शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

दुचाक्यांना दंड, रिक्षांना अभय

By admin | Updated: October 7, 2016 05:00 IST

नायगाव परिसरात रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या मोटार सायकलस्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. तर बेकायदा रिक्षांवर कारवाई होत नसल्याने नव्या

वसई : नायगाव परिसरात रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या मोटार सायकलस्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. तर बेकायदा रिक्षांवर कारवाई होत नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नायगाव पश्चिमेला पार्किंगसाठी जागा अतिशय अपुरी असल्याने मोटारसायकली आणि चारचाकी गाड्या रस्त्यालगत ठेऊन शेकडो लोक जातात. या गाड्या पहाटेपासून रात्रीपर्यंत रस्त्यावर बेवारसपणे ठेवल्या जातात. जागा नसल्याने वाहनचालक आपल्या महागड्या गाड्या रस्त्या कडेला कित्येक वर्षांपासून ठेवत आहेत. त्यातच जुलै महिन्यापासून कोसळलेल्या पावसामुळे नायगाव रेल्वे पार्किंगमध्ये पूर्ण पाणी साचून राहिले आहे. तसेच येथे पर्यायी पार्किंग जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्किंग करू लागला आहे. गेल्या महिन्यापासून वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करीत दंड’ वसूल करायला सुुरुवात केली आहे. रात्री कामावरून परतलेल्या चाकरमान्यांना याचा चांगलाच फटका बसला. पर्यायी व्यवस्था नसतांना झालेली कारवाई अन्यायकारक असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. मात्र ही वाहने रस्त्याच्या कडेला काढण्यात आलेल्या सफेद पट्ट्या बाहेर असल्याच्या तक्रार असल्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शिस्तबद्ध पार्किंग केलेल्या वाहनांना अनेकवेळा रिक्षाचालक मुद्दामून रस्त्यावर आणून ठेवत असल्याने प्रवासी तसेच रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची होत असते. अनेकवेळा गाडयांना मुद्दाम पाडण्यात येऊन त्यांची नासधूस करण्यात येते. रिक्षा स्टॅन्ड हा रेल्वेने आरक्षित अ‍ॅम्ब्युलन्स पार्किंगमध्ये उभारला गेल्याने तो बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे करूनही कुठलीच कारवाई केली जात नाही. राज्य सरकारकडून रेल्वे परिसरात उभी केलेली मोफत अ‍ॅम्ब्युलन्स अनेकवेळा याच रिक्षा स्टॅन्डमुळे अडकून पडत असते. तसेच रस्त्यामध्ये बेशिस्तपणाने रिक्षा उभ्या केल्या जात असतांना त्यावर वाहतूक पोलीस का कारवाई करीत नाही? असा सवाल प्रवासी वर्ग विचारू लागला आहे. (प्रतिनिधी) सगळ्यांना समान न्याय लावाच्वसई वाहतूक पोलीस निरीक्षकांनी अलीकडेच लावलेल्या सूचना फलका शेजारीच रिक्षा रस्त्यामधोमध उभ्या केल्या जात असतांनाही केवळ आपल्यावरच कारवाई का? अशी प्रवाशांमध्ये चर्चा आहे. रिक्षांमध्ये ५ प्रवासी भरून वाहतूक केली जाते त्याकडे दुर्लक्ष होते आहे. च्नेहमी दुचाकीचालकांना चौकशी तसेच दंड आकारणीला सामोरे जावे लागते. वाहतूक पोलिसांकडून सर्वांना समान न्याय देण्यात यावा याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या गेल्या आहेत. यावर कुठली कारवाई होते याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे