शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

उपोषणकर्त्या दोन कामगारांची प्रकृती गंभीर

By admin | Updated: May 21, 2017 03:30 IST

गेल्या सहा वर्षा पासून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गोवाडे येथील बिलटेक बिल्डिंग लि. कंपनीच्या विरोधात भारतीय कामगार सेनेने गेल्या आठ

- अरिफ पटेल। लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : गेल्या सहा वर्षा पासून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गोवाडे येथील बिलटेक बिल्डिंग लि. कंपनीच्या विरोधात भारतीय कामगार सेनेने गेल्या आठ दिवसा पासून बेमुदत उपोषण करणाऱ्या दोन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर त्याच ठिकाणी उपचार सुरु आहेत. मात्र कंपनीचे व्यवस्थापक व जी. एम. एकमेकांवर जबाबदारी ढकळत आहेत. तर प्रॉडक्शन मॅनेजर हेल्पर कडून मशीन्स चालवीत आहेत.परिसरातील मनोर, पोचडे, गोवाडे, तांसाई, मासवन, येथील भूमिपुत्र गेल्या सहा वर्षांपासून या कंपनीत मशीन चालविणे व इतर कामे करीत असून त्यांची वार्षिक पगारवाढ, सुट्यांमध्ये वाढ, कामगारांचे पगार एक तारखेला करणे, अल्पदरात जेवण नाश्ता, ड्रेसकोड लागू करावा अशा प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या यासाठी १३ मे पासून भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली संप पुकारून उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या ठिकाणचे पाणी कंपनीने बंद केले आहे तसेच त्या ठिकाणी लाईट देण्याची मागणी केली होती तीही पूर्ण केली नाही त्यामुळे उपोषणस्थळी अंधार असल्याने सर्पदंश होण्याची शक्यता आहे, असे अध्यक्ष अजय गोऱ्हेकर म्हणाले.तसेच नुकतेच बोईसर येथे कामगार आयुक्त माळी यांच्या समोर कंपनी चे जी एम. विजय राऊत, व कामगारांची मिटिंग झाली असता आमच्या हातात काही नाही असे उडवाउडवीचे उत्तर राऊत यांनी दिल्याने काही मार्ग निघाला नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रॉडक्शन मॅनेजर लक्ष्मीकांत खेडेकर हे महेश सातवी यांच्या घरी गेले. व तेथील कामगारांना महेशच्या घरी बोलावून संप मागे घ्या युनियन सोडा याचे परिणाम वाईट होतील असे धमकाविले असे महेश सातवी ,निलेश दुमडा, जगदीश कोळेकर, यांनी सांगितले. सचिव विपुल आंबेकर उपाध्यक्ष संतोष भुयाल म्हणाले की आमच्या कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करू आम्ही आमच्या मागण्यांसाठी संप केला आहे, अध्यक्ष अजय गोऱ्हेकर म्हणाले की गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत संप सुरु आहे त्याची मालक व व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. आमचे कामगार आजारी पडू लागले उद्या आंदोलकांचे काही बरेवाईट काय झाले तर कंपनी कायमची बंद पाडू हे मालकांनी विसरू नये. रणरणत्या उन्हात संप सुरु आहे आणि आमचे पिण्याचे पाणी बंद केले आहे, आंदोलनाच्या ठिकाणी साधा एक बल्बही लाऊ दिलेला नाही. अशी अमानुष वागणूक आम्हाला दिली जाते आहे. तलासरी येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे आता बघू ते काय निर्णय घेतात.