शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
4
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
5
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
6
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
7
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
8
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
9
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
10
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
11
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
12
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
13
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
15
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
16
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
17
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
18
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
19
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

आदिवासींवर आजही अत्याचार! छत्तीसगडच्या राज्यपालांनी मांडले समाजबांधवांचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 22:44 IST

शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नसल्याचे सांगून आपली होणारी लूट रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली

पालघर : अनेक राज्यांत विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी शासनाला अथवा खाजगी उद्योगपतींना हस्तांतर करताना त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराने नोकऱ्या व नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे आजही आदिवासींवर अन्याय-अत्याचार होत असून या समाजाला आपल्या हक्कांसाठी झगडत राहावे लागत असल्याचे वास्तव छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसया उईके यांनी पालघरमध्ये आयोजित २७व्या आदिवासी एकता महासंमेलनात मांडले.

पालघर येथे आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आदिवासी संस्कृती एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल उईके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्ष बबलुभाई निकोडिया, खासदार राजेंद्र गावित, मध्य प्रदेशचे मंत्री ओमकार मरकाम, युनोच्या आदिवासी मंचाचे उपाध्यक्ष फुलमंद चौधरी, एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, अशोक चौधरी, वाहरू सोनावणे, आ.श्रीनिवास वणगा, राजेश पाटील, सुनील भुसारा, डॉ.विश्वास वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी समाजावर आजही मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून त्यांना त्यांच्या जंगलातून, जमिनीतून बेदखल केले जात आहे. त्यांना वनपट्टे दिले जात असल्याचे सांगितले जात असले तरी जमिनीचा ताबा मिळत नसून त्यांचे हक्क आणि डावलले जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले. संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेने ठराव घेतल्यानंतरही आदिवासींच्या जमिनीवर प्रकल्प उभे राहात आहेत. त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून त्यांच्या सह्या अथवा अंगठे घेतले जात असल्याचे झारखंडमध्ये उभारण्यात येणाºया एका स्टील प्लांटचे नाव घेता त्यांनी सांगितले. अशी जबरदस्ती केली जात असेल तर ती सहन केली जाणार नाही, असेही राज्यपाल उईके यांनी सांगितले.

जल, जंगल आणि जमीन या आदिवासी समाजाच्या महत्त्वपूर्ण बाबी वाचविण्यासाठी जगभरातील आदिवासींनी एकत्र येण्याची गरज युनोचे चौधरी यांनी विशद करीत हे वाचविण्यात आपल्याला अपयश आल्यास आदिवासींचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मानवी उत्क्रांतीनंतर धान्याच्या माध्यमातून पहिली गुलामी आपण स्वीकारल्याचे सांगून शस्त्र, शास्त्र, पैसे आणि आता डिजिटलच्या गुलामीत आपण अडकल्याचे अशोक चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.

मूल्यवान अशी आदिवासी संस्कृती टिकवून ठेवणाºया समाजात जन्माला आल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगून देशात विकासाच्या नावाखाली उभारलेल्या इमारती आणि प्रकल्पात विटा आणि घाम आमचा असल्याचे मध्य प्रदेशचे मंत्री मरकाम यांनी सांगितले.

शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नसल्याचे सांगून आपली होणारी लूट रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली, तर आदिवासी एकता परिषदेच्या स्थापनेपासून चळवळीत असल्याचा अभिमान असल्याचे सांगून जमिनीचे खरे रक्षणकर्ते असतानाही आम्हाला रानटी समजले जात असल्याचा खेद व्यक्त करीत आम्ही खरे विज्ञानवादी असल्याचे खा. गावितांनी सांगितले.