शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्यासाठी उद्यापासून बेमुदत उपोषण, पर्यावरण संवर्धन समितीचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:53 IST

तरीही वसई उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे हे कारवाई करत नसल्याने उपोषण केले जाणार आहे.

वसई : भुईगाव समुद्र किनाऱ्यावर पाणथळ जमिनीवरील बेकायदा अतिक्र मण प्रकरणी पर्यावरण संर्वधन समिती लढा देत असताना याआधीच या प्रकरणी उच्च न्यायालयानेही वसई महसूल विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही वसई उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे हे कारवाई करत नसल्याने उपोषण केले जाणार आहे.

दरम्यान, वसईच्या पर्यावरण संर्वधन समितीच्या शिष्टमंडळाला मागील आठवड्यात वसई प्रांताधिकारी तांगडे यांनी चर्चेत सहभागी होऊन बेमुदत उपोषण मागे घेण्यासाठी पोलीस, महापालिका, महावितरण आणि वसई महसूल आदी विभागांना बोलावून ही कारवाई महापालिका प्रशासनाने करणे आवश्यक असून यासाठी पोलीस यंत्रणेने त्यासाठी आवश्यक बंदोबस्त देण्याकरिता एक बैठक घेतली होती. मात्र तांगडे यांनी घेतलेली ही बैठक केवळ दिखाऊपणा होता असे कळते. त्यामुळे सपशेल या सर्व यंत्रणांनी वसई प्रांतांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

या संदर्भात समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पाणथळ जमीन व तिवरांचे संवर्धन करण्यासाठी वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यात न्यायालयाने ११ जुलै २०१६ रोजी शासनाला वसईतील भुईगाव खारटनातील तिवरांची तोड करून पाणथळ जागेत बेकयदा कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी उभारल्या आहेत का? आणि असल्यास याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. यानुसार १८ जुलै २०१६ रोजी सरकारी वकील व तत्कालीन वसई प्रांत दादाराव दातकर यांनी या ठिकाणी तिवरांची तोड करून पाणथळ जागेत बेकायदा कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी उभारल्याचे मान्य केले.दरम्यान याबाबत संबंधितांना नोटिसा बजावून गुन्हेही दाखल केल्याचे उच्च न्यायालयास सांगितले.

परिणामी न्यायालयाने २५ जुलै २०१६ पर्यंत बेकायदा कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी जमीनदोस्त करून पाणथळ जागेचे संवर्धन करण्याचे आदेश तर दिले आणि तसे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करण्यास सांगितले. मात्र मागील ३ वर्षांपासून वसईतील पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना आदी सातत्याने या पाणथळ जागेवरील अतिक्र मण व कोळंबी प्रकल्पाबाबतीत पाठपुरावा करीत आहेत. परंतु ३ वर्षे उलटूनही न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेले नाही.जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीजोपर्यंत पाणथळ जमिनीवर आणि या बेकायदा अतिक्र मणांवर कारवाई करून संबंधित गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत शासकीय अधिकाºयांच्या बेजबाबदार धोरणा विरोधात सोमवारपासून वसई तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी समिती बसणार असल्याचे समीर वर्तक यांनी सांगितले. आंदोलन प्रसंगी कार्यकरर्त्यांच्या जीवितास कुठल्याही परिस्थितीत काही बरेवाईट घडल्यास त्याला वसई- विरार महापालिका आणि महसूल प्रशासन जबाबदार असेल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार