शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

‘स्मार्ट सिटी’साठी एकमत गरजेचे

By admin | Updated: August 9, 2015 23:00 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेला सॅटेलाइट सिटीचा दर्जा देणाऱ्या सरकारने स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट न करून या भागावर अन्याय केला आहे.

दीपक मोहिते, वसईवसई-विरार शहर महानगरपालिकेला सॅटेलाइट सिटीचा दर्जा देणाऱ्या सरकारने स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट न करून या भागावर अन्याय केला आहे. वास्तविक, उपप्रदेश सध्या विकासाच्या वाटेवर असताना असे होणे मुळातच चुकीचे आहे. वाढती लोकसंख्या आणि संसाधनांची उपलब्धता यांची सांगड घालून उपप्रदेशाला विकासाच्या वाटेवर नेणे, हे फार मोठे आव्हान नगरपालिकेसमोर आहे. अशा वेळी केंद्र व राज्य सरकारने या महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे होते. परंतु, नेमके याच योजनेतून महानगरपालिकेला वगळण्यात आले.रेल्वेचे चौपदीकरण, चर्चगेट-डहाणू उपनगरीय रेल्वे सेवा, महानगरपालिकेची निर्मिती, पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता विविध स्तरांवर होत असलेले प्रयत्न, यामुळे उपप्रदेशामध्ये नागरीकरणाला प्रचंड वेग आला आहे. लोकसंख्या सुमारे १९ लाखांवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य व स्वायत्त संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ होणे आवश्यक होते. केंद्र तसेच राज्य सरकारकडून विविध योजना कार्यान्वित करण्यात येत असतात. अशा वेळी ज्या महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशांना नव्या योजनेमध्ये सहभागी करून घ्यायला हवे. महानगरपालिका स्वत:चे आर्थिक स्रोत निर्माण करीत असते. परंतु, पालक म्हणून केंद्र व राज्य सरकारने देखील त्यांची जबाबदारी उचलायला हवी. एकीकडे जकात नाही तर दुसरीकडे स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका केवळ घरपट्टीच्या महसूलातून विकासकामे कशी करू शकेल? सॅटेलाइट सिटी योजनेंंतर्गत मिळालेल्या आर्थिक साहाय्यातून प्रदेशातील अनेक विकासकामे मार्गी लागली, तर अनेक प्रगतीपथावर आहेत. म्हणून स्मार्ट सिटी योजनेत वसई-विरार महानगरपालिकेचा समावेश होणे आवश्यक होते. उपप्रदेशाच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी महानगरपालिकेला अतिरिक्त जलकुंभ उभारणे आवश्यक आहे. विविध शासकीय संस्थांकडून आर्थिक निधी उभारण्याचे काम सुरू आहे. अशा वेळी राजकारण आडवे येता कामा नये. सॅटेलाइट सिटी योजनेसाठी जी महानगरपालिका पात्र ठरते, तीच महानगरपालिका स्मार्ट सिटी योजना प्रक्रियेत का निवडली जाऊ शकत नाही. यामागील तर्कशास्त्र सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे आहे.पालकमंत्री व तमाम लोकप्रतिनिधी अशा महत्त्वाच्या प्रश्नावर एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या उपप्रदेशाचा विकास ही सर्वांची सामूहिक जबाबदारी ठरली पाहिजे, तरच उपप्रदेशाचा खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. भविष्यात महानगरपालिकेसमोर विकासाचे अनेक प्रश्न उभे ठाकणार आहेत. त्यामध्ये पाणी, सांडपाण्याचा निचरा, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींवर मोठी जबाबदारी येते.