शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

आदिवासी खलाशी परराज्यातील बंदराकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:06 IST

रोजगाराअभावी आठ महिने बाहेर : प्रशासनाचे अपयश; शासकीय अनास्थेमुळे स्थलांतर

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यात स्थानिक पातळीवर रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने हजारो आदिवासी महाराष्ट्रासह गोवा आणि गुजरातच्या मासेमारी बंदराकडे स्थलांतर करतात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात या प्रक्रियेस सुरुवात झाली असून त्यांना वर्षातील आठ महिने घरापासून लांब राहावे लागणार आहे. अनेक सरकारे आली, मात्र ही समस्या जैसे थे असून शासकीय अनास्थेमुळेच हा वनवास त्यांना भोगावा लागतो आहे.

डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. येथे मासेमारी व्यवसायाकरिता अकुशल कामगार तुटपुंज्या मजुरीवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्याचा लाभ गोवा आणि गुजरात बंदरातील मासेमारी व्यावसायिक घेतात. एक फिशिंग २० ते २५ दिवसांची असल्याने बंदरातून निघण्यापूर्वी इंधन, जाळी, स्वयंपाकाचे साहित्य, पिण्याचे पाणी भरण्याची सर्व प्रकारची कामे खलाशांनाच करावी लागतात. खोल समुद्रात मासेमारी जाळी टाकण्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरु वात होते. तेथे हाती आलेल्या माशांची वर्गवारी, प्रतवारी करून बर्फ आणि मीठ इ.मध्ये त्यांच्या साठविण्याचे आणि स्वयंपाकाचे काम करावे लागते. आॅगस्ट ते मे या काळात सुमारे दहा फिशिंग केल्या जातात.

मात्र खलाशांना मिळणारे उत्पन्न खूपच तुटपुंजे असते. मासेमारी हंगामाच्या प्रारंभीच्या टप्यात जास्तीचा नफा कमाविण्यासाठी बोट मालकांकडून तांडेलला बोनसचे आमिष दिले जाते. त्याला बळी पडून अजस्त्र लाटांचा सामना करीत खलाशांचा जीव धोक्यात घालून मासेमारी होते.

या वादळ आणि जोरदार पावसाच्या तडाख्यात सापडून आजतागायत अनेक खालशांना जीव गमवावा लागला आहे. बहुतेक खलाशांकडे बायोमेट्रिक कार्ड नसून रीतसर नोंदींचाही अभाव आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून खलाशी स्थलांतरीत होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सुमारे १० आॅगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. कुटुंबापासून दूर जाण्यास खलाशी नकार देतात. यामुळे बोटमालकांकडून त्यांना अनेक आमिष दाखवले जाते.