शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

अभिहस्तांतरण योजना कागदावरच

By admin | Updated: August 28, 2015 00:10 IST

गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या. परंतु, यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना

वसई : गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या. परंतु, यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनी नावावर करणे शक्य झाले नाही. वसई-विरार परिसरात हजारो इमारतींचे अभिहस्तांतरण अद्याप प्रलंबित आहे. अनेक खाजगी कंपन्यांनी मात्र याकामी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. अव्वाच्या सव्वा दराने ही कामे या खाजगी कंपन्या करीत आहेत.राज्य शासनाने ४ वर्षांपूर्वी अभिहस्तांतरण प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार अधिसूचनाही जारी केली. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले, परंतु या कामाला वेग येऊ शकला नाही. अभिहस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्यामुळे खाजगी कंपन्यांनी त्याचा फायदा घेतला. शासनाच्या धोरणानुसार हे अभिहस्तांतरण गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारी समित्या सहजरीत्या करू शकतील, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांनी खाजगी कंपन्यांकडे काम दिले. खाजगी कंपन्यांनीही गृहनिर्माण संस्थांना प्रक्रिया क्लिष्ट असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पदरमोड करावी लागेल, असे सांगून वारेमाप पैसा गोळा केला. (प्रतिनिधी)