शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

उपोषणकर्त्या दोन कामगारांची प्रकृती गंभीर

By admin | Updated: May 21, 2017 03:30 IST

गेल्या सहा वर्षा पासून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गोवाडे येथील बिलटेक बिल्डिंग लि. कंपनीच्या विरोधात भारतीय कामगार सेनेने गेल्या आठ

- अरिफ पटेल। लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : गेल्या सहा वर्षा पासून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गोवाडे येथील बिलटेक बिल्डिंग लि. कंपनीच्या विरोधात भारतीय कामगार सेनेने गेल्या आठ दिवसा पासून बेमुदत उपोषण करणाऱ्या दोन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर त्याच ठिकाणी उपचार सुरु आहेत. मात्र कंपनीचे व्यवस्थापक व जी. एम. एकमेकांवर जबाबदारी ढकळत आहेत. तर प्रॉडक्शन मॅनेजर हेल्पर कडून मशीन्स चालवीत आहेत.परिसरातील मनोर, पोचडे, गोवाडे, तांसाई, मासवन, येथील भूमिपुत्र गेल्या सहा वर्षांपासून या कंपनीत मशीन चालविणे व इतर कामे करीत असून त्यांची वार्षिक पगारवाढ, सुट्यांमध्ये वाढ, कामगारांचे पगार एक तारखेला करणे, अल्पदरात जेवण नाश्ता, ड्रेसकोड लागू करावा अशा प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या यासाठी १३ मे पासून भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली संप पुकारून उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या ठिकाणचे पाणी कंपनीने बंद केले आहे तसेच त्या ठिकाणी लाईट देण्याची मागणी केली होती तीही पूर्ण केली नाही त्यामुळे उपोषणस्थळी अंधार असल्याने सर्पदंश होण्याची शक्यता आहे, असे अध्यक्ष अजय गोऱ्हेकर म्हणाले.तसेच नुकतेच बोईसर येथे कामगार आयुक्त माळी यांच्या समोर कंपनी चे जी एम. विजय राऊत, व कामगारांची मिटिंग झाली असता आमच्या हातात काही नाही असे उडवाउडवीचे उत्तर राऊत यांनी दिल्याने काही मार्ग निघाला नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रॉडक्शन मॅनेजर लक्ष्मीकांत खेडेकर हे महेश सातवी यांच्या घरी गेले. व तेथील कामगारांना महेशच्या घरी बोलावून संप मागे घ्या युनियन सोडा याचे परिणाम वाईट होतील असे धमकाविले असे महेश सातवी ,निलेश दुमडा, जगदीश कोळेकर, यांनी सांगितले. सचिव विपुल आंबेकर उपाध्यक्ष संतोष भुयाल म्हणाले की आमच्या कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करू आम्ही आमच्या मागण्यांसाठी संप केला आहे, अध्यक्ष अजय गोऱ्हेकर म्हणाले की गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत संप सुरु आहे त्याची मालक व व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. आमचे कामगार आजारी पडू लागले उद्या आंदोलकांचे काही बरेवाईट काय झाले तर कंपनी कायमची बंद पाडू हे मालकांनी विसरू नये. रणरणत्या उन्हात संप सुरु आहे आणि आमचे पिण्याचे पाणी बंद केले आहे, आंदोलनाच्या ठिकाणी साधा एक बल्बही लाऊ दिलेला नाही. अशी अमानुष वागणूक आम्हाला दिली जाते आहे. तलासरी येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे आता बघू ते काय निर्णय घेतात.