शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्या दोन कामगारांची प्रकृती गंभीर

By admin | Updated: May 21, 2017 03:30 IST

गेल्या सहा वर्षा पासून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गोवाडे येथील बिलटेक बिल्डिंग लि. कंपनीच्या विरोधात भारतीय कामगार सेनेने गेल्या आठ

- अरिफ पटेल। लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : गेल्या सहा वर्षा पासून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गोवाडे येथील बिलटेक बिल्डिंग लि. कंपनीच्या विरोधात भारतीय कामगार सेनेने गेल्या आठ दिवसा पासून बेमुदत उपोषण करणाऱ्या दोन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर त्याच ठिकाणी उपचार सुरु आहेत. मात्र कंपनीचे व्यवस्थापक व जी. एम. एकमेकांवर जबाबदारी ढकळत आहेत. तर प्रॉडक्शन मॅनेजर हेल्पर कडून मशीन्स चालवीत आहेत.परिसरातील मनोर, पोचडे, गोवाडे, तांसाई, मासवन, येथील भूमिपुत्र गेल्या सहा वर्षांपासून या कंपनीत मशीन चालविणे व इतर कामे करीत असून त्यांची वार्षिक पगारवाढ, सुट्यांमध्ये वाढ, कामगारांचे पगार एक तारखेला करणे, अल्पदरात जेवण नाश्ता, ड्रेसकोड लागू करावा अशा प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्या यासाठी १३ मे पासून भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली संप पुकारून उपोषणास बसले आहेत. उपोषणाच्या ठिकाणचे पाणी कंपनीने बंद केले आहे तसेच त्या ठिकाणी लाईट देण्याची मागणी केली होती तीही पूर्ण केली नाही त्यामुळे उपोषणस्थळी अंधार असल्याने सर्पदंश होण्याची शक्यता आहे, असे अध्यक्ष अजय गोऱ्हेकर म्हणाले.तसेच नुकतेच बोईसर येथे कामगार आयुक्त माळी यांच्या समोर कंपनी चे जी एम. विजय राऊत, व कामगारांची मिटिंग झाली असता आमच्या हातात काही नाही असे उडवाउडवीचे उत्तर राऊत यांनी दिल्याने काही मार्ग निघाला नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रॉडक्शन मॅनेजर लक्ष्मीकांत खेडेकर हे महेश सातवी यांच्या घरी गेले. व तेथील कामगारांना महेशच्या घरी बोलावून संप मागे घ्या युनियन सोडा याचे परिणाम वाईट होतील असे धमकाविले असे महेश सातवी ,निलेश दुमडा, जगदीश कोळेकर, यांनी सांगितले. सचिव विपुल आंबेकर उपाध्यक्ष संतोष भुयाल म्हणाले की आमच्या कामगारांना धमकावण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करू आम्ही आमच्या मागण्यांसाठी संप केला आहे, अध्यक्ष अजय गोऱ्हेकर म्हणाले की गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत संप सुरु आहे त्याची मालक व व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. आमचे कामगार आजारी पडू लागले उद्या आंदोलकांचे काही बरेवाईट काय झाले तर कंपनी कायमची बंद पाडू हे मालकांनी विसरू नये. रणरणत्या उन्हात संप सुरु आहे आणि आमचे पिण्याचे पाणी बंद केले आहे, आंदोलनाच्या ठिकाणी साधा एक बल्बही लाऊ दिलेला नाही. अशी अमानुष वागणूक आम्हाला दिली जाते आहे. तलासरी येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे आता बघू ते काय निर्णय घेतात.