शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

परिवहन व्हेंटिलेटरवर

By admin | Updated: August 6, 2015 23:28 IST

पालिकेने २०१० मध्ये खाजगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा व्हेंटिलेटरवर असल्याने प्रशासन नवीन

भार्इंदर : पालिकेने २०१० मध्ये खाजगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा व्हेंटिलेटरवर असल्याने प्रशासन नवीन ठेकेदाराच्या शोधात आहे. तर, विद्यमान ठेकेदाराने पालिकेकडेच ४२ कोटी थकीत बाकी असल्याचा दावा केला आहे.पालिकेने २००५ मध्ये कंत्राटी पद्धतीवर सुरू केलेली स्थानिक परिवहन सेवा सततच्या तोट्यामुळे बंद करून ९ आॅक्टोबर २०१० रोजी रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न देणारी पीपीपी तत्त्वावरील सेवा सुरू केली. पूर्वीचे कंत्राट राजकीय हितसंबंधातील व्यक्तींना देण्यात आल्यानंतर नवीन ठेका उल्हासनगरमधील केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला दिल्याने करारात नमूद केल्याप्रमाणे परिवहन सेवेच्या आगाराची जागा राजकीय उदासीनतेत अद्याप अडकलेलीच आहे. नवीन सेवेच्या मागणीनुसार २५० बसपैकी पहिल्या टप्प्यात ५० बस पालिकेला देण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १०० बस येण्याच्या मार्गावर आहेत. एकूण १०२ बसवर सुरू करण्यात आलेल्या सेवेतील ५० मुदतबाह्य ठरलेल्या बस ठेकेदाराने मे २०१२ मध्ये भंगारात विकल्या. उर्वरित बस दोन वर्षांनंतरच तांत्रिक अडचणीत अडकू लागल्याने प्रशासनासह बस कंपनीने वॉरंटी मुदतीतही बसच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे सुमारे २० ते २५ बस विनाचाकाच्या दयनीय अवस्थेत रस्त्यावरच उभ्या असून उर्वरित २५ ते ३० बस सध्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत आहेत. त्यातीलही अनेक बस योग्य दुरुस्तीअभावी रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याने त्रस्त प्रवाशांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या बोरिवली व ठाणे यासारख्या लांब पल्ल्यांचे मार्गही ठेकेदाराने बंद केल्याने सुमारे ४५० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना नारळ देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ठेकेदाराने पालिकेला देय असलेली सुमारे ७० ते ८० लाखांची रॉयल्टी थकविल्यासह असमाधानकारक सेवा देणाऱ्या ठेकेदाराला नारळ देण्यासाठी प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. याउलट, ठेकेदाराने पालिकेकडेच ४२ कोटी थकीत असल्याचा दावा केला आहे. याबाबत, परिवहन सेवेच्या अधिकारी कल्पिता वडे-पिंपळे यांनी सांगितले की, ठेकेदाराचा दावा तपासून नवीन सेवा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने लवादाची स्थापना केली आहे. तर, ठेकेदार कंपनीचे संचालक राजा गेमनानी यांनी सांगितले की, अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार सुरू असून कंपनीची थकीत रक्कम मिळण्यासाठी लवादाकडे पाठपुरावा सुरू आहे. (प्रतिनिधी)