शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

विरारमध्ये भिंत कोसळून तीन महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये दोन सख्या बहिणींचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 20:49 IST

विरारच्या येथे सुर्य किरण या इमारतीच्या पुर्निविकासाचे काम सुरू होते.

- मंगेश कराळे

नालासोपारा : विरारच्या मनवेल पाडा येथे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

विरारच्या येथे सुर्य किरण या इमारतीच्या पुर्निविकासाचे काम सुरू होते. या ठिकाणी १२ मजूर काम करत होते. संध्याकाळी काम संपवून मजूर जवळील साचलेल्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेलो होते. पाचच्या सुमारास अचानक तेथील भिंत या मजुरांच्या अंगावर कोसळली आणि ते ढिगार्‍याखाली गाडले गेले.

अग्निशमन दलाच्या मदतीने ढिगारा काढण्यात आला. त्यात कौसाबाई गव्हाणे (४५), राधाबाई नवघरे (४०) आणि नंदाबाई गव्हाणे (३२) या तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी विरारच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे कळते. मयत कामगार हे नाका कामगार असून मराठवाड्यातील आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

मार्च महिन्यात माणिकपूर येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरील सज्जा कोसळला होता. हा सज्जा थेट खाली रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर पडला. यात रिक्षात बसलेली रेणू गुप्ता (३५) या महिलेचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Virarविरार