शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आदिवासी खलाशी परराज्यातील बंदराकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:06 IST

रोजगाराअभावी आठ महिने बाहेर : प्रशासनाचे अपयश; शासकीय अनास्थेमुळे स्थलांतर

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यात स्थानिक पातळीवर रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने हजारो आदिवासी महाराष्ट्रासह गोवा आणि गुजरातच्या मासेमारी बंदराकडे स्थलांतर करतात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात या प्रक्रियेस सुरुवात झाली असून त्यांना वर्षातील आठ महिने घरापासून लांब राहावे लागणार आहे. अनेक सरकारे आली, मात्र ही समस्या जैसे थे असून शासकीय अनास्थेमुळेच हा वनवास त्यांना भोगावा लागतो आहे.

डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. येथे मासेमारी व्यवसायाकरिता अकुशल कामगार तुटपुंज्या मजुरीवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्याचा लाभ गोवा आणि गुजरात बंदरातील मासेमारी व्यावसायिक घेतात. एक फिशिंग २० ते २५ दिवसांची असल्याने बंदरातून निघण्यापूर्वी इंधन, जाळी, स्वयंपाकाचे साहित्य, पिण्याचे पाणी भरण्याची सर्व प्रकारची कामे खलाशांनाच करावी लागतात. खोल समुद्रात मासेमारी जाळी टाकण्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरु वात होते. तेथे हाती आलेल्या माशांची वर्गवारी, प्रतवारी करून बर्फ आणि मीठ इ.मध्ये त्यांच्या साठविण्याचे आणि स्वयंपाकाचे काम करावे लागते. आॅगस्ट ते मे या काळात सुमारे दहा फिशिंग केल्या जातात.

मात्र खलाशांना मिळणारे उत्पन्न खूपच तुटपुंजे असते. मासेमारी हंगामाच्या प्रारंभीच्या टप्यात जास्तीचा नफा कमाविण्यासाठी बोट मालकांकडून तांडेलला बोनसचे आमिष दिले जाते. त्याला बळी पडून अजस्त्र लाटांचा सामना करीत खलाशांचा जीव धोक्यात घालून मासेमारी होते.

या वादळ आणि जोरदार पावसाच्या तडाख्यात सापडून आजतागायत अनेक खालशांना जीव गमवावा लागला आहे. बहुतेक खलाशांकडे बायोमेट्रिक कार्ड नसून रीतसर नोंदींचाही अभाव आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून खलाशी स्थलांतरीत होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सुमारे १० आॅगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. कुटुंबापासून दूर जाण्यास खलाशी नकार देतात. यामुळे बोटमालकांकडून त्यांना अनेक आमिष दाखवले जाते.