शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:24 IST

मच्छीमारांचा संताप : प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडणार

पालघर : उत्तन, वसई भागातील मच्छीमारांनी सागरी हद्दीत केलेले अतिक्र मण, पर्ससीन मच्छीमार बोटींची वाढती संख्या, मासळी मार्केट आदी सह अन्य प्रलंबित प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी सोमवारी (१४ जानेवारी) दमण ते दातीवरे मच्छिमार धंदा संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

किनारपट्टीवर रूढी-परंपरे प्रमाणे लवादाने दिलेल्या निर्णया प्रमाणे मासेमारी करण्याची परंपरा राखली जात होती.मात्र वसई,उत्तनच्या मच्छीमारांनी लवादाच्या निर्णयाला न जुमानता समुद्रात आपल्या कवींचे क्षेत्र विस्तारल्याने १९८० साली समुद्रात मोठा संघर्ष झाला होता. ह्या संघर्षांनंतर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मत्स्यव्यवसाय विभाग अयशस्वी ठरल्याने जिल्हाधिकाºयाने वसई,उत्तन च्या मच्छीमाराना त्यांच्या काही क्षेत्रातील कवीची खुंट काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या जिल्हाधिकाºयांच्या निर्णया विरोधात वसई आदी भागातील मच्छिमारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले असतानाही कवी खुंट मारण्याचे क्षेत्र आता दिव-जाफराबाद पर्यंत पसरवीत नेण्यात आले आहे. त्यामुळे पालघर, डहाणू, दिव-दमण, जाफराबाद भागातील मच्छीमारांचे मासेमारी क्षेत्र घटले आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनात घट होत त्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे वाढत जात ते मेटाकुटीला आले आहेत.

तसेच, पर्ससीन नेट मासेमारीला बंदी असताना आजही छुप्या पद्धतीने मासेमारी सुरू आहे, मच्छिमारांना मागील काही वर्षांपासून न मिळालेला कोट्यवधी रुपयांचा डिझेल परतावा मिळावा, मच्छीमारांच्या किनाºया लगतच्या घराच्या जमिनीचे सातबारे मिळण्यास होणारा विलंब तसेच मासे विक्र ी करणाºया महिलांना मासळी मार्केट साठी जागा उपलब्ध करून देणे आदी महत्वपूर्ण प्रशांच्या सोडवणुकी साठी सोमवारी सकाळी ११ वाजता मनोर चार रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.घरोघरी संपर्क महिलांचा सहभाग मोठाच्दमण ते दातीवरे मच्छिमार धंदा संरक्षण समिती चे अध्यक्ष अशोक अंभिरे, उपाध्यक्ष हितेश भाई मेस्त्री, सुभाष तामोरे, चिटणीस रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी दमण ते उंबरगाव, डहाणू ते दांडी, नवापूर ते सातपाटी, वडराई ते दातीवरे असे चार भाग विभागण्यात आले असून प्रत्येक विभागातील घराघरात पत्रके वाटून जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक घर आंदोलनात सहभागी होतील अशी व्यूहरचना केली आहे.