शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

दहा विभक्त जोडपी आली एकत्र

By admin | Updated: February 14, 2015 04:55 IST

: विभक्त झालेल्या दहा जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला पुन्हा एकत्र नांदण्याचे ठरवल्याने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात त्यांचा सत्कार

मुंबई : विभक्त झालेल्या दहा जोडप्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येला पुन्हा एकत्र नांदण्याचे ठरवल्याने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेते भरत जाधव यांनी पत्नीसह उपस्थित राहून या दाम्पत्यांचे अभिनंदन केले.विविध कारणांनी मतभेद होऊन शेवटी विभक्त होण्याचा निर्णय काही दाम्पत्य घेतात. यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येतो. तेव्हा समुपदेशकांकडून या दाम्पत्यांना पुन:श्च विचार करण्याचा सल्ला देण्यात येतो. यातूनच या दहा दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतल्याने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने या सर्वांचे न्यायालयाकडून सत्काराद्वारे कौतुक करण्यात आले.‘विभक्त झालेली ही कुटुंबे आता पुन्हा नव्याने संसार सुरू करणार आहेत. यासाठी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आता सर्वांनीच जुन्या घटना, मतभेद विसरून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, असा सल्ला अभिनेता भरत जाधव यांनी यावेळी दिला. ‘चुका सर्वांकडून होत असतात. मात्र त्या चुका मान्य करून समोरच्यानेही माफ करण्यातच समाधान मिळते, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सुभाष कापरे यांनी या वेळी केले. ‘नो वॉर सिर्फ प्यार’ असे घोषवाक्य सर्वांनी लक्षात ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.‘पती-पत्नीत सलोखा असला पाहिजे. लग्नानंतर काही ना काही कारणाने वाद होतच असतात. मात्र या गोष्टी आपापसातच मिटवून गैरसमज दूर करणे महत्त्वाचे आहे. विभक्त होण्याचा निर्णय चुकीचाच असतो. कारण या सर्वांचा मुलांवर परिणाम होत असतो’, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मोरे यांनी केले. न्या. मोरे यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)