शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुरगावमधील गाळे अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 07:05 IST

ग्रामपंचायतीवर ठपका : पालघर तहसीलदारांची भूमिका ठरणार महत्वाची

बोईसर : पालघर तालुक्यातील कुरगाव ग्रामपंचायतीने पाचमार्ग नाक्यावर मार्केटसाठी गाळे बांधताना संबंधित खात्याची परवानगी न घेतल्याने ते अनिधकृत असल्याचे पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सुनावणीनंतर निर्णय दिला आहे.

गाळे बांधण्यात आलेली जागा ही आता महाराष्ट्र शासनाच्या नावे असली तरी १९५४ साली ग्रामपंचायतीच्या नावे होती. त्यामुळे तहसीलदारांची भूमीका महत्वाची ठरणार आहे. कुरगांव ग्रामपंचायतीने सर्व्हेे नंबर १७९ मध्ये वर्ष १९८९-९० साली बांधलेल्या अकरा गाळ्यांबाबतची तक्रार तारापूरचे पंचायत समिती सदस्य सुशिल चुरी यांनी २९ सप्टेंबर २०१८ च्या मासिक सर्वसाधारण सभेत उपस्थित केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर संबंधिताची सुनावणी घेऊन निर्णय दिला आहे.

गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिलेल्या निर्णयामध्ये ते बांधकाम करतेवेळी जागेची खातरजमा करणे आवश्यक होते. मात्र, सध्या स्थितीत जागेबाबत तक्रार उपस्थित झाल्यानंतर ती जागा ही महाराष्ट्र शासनाच्या नावे आढळून आली आहे. गाळ्याचे बांधकाम करीत असताना संबंधित खात्याची परवानगी घेऊन बांधकाम करणे आवश्यक होते तसेच, सर्व संबंधितांची जागेची मालकीची खातरजमा करणेही गरजेचे होते. त्यामुळे सदर चे बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, तरी शासन निर्णय महसूल व वनविभाग यांचे शासन परिपत्रक क्र मांक जमीन ०३/ २००९/ प्र क्र /१३/ डज - १/ दिनांक ७ सप्टेंबर , २०१० तसेच महसूल व वन विभाग यांचे शासन परिपत्रक क्र मांक जमिन ०७/२०१३/ प्रक्र ३७३ / प १/ दिनांक १० आॅक्टोंबर, २०१३ नुसार व सरपंच, ग्रामपंचायत कुरगांव यांनी यापूर्वी केलेला पत्रव्यवहार याबाबतीत तहसीलदार पालघर यांना त्यांचे स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे तहसिलदार या संदर्भात काय भूमिका घेतात त्याकडे कुरगांव वासीयांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार गाळे बांधकाम करण्यात आले आहेत. रितसर लिलाव पद्धतीने भाडेतत्वार ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने देण्यात आलेले आहेत. मार्केट गाळ्यांचे बांधकाम केलेल्या जागा १९५४ पासून कुरगांव ग्रामपंचायतीच्या ताब्यात होती. त्यानंतर ती महसूल विभागाने ताब्यात घेतल्याने त्यावरील बांधकाम व सदरची जागा ग्रामपंचायती कडे हस्तांतरीत होण्यासाठी महसुल विभागाकडे मागणी केली आहे.-मयुर पाटील, ग्रामसेवक, कुरगांव ग्रामपंचायतशासकीय योजनांच्या निधीचा गैरवापर करून परवानगी न घेता गाळे बांधण्यात आले असून बांधलेल्या गाळ्यापैकी एकही गाळा गोरगरिबांना देण्यात आला नाही, याबाबत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी-सुशील चुरी,सदस्य, पंचायत समिती पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMumbaiमुंबई