शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
3
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
4
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
5
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
6
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
7
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
8
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
9
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
10
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
11
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
12
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
13
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
14
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
15
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
16
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
17
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
18
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
20
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:24 IST

मच्छीमारांचा संताप : प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडणार

पालघर : उत्तन, वसई भागातील मच्छीमारांनी सागरी हद्दीत केलेले अतिक्र मण, पर्ससीन मच्छीमार बोटींची वाढती संख्या, मासळी मार्केट आदी सह अन्य प्रलंबित प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी सोमवारी (१४ जानेवारी) दमण ते दातीवरे मच्छिमार धंदा संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

किनारपट्टीवर रूढी-परंपरे प्रमाणे लवादाने दिलेल्या निर्णया प्रमाणे मासेमारी करण्याची परंपरा राखली जात होती.मात्र वसई,उत्तनच्या मच्छीमारांनी लवादाच्या निर्णयाला न जुमानता समुद्रात आपल्या कवींचे क्षेत्र विस्तारल्याने १९८० साली समुद्रात मोठा संघर्ष झाला होता. ह्या संघर्षांनंतर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मत्स्यव्यवसाय विभाग अयशस्वी ठरल्याने जिल्हाधिकाºयाने वसई,उत्तन च्या मच्छीमाराना त्यांच्या काही क्षेत्रातील कवीची खुंट काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या जिल्हाधिकाºयांच्या निर्णया विरोधात वसई आदी भागातील मच्छिमारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले असतानाही कवी खुंट मारण्याचे क्षेत्र आता दिव-जाफराबाद पर्यंत पसरवीत नेण्यात आले आहे. त्यामुळे पालघर, डहाणू, दिव-दमण, जाफराबाद भागातील मच्छीमारांचे मासेमारी क्षेत्र घटले आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनात घट होत त्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे वाढत जात ते मेटाकुटीला आले आहेत.

तसेच, पर्ससीन नेट मासेमारीला बंदी असताना आजही छुप्या पद्धतीने मासेमारी सुरू आहे, मच्छिमारांना मागील काही वर्षांपासून न मिळालेला कोट्यवधी रुपयांचा डिझेल परतावा मिळावा, मच्छीमारांच्या किनाºया लगतच्या घराच्या जमिनीचे सातबारे मिळण्यास होणारा विलंब तसेच मासे विक्र ी करणाºया महिलांना मासळी मार्केट साठी जागा उपलब्ध करून देणे आदी महत्वपूर्ण प्रशांच्या सोडवणुकी साठी सोमवारी सकाळी ११ वाजता मनोर चार रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.घरोघरी संपर्क महिलांचा सहभाग मोठाच्दमण ते दातीवरे मच्छिमार धंदा संरक्षण समिती चे अध्यक्ष अशोक अंभिरे, उपाध्यक्ष हितेश भाई मेस्त्री, सुभाष तामोरे, चिटणीस रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी दमण ते उंबरगाव, डहाणू ते दांडी, नवापूर ते सातपाटी, वडराई ते दातीवरे असे चार भाग विभागण्यात आले असून प्रत्येक विभागातील घराघरात पत्रके वाटून जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक घर आंदोलनात सहभागी होतील अशी व्यूहरचना केली आहे.