शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

निंबवलीतील गरम कुंडांना पर्यटनाचा दर्जा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:49 IST

वाडा तालुक्यातील निंबवली येथे गरम पाण्याचे झरे ( कुंडे ) असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मात्र येथे कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.

वसंत भोईरवाडा : तालुक्यातील निंबवली येथे गरम पाण्याचे झरे ( कुंडे ) असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मात्र येथे कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन या झ-यांचे, कुंडांचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. श्री क्षेत्र अकलोली, वज्रेश्वरी व गणेशपुरी येथे जगप्रसिद्ध गरम पाण्याचे झरे (कुंडे) असून श्री नित्यानंद महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. तर श्री रेणुका, वज्रेश्वरी व कालिका देविंचे येथे प्रसिद्ध मंदिर आहे. त्यामुळे नित्यानंद बाबा व देवता यांचे देश विदेशातील भक्तगण येथे येत असतात. त्यामुळे भाविकांची येथे प्रचंड गर्दी असते. या क्षेत्राला लागूनच निंबवली हे छोटेसे खेडेगाव असून या गावातही गरम पाण्याचे झरे आहेत. या कुंडावर अंघोळ करण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येतात. यातील एक कुंड अति गरम तर दोन कुंडे सौम्य स्वरूपाची आहेत. अशी तीन कुंडे येथे आहेत. कुंडाचे पाणी हे गंधकमिश्रीत असल्याने त्यात अंघोळ केल्याने अनेक रोग व्याधी ब-या होतात . त्यामुळे अनेक रोगबाधित रूग्ण आवर्जून येथे अंघोळीसाठी येऊन रोगमुक्त होत असतात. तसेच जगभरात कुठेही भूकंप झाला तर या कुंडातील पाण्याची पातळी वाढते व ती अति गरम होतात किंवा भूकंप होण्याअगोदरही येथे बदल जाणवत असतो. असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.येथे तीन कुंडे असून ती जशी पूर्वी आहेत तशीच आजही आहेत. महिलांसाठी असलेल्या कुंडासभोवत एका दानशूर व्यक्तीने पत्र्याचा निवारा उभारला आहे बाकी कुंडे पूर्वीपासून आहेत तशीच आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळाचा दर्जा या गावाला दिल्यास विशेष निधी येऊन कुंडांचे सुशोभिकरण होईल व पर्यटक वाढतील अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.