शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आदिवासींची होणार उपासमार: मासिक धान्यकोट्यात ३० किलोची केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:27 IST

राज्यातील आदिवासी, गरीब, विधवा व वयोवृद्ध निराधार आणि अंत्योदय योजनेचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांचा समावेश नागरी पुरवठा विभागाने अन्न प्राधान्य योजनेत केल्यामुळे त्यांना

पालघर : राज्यातील आदिवासी, गरीब, विधवा व वयोवृद्ध निराधार आणि अंत्योदय योजनेचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांचा समावेश नागरी पुरवठा विभागाने अन्न प्राधान्य योजनेत केल्यामुळे त्यांना मिळणा-या दरमहा ३५ किलो ऐवजी अवघे पाच किलो धान्य मिळणार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली असून त्या विरोधात आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवीने मोर्चा काढला होता.पालघर जिल्ह्यातील १३ हजार ४५४, ठाणे जिल्ह्यातील १० हजार ३००, रायगड जिल्ह्यातील १४ हजार ३००, नाशिक जिल्ह्यातील ८ हजार, असे एकूण ४६ हजार ५४ लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेतून कमी केल्याने त्यांना दरमहा मिळणारे ३५ किलो धान्य आता अवघे ५ किलो मिळणार आहे. कारण त्यांचा अन्न सुरक्षा योजनेच्या प्राधान्य यादीत समावेश करण्याचे आदेश नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढले आहेत. या परिपत्रकामुळे शिधापत्रिकेवर एक किंवा दोन लाभार्थी असलेल्या कुटुंबांवर अन्याय झालेला आहे. आज पालघर, ठाणे, नाशिक, इ. जिल्ह्यात भुकेमुळे व रोजगार नसल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. शासन एका बाजूला कातकरी समाजाचा विकास व्हावा ह्यासाठी विविध कार्यक्र म राबवित असताना दुसरीकडे त्यांचा अन्नधान्याचा मासिक कोटा कमी केला गेला आहे. श्रमजीवीचे उपाध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, सुरेश रेंजड, उल्हास भानुशाली, अनिता धांगडा, विमल परेड इ. च्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.न्यायालयाचा अवमान-नागरी पुरवठा विभागाचे हे अन्याय परिपत्रक रद्द करावे, या विभागांतर्गत अन्न अधिकारासाठी ज्या योजना सुरू आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धान्य पुरवठा करावा, समाजातील दुर्बलांसाठीच्या योजना अंमलात न आणल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतले असल्याने पुरवठा विभागाने काढलेले हे परिपत्रक न्यायालयाचा अवमान करणारा आहे असे निवेदन देण्यात आले.