शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

भाकरीच्या शोधात आदिवासी शहरांकडे

By admin | Updated: November 22, 2015 00:16 IST

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण तालुक्यांमध्ये आदिवासी वेठबिगार मजुरांचे रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने स्थलांतर सुरु झाले आहे. पालघरच्या मोखाडा, वाडा, जव्हार, विक्र मगड

शहापूर/मुरबाड : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण तालुक्यांमध्ये आदिवासी वेठबिगार मजुरांचे रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने स्थलांतर सुरु झाले आहे. पालघरच्या मोखाडा, वाडा, जव्हार, विक्र मगड, तलासरी तर ठाणेच्या मुरबाड, कल्याण, भिवडीतील लाखो आदिवासी मजूर भाकरीच्या शोधात मुंबई, नाशिक, नवी मुंबईसह गुजरातमध्ये स्थलांतराच्या वाटेवर आहेत. एकट्या शहापूर तालुक्यात आतापर्यंत पंधरा हजार विटभट्टी मजुरांचे स्थलातर झाले आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकास प्रकल्प विभाग व तहसिलदार कार्यालयाने अद्यापी या स्थलांतराची साधी दखलही घेतलेली नाही. शिवाय स्थलांतरीतांची अधिकृत आकडेवारीच या सरकारी कार्यालयांकडे नसल्याचे धक्कादायक वास्तव या निमित्ताने उजेडात आले आहे. आदिवासी मजुरांचे रोज शेकडोंच्या संख्येने सर्वाधिक स्थलांतर शेजारच्या पालघर जिल्ह्यातून सूरु आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा हे पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्यातीलच असूनही मागच्याच वर्षीचे स्थलांतराचे चित्र या वर्षी देखील येथे कायम आहे. गेल्या काही वर्षात महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना व २०१५ मध्ये राबविली जात असलेली जलशिवार योजना ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात पुरत्या अपयशी ठरल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकारी धोरण असूनही आदिवासी मजूरांना राहत्या गावांतच हाताला काम उरलेले नसून स्थलांतर रोखण्यासाठीच्या सरकारी उपाय योजना फक्त कागदावरच आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे. अशा मुलांचा शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून स्थलांतराच्या ठिकाणी शाळेत समावेश करण्याची शासन योजना असली तरी मागील काही वर्षांचा इतिहास पाहता शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच आहेत. आदिवासी आश्रमशाळा व जिल्हा परिषद शिक्षण विभागाची शाळाबाह्य विद्यार्थ्यासाठीची मोहीम अक्षरश: तकलादु ठरत आहे.