शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

डहाणूत खरी लढत राष्ट्रवादी अन् भाजपातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:50 IST

येथील नगर परिषदेची निवडणूक चार दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना सर्व पक्षांच्या तगड्या उमेदवारांनी जोर मारण्यास सुरूवात केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार असून नगरसेवक पदासाठी १०९ जण रिंगणात उतरले आहेत.

- शौकत शेखडहाणू : येथील नगर परिषदेची निवडणूक चार दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना सर्व पक्षांच्या तगड्या उमेदवारांनी जोर मारण्यास सुरूवात केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार असून नगरसेवक पदासाठी १०९ जण रिंगणात उतरले आहेत. वरकरणी ही बहुपक्षीय अन् अपक्षांची लढत वाटत असली तरी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपा यांच्यातच खरी लढत असणार आहे.मतदानाची तारीख १३ वरुन १७ वर गेल्याने उमेदवारांना चांगलाच घाम फुटला असून पैशाचे गणित बसवता बसवता पुरेवाट होत आहे. डहाणू नगर परिषदेवर आजपर्यंत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील्याने शहा यांनी कामांचा ग्राफ मांडून भाजपापुढे आव्हान उभे केले असून पुढील पाच वर्षांमध्ये काय काम करणार याचा ब्लू-प्रिंट मतदारांपुढे मांडून घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्षांचा एलईडी टीव्ही च्या माध्यमातून चौकाचौकामध्ये हायटेक प्रचार सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे मतदारांना ऐकवून भाजपा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे तर राष्ट्रवादीने झालेल्या विकास कामांबरोबर भविष्यातील तरतुदींवर प्रचारात भर दिला आहे. शिवसेनेने स्मार्ट डहाणूचे स्वप्न मतदारांना दाखवले आहे. त्यामुळे डहाणू नगर परिषदेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बविआ यांच्यात पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना स्मार्ट डहाणू करण्यासाठी सत्ता मागत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस विकासासाठी पुन्हा सत्तेची अपेक्षा करीत आहे. तर भ्रष्टाचार मुक्त डहाणू बनवण्यासाठी भाजप कौल मागत आहे.दरम्यान, शहरामध्ये निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून असंख्य वाहनांवरुन निवडणुकीचा प्रचार केला जात आहे. दूसरीकडे लग्नसराईत सुरु असल्याने डहाणूच्या रस्त्यांवर सर्वत्र वाहतूक ठप्प होताना दिसत आहे. वरपांगी जरी सत्ता आपल्यालाच मिळेल असे दावे सर्वपक्ष करीत असले तरी प्रत्येकाच्या मनात प्रत्यक्षात काय घडेल याबाबत धाकधूकच आहे.या सात उमेदवारांमध्ये चूरसनगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भरत राजपूत (भाजप), मिहीर शाह (राष्ट्रवादी काँग्रेस), संतोष शेट्टी (शिवसेना) अशोक माळी (काँग्रेस), दिलीप वळवी (बविआ) तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. अमित नहार (अपक्ष), अनिल पष्टे (अपक्ष) अशा एकूण ७ उमेदवारामंध्ये चुरस आहे. खरी लढत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये होत आहे. मात्र मतदानाची दिनांक १३ वरु न १७ वर लांबणीवर गेल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकीच खर्च वाढला आहे. त्यामुळे खर्चावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक