शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
4
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
5
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
6
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
7
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
8
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
9
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
10
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
11
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
12
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
13
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
14
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
15
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
16
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
17
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
18
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
19
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
20
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री

एकाच कामाची दोन बिले

By admin | Updated: March 30, 2017 05:29 IST

पालघर नगरपरिषदे च्या २०१३-१४ च्या आर्थिक वर्षातील प्रभाग क्र .२५ मधील दोन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाची दोन वेळा

हितेन नाईक / पालघरपालघर नगरपरिषदे च्या २०१३-१४ च्या आर्थिक वर्षातील प्रभाग क्र .२५ मधील दोन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाची दोन वेळा बिले काढून ४ लाख ६४ हजार ५५५ हजार रु पयांची नगरपरिषदेची लूट करण्यात आली आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. या लुटीच्या प्रकारात ठेकेदारासोबत शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा हात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. उद्धवा अजब तुझे सरकार, असे रडगाणे गाण्याची पाळी पालघरवासियांवर आली आहे.नगरपरिषदेने प्रभाग क्र.२४ मध्ये सार्वजनिक बोअरिंग ते प्रल्हाद भुकटे तर मोहपाड्यातील शिंदे यांच्या घरापासून शंकर डोंगरेकर अशा दोन घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ठेकेदार मे. ए.बी.व्ही गोविंदू यांच्या नावाची अनुक्रमे १ लाख ७४ हजार ३६७ रुपये आणि ३ लाख ७८ हजार ६२७ रु पये अशी एकूण ५ लाख ५२ हजार ९९४ रु पये खर्चाच्या निविदा मंजूर करण्यात येऊन ४५ दिवसात काम पूर्ण करण्याची मर्यादा घालण्यात आली होती. आणि या दोन्ही कामांची पूर्तता केल्याने आपल्याला दोन्ही रस्त्याच्या कामांच्या बिलांची रक्कम देण्याची मागणी ठेकेदार गोविंदू यांनी तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे केली.नगरपरिषदेत कार्यरत असलेले अभियंता मिश्रा यांनी रस्त्यांची मोजमापे घेऊन तर अन्य क्लार्क, लेखापाल यांनीही बिले मंजूर करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय नोंदविल्या नंतर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी दोन्ही रस्त्यांच्या कामाची ४ लाख ६४ हजार ४९९ रुपयांच्या धनादेशाची रक्कम ठेकेदार गोविंदू यांनी २६ मार्च २०१४ रोजी नगरपरिषदेच्या बँक खात्यातून वटवूनिह घेतली. परंतु आर्थिक वर्ष बदलल्याने मुख्याधिकारी आवारे यांनी सार्वजनिक निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करण्याच्या हेतूने ठेकेदार गोविंदू, अभियंते मिश्रा आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पुन्हा त्याच कामाची बिले अदा करण्याचे बाकी राहील्याचे दाखविले. पुन्हा ४ लाख ६४ हजार ४९९ हजार रुपयांचा धनादेश बनवून ठेकेदार गोविंदू यांनी १० एप्रिल २०१४ रोजी वरील रक्कम नगरपरिषदेच्या बँक खात्यातून काढूनही घेतली. या लुटीची चर्चा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाली मात्र या लुटीच्या कारस्थानात सहभागी झालेल्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई होतांना दिसत नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षाकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या कडे मागणी करूनही कारवाई केली जात नसल्याने त्यांनी आता पोलीस ठाण्यात फसणुकीचा गुन्हा संबंधितांविरुद्ध दाखल केला जाणार आहे.गेली दोन दशके या पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आताही जनतेने तिला बहुमत दिले आहे असे असतांनाही तिच्या पैशाची अशी लूट सुरू आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख धृतराष्ट्र झाले आहे. जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे देखील गांधारी झाले आहेत.