शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोनाकाळात वाहतूक नियम धाब्यावर; रिक्षात प्रवाशांची कोंबाकोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:53 IST

सार्वजनिक प्रवासी साधने अपुरी

विरार : वसई-विरारमधील सार्वजनिक प्रवासी सेवा हळूहळू रुळावर येत असली तरी ती अद्याप अपुरी आहे. त्यामुळे वसईकर मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. मात्र दाटीवाटीने होणाऱ्या प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका आहे. सध्या वसईत रिक्षामधून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे. हा प्रकार म्हणजे कोरोनावाढीला हातभार असून यावर वाहतूक विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

वसईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा १६ हजारांच्या पुढे गेला आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या ३४५ झालेली आहे. कोविडच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत. तसेच टाळेबंदी शिथिल करताना खाजगी वाहतूक, आस्थापने यांना व्यवसायासाठी सूट देण्यात आली असतानादेखील येथे सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात आहेत.

रिक्षात केवळ दोनच प्रवाशांना नेण्याची मुभा रिक्षाचालकांना आहे, तर प्रवासी वाहनांमध्येही नियमांचे बंधन आहे. परंतु कमाईसाठी रिक्षाचालक दोन-तीन नव्हे तर चार-पाच प्रवासी रिक्षात भरून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसते. सध्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक साधने अपुरी असल्याने नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अशा वेळी रिक्षाचालकही प्रवाशांच्या असहायतेचा फायदा घेत रिक्षा पूर्ण भरल्याशिवाय निघत नाहीत.कारवाईची होतेय मागणीवसई शहरात प्रवाशांना कोंबून नेणाºया रिक्षाचालकांकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अशा रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी ते करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या