शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

तलासरी, डहाणूला पुन्हा भूकंपाचे धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:54 IST

ऐन पावसाळ्यात पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे.

- सुरेश काटे तलासरी : ऐन पावसाळ्यात पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. शनिवारी रात्री १०.५२च्या सुमारास तलासरी आणि डहाणू परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी ‘लोकमत’ला दिली.गेल्या बुधवारीच (१० जुलै) येथे २.६ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली होती. सततच्या धक्क्यांमुळे तलासरी तालुक्यातील ७५ जिल्हा परिषद शाळा व ५२ अंगणवाड्या, तसेच अनेक घरांच्या भिंतींना तडे जाऊन त्या धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत.भूकंपाचे धक्के बसू लागल्यानंतर प्रशासनाने डहाणू, तलासरी तालुक्याच्या काही भागांत तंबू टाकून दिले. मात्र, लोकसंख्येच्या मानाने ते अपुरे पडले. त्याचप्रमाणे, भूकंपाच्या धक्क्यांनी येथील शाळा व अंगणवाड्या धोकादायक बनल्याचा अहवाल महसूल विभागाने दिल्यानंतर, प्रशासनाने त्यांना ताडपत्र्या पुरविल्या व तंबू उभारण्याच्या सूचना केल्या, परंतु प्रत्यक्षात तंबू उभारण्यात आले आहेत का? याची पाहणीच न केल्याने ताडपत्र्या अडगळीत पडल्या आहेत. त्यामुळे हजारो आदिवासी मुलांना धोकादायक शाळा अंगणवाड्यांत जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे.दरम्यान, या प्रकाराची माहिती घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तर शाळांना ताडपत्र्या पुरवून तंबू बांधण्याच्या सूचना करण्यात आल्याचे तलासरीचे गट शिक्षण अधिकारी सदानंद जनाथे यांनी सांगितले.>ग्रामपंचायतींना पत्र लिहून तंबू बांधून देण्याबाबत कळविले आहे, पण ते दखल घेत नसल्याने ताडपत्र्या अंगणवाड्यांत पडून आहेत. अंगणवाड्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविले आहेत.- आनंद जाधव, प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प, तलासरी.