शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तहसील कार्यालयासमोर आज अनोखे होळी आंदोलन

By admin | Updated: March 10, 2017 03:32 IST

डिसेंबर २०१६ पासून फेब्रुवारी २०१७ या कालावधीत रोहयो वर काम करून घाम गाळलेल्या मजुरांना अजुन मजुरी मिळालेली नाही. अधिकारी वर्गाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे

वाडा/ विक्रमगड/ जव्हार/मोखाडा : डिसेंबर २०१६ पासून फेब्रुवारी २०१७ या कालावधीत रोहयो वर काम करून घाम गाळलेल्या मजुरांना अजुन मजुरी मिळालेली नाही. अधिकारी वर्गाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे या मजुरांवर ऐन सणासुदी उपासमारीची वेळ आली आहे. ऐन होळीच्या सणाच्या तोंडावर मजुरांना पैसे आदिवासी मजुरांवर सरकार आणि प्रशासन अन्याय करत आहे. याबाबत श्रमजीवी संघटना आता आक्र मक झाली असून येत्या १० मार्च रोज पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्र मगड, जव्हार इत्यादी तहसील कचेऱ्या बंद पाडून कार्यालयासमोर छोटी (बारकी) होळी पेटवून सरकारचा निषेध कणार आहे.या भागात कुपोषण नसून रोजगार हमी योजना देखील प्रभावी आहे असे ठासून सांगणाऱ्या सरकारच्या कार्यपद्धतीचे पार धिंडवडे निघाले आहेत. पालघर जिल्ह्यात गेले चार महिने मजुरांच्या घामाचे कष्टाचे पैसे सरकार देत नसल्याने हे सरकार भिकारडे सरकार असल्याचा गंभीर आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला आहे. एकीकडे काम देऊन मजुरी देत नाही तर दुसरीकडे कामाची मागणी करूनही काम मिळत नाही. एकट्या विक्र मगड तालूक्यात ७५५ मजुरांनी कामाची मागणी केलेली मात्र त्यांना काम देण्यात प्रशासन अकार्यक्षम ठरले. या मजूरांनी अखेर बेकार भत्याची मागणी केली आहे. शासन आणि प्रशासनाच्या या बेजबाबदार धोरणामुळे येथील मजुरांवर सद्यस्थितीत अक्षरश: उपासमार ओढवली आहे. (वार्ताहर)राज्य सरकारला पोस्त म्हणून कोंबडीश्रमजीवी संघटनेने याबाबत अनेक पत्र अर्ज विनंत्या करून देखील प्रशासन आपली कार्यपद्धती बदलत नाही. १० मार्च रोजी होणाऱ्या या अन्याया विरोधात तहसील कार्यालयांसमोर होळी पेटवली जाणार आहे. आदिवासी समाजात होळी या सणाला फार महत्व आहे. समाजातील अनिष्ट प्रथा, वाईट रूढी आणि इडा- पीडा या होळीत भस्म व्हावी अशी मानिसकता आहे, म्हणूनच सरकार ला सुबुद्धी मिळावी आणि याभागातील भ्रष्टाचार, अपहार गैर कारभार, या भागातील गरिबांची भूक, आदिवासीबाबतची सरकारची असंवेदनशिलता या वाईट गोष्टी या होळीत भस्म व्हाव्यात या मागणीसाठी हे अभिनव आंदोलन करून येथील मजूर आदिवासी परंपरेप्रमाणे शासनाला आणि राज्य सरकारला कोंबडी पोस्त (भेट) म्हणून देणार आहेत. यासाठी प्रत्येक तहसील कचेरीत हजारो मजूर सहभागी होणार आहेत.