शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

तलासरी, डहाणूला पुन्हा भूकंपाचे धक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:54 IST

ऐन पावसाळ्यात पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे.

- सुरेश काटे तलासरी : ऐन पावसाळ्यात पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. शनिवारी रात्री १०.५२च्या सुमारास तलासरी आणि डहाणू परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी ‘लोकमत’ला दिली.गेल्या बुधवारीच (१० जुलै) येथे २.६ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली होती. सततच्या धक्क्यांमुळे तलासरी तालुक्यातील ७५ जिल्हा परिषद शाळा व ५२ अंगणवाड्या, तसेच अनेक घरांच्या भिंतींना तडे जाऊन त्या धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत.भूकंपाचे धक्के बसू लागल्यानंतर प्रशासनाने डहाणू, तलासरी तालुक्याच्या काही भागांत तंबू टाकून दिले. मात्र, लोकसंख्येच्या मानाने ते अपुरे पडले. त्याचप्रमाणे, भूकंपाच्या धक्क्यांनी येथील शाळा व अंगणवाड्या धोकादायक बनल्याचा अहवाल महसूल विभागाने दिल्यानंतर, प्रशासनाने त्यांना ताडपत्र्या पुरविल्या व तंबू उभारण्याच्या सूचना केल्या, परंतु प्रत्यक्षात तंबू उभारण्यात आले आहेत का? याची पाहणीच न केल्याने ताडपत्र्या अडगळीत पडल्या आहेत. त्यामुळे हजारो आदिवासी मुलांना धोकादायक शाळा अंगणवाड्यांत जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे.दरम्यान, या प्रकाराची माहिती घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तर शाळांना ताडपत्र्या पुरवून तंबू बांधण्याच्या सूचना करण्यात आल्याचे तलासरीचे गट शिक्षण अधिकारी सदानंद जनाथे यांनी सांगितले.>ग्रामपंचायतींना पत्र लिहून तंबू बांधून देण्याबाबत कळविले आहे, पण ते दखल घेत नसल्याने ताडपत्र्या अंगणवाड्यांत पडून आहेत. अंगणवाड्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविले आहेत.- आनंद जाधव, प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प, तलासरी.