शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

परिवहन व्हेंटिलेटरवर

By admin | Updated: August 6, 2015 23:28 IST

पालिकेने २०१० मध्ये खाजगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा व्हेंटिलेटरवर असल्याने प्रशासन नवीन

भार्इंदर : पालिकेने २०१० मध्ये खाजगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा व्हेंटिलेटरवर असल्याने प्रशासन नवीन ठेकेदाराच्या शोधात आहे. तर, विद्यमान ठेकेदाराने पालिकेकडेच ४२ कोटी थकीत बाकी असल्याचा दावा केला आहे.पालिकेने २००५ मध्ये कंत्राटी पद्धतीवर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा सततच्या तोट्यामुळे बंद करून ९ आॅक्टोबर २०१० रोजी रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न देणारी पीपीपी तत्त्वावरील सेवा सुरू केली. पूर्वीचे कंत्राट राजकीय हितसंबंधातील व्यक्तींना देण्यात आल्यानंतर नवीन ठेका उल्हासनगरमधील केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला दिल्याने करारात नमूद केल्याप्रमाणे परिवहन सेवेच्या आगाराची जागा राजकीय उदासीनतेत अद्याप अडकलेलीच आहे. नवीन सेवेच्या मागणीनुसार २५० बसपैकी पहिल्या टप्प्यात ५० बस पालिकेला देण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १०० बस येण्याच्या मार्गावर आहेत. एकूण १०२ बसवर सुरू करण्यात आलेल्या सेवेतील ५० मुदतबाह्य ठरलेल्या बस ठेकेदाराने मे २०१२ मध्ये भंगारात विकल्या. उर्वरित बस दोन वर्षांनंतरच तांत्रिक अडचणीत अडकू लागल्याने प्रशासनासह बस कंपनीने वॉरंटी मुदतीतही बसच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे सुमारे २० ते २५ बस विनाचाकाच्या दयनीय अवस्थेत रस्त्यावरच उभ्या असून उर्वरित २५ ते ३० बस सध्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत आहेत. त्यातीलही अनेक बस योग्य दुरुस्तीअभावी रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याने त्रस्त प्रवाशांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या बोरिवली व ठाणे यासारख्या लांब पल्ल्यांचे मार्गही ठेकेदाराने बंद केल्याने सुमारे ४५० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना नारळ देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ठेकेदाराने पालिकेला देय असलेली सुमारे ७० ते ८० लाखांची रॉयल्टी थकविल्यासह असमाधानकारक सेवा देणाऱ्या ठेकेदाराला नारळ देण्यासाठी प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. याउलट, ठेकेदाराने पालिकेकडेच ४२ कोटी थकीत असल्याचा दावा केला आहे. याबाबत, परिवहन सेवेच्या अधिकारी कल्पिता वडे-पिंपळे यांनी सांगितले की, ठेकेदाराचा दावा तपासून नवीन सेवा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने लवादाची स्थापना केली आहे. तर, ठेकेदार कंपनीचे संचालक राजा गेमनानी यांनी सांगितले की, अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार सुरू असून कंपनीची थकीत रक्कम मिळण्यासाठी लवादाकडे पाठपुरावा सुरू आहे. (प्रतिनिधी)