शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

अतिक्रमण हटविण्यासाठी उद्यापासून बेमुदत उपोषण, पर्यावरण संवर्धन समितीचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:53 IST

तरीही वसई उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे हे कारवाई करत नसल्याने उपोषण केले जाणार आहे.

वसई : भुईगाव समुद्र किनाऱ्यावर पाणथळ जमिनीवरील बेकायदा अतिक्र मण प्रकरणी पर्यावरण संर्वधन समिती लढा देत असताना याआधीच या प्रकरणी उच्च न्यायालयानेही वसई महसूल विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही वसई उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे हे कारवाई करत नसल्याने उपोषण केले जाणार आहे.

दरम्यान, वसईच्या पर्यावरण संर्वधन समितीच्या शिष्टमंडळाला मागील आठवड्यात वसई प्रांताधिकारी तांगडे यांनी चर्चेत सहभागी होऊन बेमुदत उपोषण मागे घेण्यासाठी पोलीस, महापालिका, महावितरण आणि वसई महसूल आदी विभागांना बोलावून ही कारवाई महापालिका प्रशासनाने करणे आवश्यक असून यासाठी पोलीस यंत्रणेने त्यासाठी आवश्यक बंदोबस्त देण्याकरिता एक बैठक घेतली होती. मात्र तांगडे यांनी घेतलेली ही बैठक केवळ दिखाऊपणा होता असे कळते. त्यामुळे सपशेल या सर्व यंत्रणांनी वसई प्रांतांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

या संदर्भात समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पाणथळ जमीन व तिवरांचे संवर्धन करण्यासाठी वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यात न्यायालयाने ११ जुलै २०१६ रोजी शासनाला वसईतील भुईगाव खारटनातील तिवरांची तोड करून पाणथळ जागेत बेकयदा कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी उभारल्या आहेत का? आणि असल्यास याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. यानुसार १८ जुलै २०१६ रोजी सरकारी वकील व तत्कालीन वसई प्रांत दादाराव दातकर यांनी या ठिकाणी तिवरांची तोड करून पाणथळ जागेत बेकायदा कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी उभारल्याचे मान्य केले.दरम्यान याबाबत संबंधितांना नोटिसा बजावून गुन्हेही दाखल केल्याचे उच्च न्यायालयास सांगितले.

परिणामी न्यायालयाने २५ जुलै २०१६ पर्यंत बेकायदा कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी जमीनदोस्त करून पाणथळ जागेचे संवर्धन करण्याचे आदेश तर दिले आणि तसे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करण्यास सांगितले. मात्र मागील ३ वर्षांपासून वसईतील पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना आदी सातत्याने या पाणथळ जागेवरील अतिक्र मण व कोळंबी प्रकल्पाबाबतीत पाठपुरावा करीत आहेत. परंतु ३ वर्षे उलटूनही न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेले नाही.जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीजोपर्यंत पाणथळ जमिनीवर आणि या बेकायदा अतिक्र मणांवर कारवाई करून संबंधित गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत शासकीय अधिकाºयांच्या बेजबाबदार धोरणा विरोधात सोमवारपासून वसई तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी समिती बसणार असल्याचे समीर वर्तक यांनी सांगितले. आंदोलन प्रसंगी कार्यकरर्त्यांच्या जीवितास कुठल्याही परिस्थितीत काही बरेवाईट घडल्यास त्याला वसई- विरार महापालिका आणि महसूल प्रशासन जबाबदार असेल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार