शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

नवीन चलनाच्या टंचाईने भातखरेदी अडचणीत

By admin | Updated: December 25, 2016 00:31 IST

भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी योजना बारदाना (पोती) अभावी व नविन चलन उपलब्ध होत नसल्याने

- वसंत भोईर, वाडाभाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी योजना बारदाना (पोती) अभावी व नविन चलन उपलब्ध होत नसल्याने रखडली आहे. शेतकऱ्यांनी स्व:ताच्या बारदानांमधुन भात घेऊन यावे व नविन चलन उपलब्ध होईपर्यंत भाताची होणारी किंमत मागु नये या शर्तीवर सद्या महामंडळाच्या काही केंद्रांवर भात खरेदी सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी महामंडळाच्या शर्ती मान्य करून भाताची विक्र ी सुरु केली आहे. तर महामंडळाने अजुन बऱ्याचशा केंद्रावर खरेदी सुरून केल्यामुळे अडलेल्या शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल दराने भाताची रोखीने विक्री करण्यास सुरवात केली आहे.आदिवासी विकास महामंडळांतर्गत पालघर जिल्ह्यात एकाधिकार व आधारभूत योजनांतर्गत भाताची खरेदी केली जाते. आधारभूत योजनेतर्गत जिल्ह्यात एकुण ३५ भातखरेदी केंद्र आहेत. तर एकाधिकार योजनेची एकुण २१ भात खरेदी केंद्र आहेत. नविन चलन व बारदाना अभावी या ५६ केंद्रावर महिनाभरात फक्त ३७०० क्विंटलच भाताची खरेदी झालेली आहे. आधारभूत योजनेंतर्गत जाडे भातासाठी १४७० रु पये प्रति क्विंटल असा दर असून यामध्ये प्रति क्विंटलला दोनशे रु पये वाढवून (बोनस) दिला जाणार आहे. तर एकाधिकार योजनेमध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या भाताचा दर आधारभूत प्रमाणेच आहे, मात्र या योजनेमध्ये बोनस नसतो. मात्र, या खरेदी केंद्रांवर बारीक (लहान दाणा) भाताला १५१० रु पये दर दिला जाणार आहे. १००० व ५०० च्या नोटाबंदीमुळे व नविन नोटांचा चलनाचा अभाव असल्याने सध्या येथील सर्वच भात खरेदी केंद्रावर भाताची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना उधारीने भात द्यावे लागत आहे. त्याच प्रमाणे महामंडळाने बारदानाची उपलब्धता करून न दिल्यामुळे शेतकऱ्यांवरच बारदाणे खरेदी करुन भाताची विक्र ी करण्याची वेळ आली आहे. बारदानाची किंमत अवघी १० रुपये आज बाजारात रिकाम्या बारदानाचा दर २० ते २५ रुपये असताना भात खरेदी केंद्रावर महामंडळाकडून शेतकऱ्यांना फक्त १० रुपयेच दिले जात आहेत. बारदाने पुरविण्यासाठी नुकताच ई निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.लवकरच हा प्रश्न निकाली लागेल, तसेच सद्या बँकेमध्ये चलनाचा तुटवडा असल्याने हुंडीचे पैसै तात्काळ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना रोखीने पैसे देण्यास अडचण निर्माण होत आहे असे, आदिवासी विकास महामंडळ जव्हारचे प्रादेशिक व्यवस्थापक डी.एस.चौधरी यांनी सांगितले.दरम्यान, महामंडळाच्या केंद्रावर भात साठविण्यासाठी गोदामे अपूरे पडत असल्याने खरेदी थांबविली जाते, मात्र असे न करता संबंधीत केद्राजवळील शेतकऱ्यांची घरे गोदामासाठी भाड्याने घ्यावीत व विक्र ीसाठी आलेले शेतकऱ्यांचे सर्व भात खरेदी करावे. अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडूरंग पटारे यांनी केली आहे.