शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आदिवासींचा विकास कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:24 IST

शासनाने आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या मात्र त्यांची काटेकोर अंमलबाजवणी अभावी नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : शासनाने आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या मात्र त्यांची काटेकोर अंमलबाजवणी अभावी नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, समस्या निवरण्यात चालढकल करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.तालुक्यातील कैनाड ग्रामपंचायती अंतर्गत कडूपाडा येथील मोरी दोन वर्षांपूर्वी पुरात वाहून गेली. स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी या ग्रामपंचायतीने निधी उपलब्ध करून तात्पुरती डागडुजी केली. मात्र, यावर्षी पुन्हा पुरामुळे जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या पाड्यावरील रु ग्ण, गरोदर महिला, स्तनदमाता, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि चाकरमाण्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात वाहत्या ओहळातून वाट काढण्यासाठी चादरीची झोळी करून रु ग्णांना न्यावे लागत होते. त्यावरून स्तनदामाता व गर्भवतींवर ओढावणाºया परिस्थितीची कल्पना येते. दुचाकीला खांद्यावर उचलून ओहळ ओलांडल्याचे अनुभव ग्रामस्थांकडून ऐकताना अंगावर काटा येतो. या बाबत सदर ग्रामपंचायतीकडून लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे. मात्र आजही परिस्थिती बदलली नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.चिखले गावातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मोठमोठ्या खड्यांनी अनेक अपघात घडले असून मान, कंबर, मणका अशा विविध आजारांनी ग्रामस्थांना ग्रासले आहे. बँकेतील कर्ज काढून खरेदी केलेली वाहनं वर्षाच्या आतच खिळखिळी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्ता मंजूर झाला आहे. वर्क आॅर्डर काढण्यात आली असून दिवाळींनंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल अशी आश्वासने बांधकाम विभागाकडून दिली जातात. स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र आपण विकास कामं आणल्याच्या बाता मारतात, काम सुरू करण्या कडे लक्ष देत नाही अशी स्थिती आहे. चिखले रेल्वे फाटकापासून सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता दोन वर्षापूर्वी करण्यात आला. मात्र भाईपाडा येथे डांबराचा थर सहा महिन्यात वाहून गेला. वाकी ग्रामपंचायतीला २०१६-१७ सालचा पेसा ५ टक्के निधी मिळालेला नाही. या करीता डहाणू पंचायत समिती ते पालघर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे सदर ग्रामपंचायत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र, मंजूर निधी मिळविण्यात अडचणींचासामना करावा लागत आहे. तथापी निधी अभावी ग्राम विकास साधणार कसा हा असा प्रश्न पंचायतीला पडला आहे.