शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

नवीन चलनाच्या टंचाईने भातखरेदी अडचणीत

By admin | Updated: December 25, 2016 00:31 IST

भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी योजना बारदाना (पोती) अभावी व नविन चलन उपलब्ध होत नसल्याने

- वसंत भोईर, वाडाभाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी योजना बारदाना (पोती) अभावी व नविन चलन उपलब्ध होत नसल्याने रखडली आहे. शेतकऱ्यांनी स्व:ताच्या बारदानांमधुन भात घेऊन यावे व नविन चलन उपलब्ध होईपर्यंत भाताची होणारी किंमत मागु नये या शर्तीवर सद्या महामंडळाच्या काही केंद्रांवर भात खरेदी सुरु आहे. काही शेतकऱ्यांनी महामंडळाच्या शर्ती मान्य करून भाताची विक्र ी सुरु केली आहे. तर महामंडळाने अजुन बऱ्याचशा केंद्रावर खरेदी सुरून केल्यामुळे अडलेल्या शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल दराने भाताची रोखीने विक्री करण्यास सुरवात केली आहे.आदिवासी विकास महामंडळांतर्गत पालघर जिल्ह्यात एकाधिकार व आधारभूत योजनांतर्गत भाताची खरेदी केली जाते. आधारभूत योजनेतर्गत जिल्ह्यात एकुण ३५ भातखरेदी केंद्र आहेत. तर एकाधिकार योजनेची एकुण २१ भात खरेदी केंद्र आहेत. नविन चलन व बारदाना अभावी या ५६ केंद्रावर महिनाभरात फक्त ३७०० क्विंटलच भाताची खरेदी झालेली आहे. आधारभूत योजनेंतर्गत जाडे भातासाठी १४७० रु पये प्रति क्विंटल असा दर असून यामध्ये प्रति क्विंटलला दोनशे रु पये वाढवून (बोनस) दिला जाणार आहे. तर एकाधिकार योजनेमध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या भाताचा दर आधारभूत प्रमाणेच आहे, मात्र या योजनेमध्ये बोनस नसतो. मात्र, या खरेदी केंद्रांवर बारीक (लहान दाणा) भाताला १५१० रु पये दर दिला जाणार आहे. १००० व ५०० च्या नोटाबंदीमुळे व नविन नोटांचा चलनाचा अभाव असल्याने सध्या येथील सर्वच भात खरेदी केंद्रावर भाताची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना उधारीने भात द्यावे लागत आहे. त्याच प्रमाणे महामंडळाने बारदानाची उपलब्धता करून न दिल्यामुळे शेतकऱ्यांवरच बारदाणे खरेदी करुन भाताची विक्र ी करण्याची वेळ आली आहे. बारदानाची किंमत अवघी १० रुपये आज बाजारात रिकाम्या बारदानाचा दर २० ते २५ रुपये असताना भात खरेदी केंद्रावर महामंडळाकडून शेतकऱ्यांना फक्त १० रुपयेच दिले जात आहेत. बारदाने पुरविण्यासाठी नुकताच ई निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.लवकरच हा प्रश्न निकाली लागेल, तसेच सद्या बँकेमध्ये चलनाचा तुटवडा असल्याने हुंडीचे पैसै तात्काळ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना रोखीने पैसे देण्यास अडचण निर्माण होत आहे असे, आदिवासी विकास महामंडळ जव्हारचे प्रादेशिक व्यवस्थापक डी.एस.चौधरी यांनी सांगितले.दरम्यान, महामंडळाच्या केंद्रावर भात साठविण्यासाठी गोदामे अपूरे पडत असल्याने खरेदी थांबविली जाते, मात्र असे न करता संबंधीत केद्राजवळील शेतकऱ्यांची घरे गोदामासाठी भाड्याने घ्यावीत व विक्र ीसाठी आलेले शेतकऱ्यांचे सर्व भात खरेदी करावे. अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडूरंग पटारे यांनी केली आहे.