शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वसईमध्ये तिवरांची घुसमट, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही टंगळमंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:43 IST

प्रशासनाची बेजबाबदारपणा : सोमवार पासून पर्यावरण समितीचे उपोषण

वसई : तिवरांची बेसुमार कत्तल व पाणथळ जमिनीवर होत असलेल्या बेकायदा अतिक्रमणाबाबत वारंवार महसूल व महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही कुठलीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे या दोन्ही विभागातील कार्यरत अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा निषेध करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीने आता पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

त्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक, मॅकेंझी डाबरे समिती त्यांचे शेकडो सहकारी सोमवार पासून वसई तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची माहिती वर्तक यांनी दिली. जोपर्यंत तिवरांची कत्तल व पाणथळ जमिनीवरील अतिक्र मणा विरु द्ध ठोस कारवाईस आरंभ होत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला आहे. उपोषणाचे पत्र वजा निवेदन नुकतेच पर्यावरण संवर्धन समितीने वसई प्रांताधिकारी डॉ. दीपक क्षीरसागर व वसई तहसीलदार किरण सुरवसे यांची भेट घेऊन त्यांना दिले आहे. दरम्यान, वसई पश्चिमेकडील भुईगाव येथे तिवर वृक्षांची कत्तल करून तसेच पाणथळीच्या

जागेवर अतिक्र मण करून त्याठिकाणी कोळंबी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याबाबत महसूल तसेच महापालिकेकडे अनेकदा तक्र ार करूनही त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. तर शासकीय अधिकाºयांच्या उदासिनतेमुळेच मागील दोन ते अडीच वर्षात पाणथळ जमिनीवरील अतिक्र मणात व तिवरांच्या कत्तलीत दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती वर्तक यांनी पुन्हा एकदा वसई प्रांत व तहसीलदारांना दिली आहे. मात्र, कारवाई शुन्य आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही टंगळमंगळच्मुंबई उच्च न्यायालयाने दि.११ जुलै २०१६ रोजी शासनाला वसईतील भुईगाव खारटनातील तोड करून पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम समिती चाळी उभारल्या जात आहेत का ? याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. दि.१८ जुलै २०१६ रोजी सरकारी वकील तथा तत्कालीन प्रांताधिकारी डॉ.दादाराव दातकर यांनी याठिकाणी तिवर वृक्षांची तोड करून पाणथळ जागेत अतिक्र मण समिती बेकायदा बांधकाम झाल्याचे मान्य करीत संबंधितांना नोटीस बजावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचे न्यायालयास सांगितले होते.च्त्यावर न्यायालयाने २५ जुलै २०१६ पर्यंत अनधिकृत बांधकाम समिती चाळीही निष्कासित करून पाणथळ जागेचे संवर्धन करण्याचा सक्त आदेश दिला होता. तथापी त्याचा कालावधी उलटूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ही सरकारी बेफिकिरी उच्च न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचा गंभीर आरोप समीर वर्तक यांनी केला आहे.पालिका उदासीनच !च्गत पावसाळ्यात दि.९ जुलै ते १२ जुलै या काळात वसईत आलेल्या महापुरामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली होती. भविष्यात अशी पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणूनच पर्यावरण संवर्धन समितीने सातत्याने वसई-विरार शहर महापालिका समिती महसूल प्रशासनाची लेखी व तोंडी चर्चा करून उपयोजना सुचवल्या होत्या. मात्र, आजमितीस या प्रकरणी महसूल व पालिका यांनी ठोस अशी कोणतीही कारवाई अथवा उपाययोजना केलेली नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार