी रीतीने राबविण्यात येत आहे. परंतु त्याबाबत लोक दुर्लक्ष करीत आहेत. 

या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला मास्क वापराचे महत्त्व पटवून देणे तसेच कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा, मास्कचा वापर कशा पद्धतीने करावा तसेच त्याची विल्हेवाट कशा रीतीने लावावी याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. असे असले तरीही प्रवासी, व्यापारी, रहिवासी व ग्राहकवर्ग त्याबाबत तितकासा गंभीर नसल्याचे आढळत आहे. त्यामुळे स्थानिक व तालुका प्रशासनाने त्यावर खबरदारीची उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार