शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

आदिवासींवर आजही अत्याचार! छत्तीसगडच्या राज्यपालांनी मांडले समाजबांधवांचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 22:44 IST

शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नसल्याचे सांगून आपली होणारी लूट रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली

पालघर : अनेक राज्यांत विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी शासनाला अथवा खाजगी उद्योगपतींना हस्तांतर करताना त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराने नोकऱ्या व नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे आजही आदिवासींवर अन्याय-अत्याचार होत असून या समाजाला आपल्या हक्कांसाठी झगडत राहावे लागत असल्याचे वास्तव छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसया उईके यांनी पालघरमध्ये आयोजित २७व्या आदिवासी एकता महासंमेलनात मांडले.

पालघर येथे आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आदिवासी संस्कृती एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल उईके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्ष बबलुभाई निकोडिया, खासदार राजेंद्र गावित, मध्य प्रदेशचे मंत्री ओमकार मरकाम, युनोच्या आदिवासी मंचाचे उपाध्यक्ष फुलमंद चौधरी, एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, अशोक चौधरी, वाहरू सोनावणे, आ.श्रीनिवास वणगा, राजेश पाटील, सुनील भुसारा, डॉ.विश्वास वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी समाजावर आजही मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून त्यांना त्यांच्या जंगलातून, जमिनीतून बेदखल केले जात आहे. त्यांना वनपट्टे दिले जात असल्याचे सांगितले जात असले तरी जमिनीचा ताबा मिळत नसून त्यांचे हक्क आणि डावलले जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले. संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेने ठराव घेतल्यानंतरही आदिवासींच्या जमिनीवर प्रकल्प उभे राहात आहेत. त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून त्यांच्या सह्या अथवा अंगठे घेतले जात असल्याचे झारखंडमध्ये उभारण्यात येणाºया एका स्टील प्लांटचे नाव घेता त्यांनी सांगितले. अशी जबरदस्ती केली जात असेल तर ती सहन केली जाणार नाही, असेही राज्यपाल उईके यांनी सांगितले.

जल, जंगल आणि जमीन या आदिवासी समाजाच्या महत्त्वपूर्ण बाबी वाचविण्यासाठी जगभरातील आदिवासींनी एकत्र येण्याची गरज युनोचे चौधरी यांनी विशद करीत हे वाचविण्यात आपल्याला अपयश आल्यास आदिवासींचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मानवी उत्क्रांतीनंतर धान्याच्या माध्यमातून पहिली गुलामी आपण स्वीकारल्याचे सांगून शस्त्र, शास्त्र, पैसे आणि आता डिजिटलच्या गुलामीत आपण अडकल्याचे अशोक चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.

मूल्यवान अशी आदिवासी संस्कृती टिकवून ठेवणाºया समाजात जन्माला आल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगून देशात विकासाच्या नावाखाली उभारलेल्या इमारती आणि प्रकल्पात विटा आणि घाम आमचा असल्याचे मध्य प्रदेशचे मंत्री मरकाम यांनी सांगितले.

शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नसल्याचे सांगून आपली होणारी लूट रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली, तर आदिवासी एकता परिषदेच्या स्थापनेपासून चळवळीत असल्याचा अभिमान असल्याचे सांगून जमिनीचे खरे रक्षणकर्ते असतानाही आम्हाला रानटी समजले जात असल्याचा खेद व्यक्त करीत आम्ही खरे विज्ञानवादी असल्याचे खा. गावितांनी सांगितले.