शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस लाखाची रेती दोन बंदरांतून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:45 IST

महसूल, मेरी टाईम बोर्ड आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून विरारजवळील शिरगाव आणि चिखलडोंगरी रेती बंदरात धाड टाकून २५ लाखाचा रेतीचा चोरटा साठा जप्त केला

विरार : महसूल, मेरी टाईम बोर्ड आणि पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून विरारजवळील शिरगाव आणि चिखलडोंगरी रेती बंदरात धाड टाकून २५ लाखाचा रेतीचा चोरटा साठा जप्त केला. कारवाईत दोन लोखंडी बोटी, एक फायबर बोट, एक सक्शन पंपही जप्त करण्यात आले.वसईचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर आणि तहसिलदार किरण सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या छाप्यात चोरटी रेती काढणा-यांचे कंबरडे मोडण्यात आले. वैतरणा खाडीलगत शिरगाव रेल्वे ब्रीजजवळ खाडीलगत दोन जुन्या लोखंडी बोटी, एक फायबर बोट व एक संक्शन पंप अ़नधिकृतपणे रेती उपसा करीत असल्याचे पथकाच्या निर्दशनास आले. त्याची चाहूल लागताच रेती उपसा करणाºया बोटींवरील आरोपी बोटी व सक्शन पंप तिथेच सोडून पळून गेले. तर तीन आरोपी सक्शन पंप शिरगाव खाडीच्या पाण्यात बुडवून पाण्यात उडी मारून पळून गेले. याकारवाईत ११ लाखाचा चोरटा रेती साठा जप्त करण्यात आला. तर २ लोखंडी बोटी, एक फायबर बोट, एक सक्शन पंप जप्त करण्यात आला. यानंतर पथकाने येथून काही अंतरावर असलेल्या चिखलडोंगरी रेती बंदरावर छापा मारला. त्यात १४ लाखाचा रेतीचा चोरटा साठा हाती लागला. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण करवाढ मागे घेण्यासाठी वसईतील सत्ताधाºयांची धडपडशशी करपे।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : करवाढीमुळे ग्रामीण भागात सुुरु असलेला विरोध लक्षात घेऊन सत्ताधारी बहुजन विकास आघाडीवर करवाढ मागे घेण्यासाठी प्रशासनाला साकडे घालण्याची नामुष्की ओढवली आहे. आघाडीच्या पदाधिकाºयांनी आयुक्तांची भेट घेऊन करवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.ग्रामीण भागात करवाढ करण्याचा प्रशासनाने महासभेत सादर केलेला प्रस्ताव गेल्यावर्षी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने बहुमताच्या जोरावर संमत केला होता. मात्र, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागात प्रत्यक्षात मालमत्ता मागणीची बिले पाठवण्यात आली त्यावेळी त्याठिकाणी दुप्पट करवाढ झाल्याचे उजेडात आले. यावर जनआंदोलन समिती आणि भाजपाने आक्षेप नोंदवून ती मागे घेण्याची मागणी केली होती. तेव्हा प्रशासनाने टप्याटप्याने करवाढ करण्यात येणार असून ग्रामीण आणि शहरी भागात समान कर आकारणी केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण देऊन विरोधकांची करवाढीची मागणी फेटाळून लावली होती.मात्र, जनआंदोलन समितीने करवाढीविरोधात गावागावात चौकसभा घेऊन जनजागृती सुरु केली होती. त्यामुळे महिन्याभरातच ग्रामीण भागात करवाढीविरोधात सूर निघू लागला होता. याची जाणीव होताच सत्ताधाºयांनी आता माघार घेऊन करवाढ झाल्याची कबुली प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर ग्रामीण भागात पुढील पाच वर्षे कुठल्याही प्रकारचा कर वाढणार नाही, असे आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिले होते. आता महापालिका स्थापन होऊन सात वर्षे लोटली आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या व नागरी सुविधा यांचा विचार करता महापालिकेचे उत्पन्न अल्प असल्याने महापालिका हद्दीत समान कर लावण्याचा निर्णय घेऊ़न तो अंमलात आणला. यामुळे ग्रामीण भागात मालमत्ता करात वाढ झाल्याची कबुली महापौर कार्यालयातून दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूद कलम १२९ (अ) प्रमाणे सर्व किंवा कोणतेही मालमत्ता कर टप्याटप्याने वाढवता येतील अशी तरतूद आहे. हे कर लावतांना तत्कालीन ग्रामपंचायतीचे करमूल्य ठरवताना बांधकामाचे वर्ष व प्रकार लक्षात न घेता सरसकट घरपट्टी लावण्यात आली. तसेच शासनाचा शिक्षणकर व रोजगार हमी कर, महापालिकेचे इतर कर शंभर टक्के लावल्यामुळे करांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष पसरला आहे, अशी कबुली महापौर रुपेश जाधव यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार