शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाकरीच्या शोधात आदिवासी शहरांकडे

By admin | Updated: November 22, 2015 00:16 IST

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण तालुक्यांमध्ये आदिवासी वेठबिगार मजुरांचे रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने स्थलांतर सुरु झाले आहे. पालघरच्या मोखाडा, वाडा, जव्हार, विक्र मगड

शहापूर/मुरबाड : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण तालुक्यांमध्ये आदिवासी वेठबिगार मजुरांचे रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने स्थलांतर सुरु झाले आहे. पालघरच्या मोखाडा, वाडा, जव्हार, विक्र मगड, तलासरी तर ठाणेच्या मुरबाड, कल्याण, भिवडीतील लाखो आदिवासी मजूर भाकरीच्या शोधात मुंबई, नाशिक, नवी मुंबईसह गुजरातमध्ये स्थलांतराच्या वाटेवर आहेत. एकट्या शहापूर तालुक्यात आतापर्यंत पंधरा हजार विटभट्टी मजुरांचे स्थलातर झाले आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकास प्रकल्प विभाग व तहसिलदार कार्यालयाने अद्यापी या स्थलांतराची साधी दखलही घेतलेली नाही. शिवाय स्थलांतरीतांची अधिकृत आकडेवारीच या सरकारी कार्यालयांकडे नसल्याचे धक्कादायक वास्तव या निमित्ताने उजेडात आले आहे. आदिवासी मजुरांचे रोज शेकडोंच्या संख्येने सर्वाधिक स्थलांतर शेजारच्या पालघर जिल्ह्यातून सूरु आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा हे पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्यातीलच असूनही मागच्याच वर्षीचे स्थलांतराचे चित्र या वर्षी देखील येथे कायम आहे. गेल्या काही वर्षात महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना व २०१५ मध्ये राबविली जात असलेली जलशिवार योजना ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात पुरत्या अपयशी ठरल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकारी धोरण असूनही आदिवासी मजूरांना राहत्या गावांतच हाताला काम उरलेले नसून स्थलांतर रोखण्यासाठीच्या सरकारी उपाय योजना फक्त कागदावरच आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे. अशा मुलांचा शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून स्थलांतराच्या ठिकाणी शाळेत समावेश करण्याची शासन योजना असली तरी मागील काही वर्षांचा इतिहास पाहता शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच आहेत. आदिवासी आश्रमशाळा व जिल्हा परिषद शिक्षण विभागाची शाळाबाह्य विद्यार्थ्यासाठीची मोहीम अक्षरश: तकलादु ठरत आहे.