शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

स्वतंत्र ग्रामपंचायतींची आदिवासींची मागणी

By admin | Updated: December 8, 2015 00:22 IST

डहाणू तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात तीन ते चार गावांसाठी एकच ग्रामपंचायत असून ४० वर्षांपासून या ग्रामपंचायतीचे विभाजनच झाले नसल्याने ग्रामीण

कासा : डहाणू तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात तीन ते चार गावांसाठी एकच ग्रामपंचायत असून ४० वर्षांपासून या ग्रामपंचायतीचे विभाजनच झाले नसल्याने ग्रामीण भागात विकासकामांवर मर्यादा येत आहेत. वारंवार मागणी करूनही शासनस्तरावर त्याची दखल घेतली जात नाही.तालुक्यातील १. कासा ग्रामपंचायतीत कासा, भिसेनगर, घोळ व भराड गावांचा समावेश आहे. २. उर्से ग्रामपंचायत - उर्से, म्हसाड, आंबिस्ते, साये या चार गावांचा समावेश आहे. ३. तवा ग्रामपंचायत - तवा, कोल्हाण, धामटणे, पेठ ही चार गावे समाविष्ट आहेत. ४. महालक्ष्मी ग्रामपंचायत - महालक्ष्मी, आंवढाणी, सोनाळे, खाणीव ही चार गावे आहेत. ५. सारणी ग्रामपंचायतीत सारणी, आंबिवली व निकावली ही तीन गावे समाविष्ट आहेत. ६. ओसरवीरा ग्रामपंचायतीत ओसरवीरा, दहयाळे, कांदरवाडी ही तीन गावे येतात. ७. वेती ग्रामपंचायतीत - वेती, वरोती व सूर्यानगर ही तीन गावे समाविष्ट आहेत. ८. मुरबाड ग्रामपंचायतीत - मुरबाड, वांगर्जे व पिंपळशेत ही तीन गावे समाविष्ट आहेत. तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायतींत अशी तीन ते चार गावे मिळून आहेत.आता प्रत्येक ग्रामपंचायतीची लोकसंख्या ५ हजारांच्या जवळपास काही ग्रामपंचायतींची लोकसंख्या तर १० हजारांपर्यंत आहे. ग्रुपग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट गावे परस्परांपासून दूर आहेत. तर ग्रा.पं. कार्यालय एकाच गावी असल्याने काही गावांना ५ ते ८ कि.मी. अंतर कापून येथे यावे लागते. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. तसेच विविध शासकीय योजनांची माहितीही नागरिकांना मिळत नाही. तसेच ग्रामसेवक व सरपंच वेळोवेळी कार्यालयात येत नसल्याने विविध दाखल्यांस अनेक हेलपाटे मारावे लागतात. तसेच विकासकामांवरही मर्यादा येतात. (वार्ताहर)