शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

निंबवलीतील गरम कुंडांना पर्यटनाचा दर्जा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:49 IST

वाडा तालुक्यातील निंबवली येथे गरम पाण्याचे झरे ( कुंडे ) असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मात्र येथे कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.

वसंत भोईरवाडा : तालुक्यातील निंबवली येथे गरम पाण्याचे झरे ( कुंडे ) असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मात्र येथे कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन या झ-यांचे, कुंडांचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. श्री क्षेत्र अकलोली, वज्रेश्वरी व गणेशपुरी येथे जगप्रसिद्ध गरम पाण्याचे झरे (कुंडे) असून श्री नित्यानंद महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. तर श्री रेणुका, वज्रेश्वरी व कालिका देविंचे येथे प्रसिद्ध मंदिर आहे. त्यामुळे नित्यानंद बाबा व देवता यांचे देश विदेशातील भक्तगण येथे येत असतात. त्यामुळे भाविकांची येथे प्रचंड गर्दी असते. या क्षेत्राला लागूनच निंबवली हे छोटेसे खेडेगाव असून या गावातही गरम पाण्याचे झरे आहेत. या कुंडावर अंघोळ करण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येतात. यातील एक कुंड अति गरम तर दोन कुंडे सौम्य स्वरूपाची आहेत. अशी तीन कुंडे येथे आहेत. कुंडाचे पाणी हे गंधकमिश्रीत असल्याने त्यात अंघोळ केल्याने अनेक रोग व्याधी ब-या होतात . त्यामुळे अनेक रोगबाधित रूग्ण आवर्जून येथे अंघोळीसाठी येऊन रोगमुक्त होत असतात. तसेच जगभरात कुठेही भूकंप झाला तर या कुंडातील पाण्याची पातळी वाढते व ती अति गरम होतात किंवा भूकंप होण्याअगोदरही येथे बदल जाणवत असतो. असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.येथे तीन कुंडे असून ती जशी पूर्वी आहेत तशीच आजही आहेत. महिलांसाठी असलेल्या कुंडासभोवत एका दानशूर व्यक्तीने पत्र्याचा निवारा उभारला आहे बाकी कुंडे पूर्वीपासून आहेत तशीच आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळाचा दर्जा या गावाला दिल्यास विशेष निधी येऊन कुंडांचे सुशोभिकरण होईल व पर्यटक वाढतील अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.