शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

पिंजाळी नदीच्या पुलावरून पावसाळ्यापूर्वीच वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 03:36 IST

गतवर्षी महापुरात वाहून गेला होता पूल : ५० दिवसांत पूर्ण केले काम

विक्रमगड : गेल्या वर्षी ४ आॅगस्टच्या मुसळधार पावसामुळे पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात मलवाडा येथील या नदीवरील निम्मा पूल वाहून गेला होता. तेथे तात्पुरता माती भराव टाकून वाहतूक सुरू केली होती. मात्र, हा भराव पावसात वाहून जाऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती होती. प्रशासनाने हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्याने या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. या पुलाचे २५० फूट नवीन बांधकाम अवघ्या ५० दिवसांत पूर्ण करण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.

वाडा-मलवाडा-जव्हार या राज्य मार्गावरील हा पूल वाहून गेल्यामुळे या परिसरातील १५ ते २० गावांचा विक्र मगड-वाडा तालुक्यांशी संपर्कतुटला होता. यामध्ये शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांचे हाल होत असल्याने तुटलेल्या भागात मातीचा भराव टाकून वाहतूक सुरू केली. मात्र, त्यानंतर चार महिले उलटूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षकेले होते.

पुलाचा माती भराव काढून या ठिकाणी नव्याने अधिक गाळे वाढवून पुलाची लांबी वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या तुटलेल्या पुलाची लांबी वाढवण्यासाठी १० मीटरचे ७ गाळे व १० मीटर संरक्षक भिंत असे एकूण २५० फुटांचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी ३७ लाखांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांनी एप्रिल २०२० मध्ये काढली होती. या कामाचा ठेका विक्रमगड येथील मे.जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रा. लिमिटेड या कंपनीने घेऊन अवघ्या ५० दिवसांत या पुलाचे काम पूर्ण केले.