शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार; वर्षभरापासून पगार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:56 IST

बुधवारी पहाटेपासून कर्मचाऱ्यांनी पुकारला संप; वाहतुकीवर फार परिणाम नाही

नालासोपारा : वर्षभरापासून पगार मिळाला नसल्याने वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या चालक आणि वाहकांनी बुधवारी पहाटे ५ वाजल्यापासून संप पुकारला. परिवहन विभागातील तीनही संघटनांतील ९०० कामगारांनी एकत्र येऊन हा संप पुकारत सर्व बसेस बंद ठेवल्याने एकही बस वसई तालुक्यात रस्त्यावर धावली नाही.

महानगरपालिकेने परिवहन विभागातील हिरव्या पिवळ्या बसेस हद्दीत चालवण्यासाठीचे कंत्राट भागीरथी ट्रान्सपोर्टला दिले आहे. परिवहनकडे १६० बसेसचा ताफा असून १४० बसेस शहरात चालवल्या जातात. यावर काम करणारे ९०० चालक आणि वाहक यांना वर्षभरापासून कंत्राटदाराने पगार दिलेला नाही. पीएफचे पैसे अजून जमा केलेले नाही, सहा महिन्याला ५०० रुपये प्रमाणे वाढणारा पगार तीन वर्षांपासून वाढलेलाच नाही, अशा अनेक कारणांवरून कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलन करत संपाचे हत्यार उपसले. याआधी दोन वेळा संप पुकारला होता पण आयुक्त आणि कंत्राटदार यांनी आश्वासन दिल्यावर संप मागे घेतला होता. यावेळी मात्र, सर्व कामगारांनी जोपर्यंत पगार खात्यात किंवा हातात मिळत नाही तोपर्यंत संप मिटवणार नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले आहे.

वसई पश्चिमेकडील डेपोमध्ये हे कामगार आंदोलन करत असून मध्यस्थी करण्यासाठी भागीरथी ट्रान्सपोर्टचे संचालक मनोहर सकपाळ आले होते. ते एका कामगाराला जोरात बोलल्याने सर्व कर्मचारी त्यांच्यावर भडकले. आणि सकपाळ यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. याबाबत सकपाळ यांना संपर्क केला तर त्यांनी फोन उचलला नाही.परिवहनच्या कामगारांनी पगार जास्त मिळावा म्हणून संप पुकारला आहे. यामुळे परिवहन सेवेच्या बसेस बंद आहे. कंत्राटदार आणि कामगारांमधील हा वाद आहे. त्यांचे पगार महानगरपालिका देत नसून कंत्राटदार देतो. संपामुळे महानगरपालिकेचे नुकसान झाले नसून त्या कंत्राटदारांचे झाले आहे. - प्रितेश पाटील, सभापती, परिवहन विभाग, वसई विरार महानगरपालिकावर्षभरापासून पगार नाही, पीएफ नाही, सहा महिन्याला होणारी इन्क्रीमेंट ३ वर्षांपासून थकीत, सोसायटीमधून लोन देणार म्हणून सोसायटी बनवली पण लोनसुद्धा वेळेवर नाही यामुळे सर्व नाराज चालक आणि वाहक ९०० कामगारांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत पगार खात्यात किंवा हातात मिळत नाही तोपर्यंत संप मिटणार नाही. - सोमनाथ गायकवाड, चालक

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार