शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

अभिहस्तांतरण योजना कागदावरच

By admin | Updated: August 28, 2015 00:10 IST

गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या. परंतु, यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना

वसई : गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या. परंतु, यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना आपल्या जमिनी नावावर करणे शक्य झाले नाही. वसई-विरार परिसरात हजारो इमारतींचे अभिहस्तांतरण अद्याप प्रलंबित आहे. अनेक खाजगी कंपन्यांनी मात्र याकामी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. अव्वाच्या सव्वा दराने ही कामे या खाजगी कंपन्या करीत आहेत.राज्य शासनाने ४ वर्षांपूर्वी अभिहस्तांतरण प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार अधिसूचनाही जारी केली. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले, परंतु या कामाला वेग येऊ शकला नाही. अभिहस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्यामुळे खाजगी कंपन्यांनी त्याचा फायदा घेतला. शासनाच्या धोरणानुसार हे अभिहस्तांतरण गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारी समित्या सहजरीत्या करू शकतील, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांनी खाजगी कंपन्यांकडे काम दिले. खाजगी कंपन्यांनीही गृहनिर्माण संस्थांना प्रक्रिया क्लिष्ट असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पदरमोड करावी लागेल, असे सांगून वारेमाप पैसा गोळा केला. (प्रतिनिधी)