शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

पिंजाळी नदीच्या पुलावरून पावसाळ्यापूर्वीच वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 03:36 IST

गतवर्षी महापुरात वाहून गेला होता पूल : ५० दिवसांत पूर्ण केले काम

विक्रमगड : गेल्या वर्षी ४ आॅगस्टच्या मुसळधार पावसामुळे पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात मलवाडा येथील या नदीवरील निम्मा पूल वाहून गेला होता. तेथे तात्पुरता माती भराव टाकून वाहतूक सुरू केली होती. मात्र, हा भराव पावसात वाहून जाऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती होती. प्रशासनाने हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्याने या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. या पुलाचे २५० फूट नवीन बांधकाम अवघ्या ५० दिवसांत पूर्ण करण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.

वाडा-मलवाडा-जव्हार या राज्य मार्गावरील हा पूल वाहून गेल्यामुळे या परिसरातील १५ ते २० गावांचा विक्र मगड-वाडा तालुक्यांशी संपर्कतुटला होता. यामध्ये शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांचे हाल होत असल्याने तुटलेल्या भागात मातीचा भराव टाकून वाहतूक सुरू केली. मात्र, त्यानंतर चार महिले उलटूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षकेले होते.

पुलाचा माती भराव काढून या ठिकाणी नव्याने अधिक गाळे वाढवून पुलाची लांबी वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या तुटलेल्या पुलाची लांबी वाढवण्यासाठी १० मीटरचे ७ गाळे व १० मीटर संरक्षक भिंत असे एकूण २५० फुटांचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी ३७ लाखांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांनी एप्रिल २०२० मध्ये काढली होती. या कामाचा ठेका विक्रमगड येथील मे.जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रा. लिमिटेड या कंपनीने घेऊन अवघ्या ५० दिवसांत या पुलाचे काम पूर्ण केले.