शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

सफाळ्यात वाचकांसाठी १५ हजार पुस्तकांचा खजिना, ८ ते १८ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:14 IST

सोशल मीडिया, टीव्हीच्या जंजाळात अडकून वाचन संस्कृती लयास जात आहे. त्यामुळे ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सफाळे येथील प्रगती प्रतिष्ठानने १५ हजार पुस्तकांचा खजिना वाचकासाठी खुला केला असून त्याचे उद्घाटन प्रविण राऊत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

पालघर : सोशल मीडिया, टीव्हीच्या जंजाळात अडकून वाचन संस्कृती लयास जात आहे. त्यामुळे ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सफाळे येथील प्रगती प्रतिष्ठानने १५ हजार पुस्तकांचा खजिना वाचकासाठी खुला केला असून त्याचे उद्घाटन प्रविण राऊत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.मनोविकास बुक सेंटर आणि प्रगती प्रतिष्ठान, सफाळे यांच्या विद्यमाने सफाळ्यातील देवभूमी सभागृहात ८ ते १८ नोव्हेंबरपर्यंत भव्य स्वरूपात पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी जेष्ठ पत्रकार समीर मणियार, उपसरपंच राजेश उर्फ बंटी म्हात्रे, शिक्षण संस्थेचे कांतीलाल दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या चक्र व्यूहात शैक्षणिक पातळी घसरू लागली असून ब्लू व्हेल सारख्या सोशल मीडिया वरील गेममुळे अनेक तरु ण आत्महत्येचे टोक गाठू लागले आहेत. गावागावातील, शाळातील लायब्ररी ओस पडू लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी ह्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील मान्यवर लेखकांची सुमारे १५ हजार पुस्तके असलेले भव्य प्रदर्शनाचा स्तुत्य उपक्रम सफाळ्यात राबविला जात आहे.मनोविकास, मेहता, राजहंस, रोहन, ज्योत्स्ना, नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, आदी नावाजलेल्या प्रकाशकांची अनेक पुस्तके प्रदर्शन सकाळी १० ते ९ ह्या वेळेत उपलब्ध होणार असल्याचे उन्मेष कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार