शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

ग्रामीण भागात विनामास्क एसटी प्रवासी वाहतूक; ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ घोषवाक्याला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:03 IST

‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ घोषवाक्याला तिलांजली

खोडाळा : प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना आणि त्याला लाभलेले नागरिकांचे चांगले सहकार्य यामुळे कोविड-१९चा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून कमी झाला होता. तथापि, कोरोना काळात लागू केलेले निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. मात्र, मास्क वापरणे बंधनकारकच होते. ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हे शासनाचे धोरण असले तरी सार्वजनिक ठिकाणी  तथा प्रवासात त्याचा काटेकोर अवलंब होताना दिसत नसल्याने जनतेची बेफिकिरी दिसून येत आहे. 

कोविड-१९चे लसीकरण  अद्याप पूर्ण  झालेले नाही. मोखाडा तालुक्यात आणि प्रामुख्याने खोडाळा बाजारपेठेत रुग्ण दगावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मास्कचा नियमित वापर हाच सध्या तरी कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मास्कचे महत्त्व जनमानसात प्रसारित करण्यासाठी ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ मोहीम  प्रभावी रीतीने राबविण्यात येत आहे. परंतु त्याबाबत लोक दुर्लक्ष करीत आहेत. 

या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला मास्क वापराचे महत्त्व पटवून देणे तसेच कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा, मास्कचा वापर कशा पद्धतीने करावा तसेच त्याची विल्हेवाट कशा रीतीने लावावी याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. असे असले तरीही प्रवासी, व्यापारी, रहिवासी व ग्राहकवर्ग त्याबाबत तितकासा गंभीर नसल्याचे आढळत आहे. त्यामुळे स्थानिक व तालुका प्रशासनाने त्यावर खबरदारीची उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार