शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

अनधिकृत कोळंबी प्रकल्प उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 00:25 IST

वसईतील भुईगाव येथे महसूल व पालिका प्रशासनाची कारवाई

वसई : भुईगाव खारटन भागातील पाणथळ जमिनीत अनधिकृतपणे उभारलेले कोळंबी प्रकल्प व चाळी कोकण आयुक्त यांच्या आदेशाने बुधवारी निष्कासित करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती याचिकाकर्ते तथा पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली. शासनाने अनधिकृत प्रकल्पांवर कारवाईसाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यानंतर कोकण आयुक्त यांच्या आदेशानुसार तोडू कारवाईचे आदेश वसई महसूल व महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळीच या कारवाईस सुरुवात झाली. यामध्ये वसई महसूल विभागाचे प्रांत, तहसीलदार आणि वसई-विरार महापालिका प्रशासन यांचे उपायुक्त व नगररचना विभाग तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी २०० पेक्षा जास्त पोलीस ताफा, ३० बुलडोझर, ट्रॅक्टर, अग्निशमन दल आदी मोठा फौजफाटा कारवाईच्या ठिकाणी सज्ज झाला होता. पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, फ्रान्सिस डिसोझा, मॅकेन्झी डाबरे व पर्यावरण संवर्धन समिती यांनी कारवाईसाठी मागणी केली होती.पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वसईच्या पश्चिम पट्ट्यातील पाणथळ जागा व कांदळवने वाचावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. मा. मुंबई उच्च न्यायालयात वनशक्ती संस्थेच्या माध्यमातून दाखल जनहित याचिकेवरील आदेशानुसार ही निष्कासन कारवाई होत आहे. या कारवाईचे आम्ही पर्यावरणप्रेमी म्हणून स्वागत करीत आहोत.- समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती समन्वयक, वसई