शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:24 IST

मच्छीमारांचा संताप : प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडणार

पालघर : उत्तन, वसई भागातील मच्छीमारांनी सागरी हद्दीत केलेले अतिक्र मण, पर्ससीन मच्छीमार बोटींची वाढती संख्या, मासळी मार्केट आदी सह अन्य प्रलंबित प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी सोमवारी (१४ जानेवारी) दमण ते दातीवरे मच्छिमार धंदा संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

किनारपट्टीवर रूढी-परंपरे प्रमाणे लवादाने दिलेल्या निर्णया प्रमाणे मासेमारी करण्याची परंपरा राखली जात होती.मात्र वसई,उत्तनच्या मच्छीमारांनी लवादाच्या निर्णयाला न जुमानता समुद्रात आपल्या कवींचे क्षेत्र विस्तारल्याने १९८० साली समुद्रात मोठा संघर्ष झाला होता. ह्या संघर्षांनंतर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास मत्स्यव्यवसाय विभाग अयशस्वी ठरल्याने जिल्हाधिकाºयाने वसई,उत्तन च्या मच्छीमाराना त्यांच्या काही क्षेत्रातील कवीची खुंट काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या जिल्हाधिकाºयांच्या निर्णया विरोधात वसई आदी भागातील मच्छिमारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले असतानाही कवी खुंट मारण्याचे क्षेत्र आता दिव-जाफराबाद पर्यंत पसरवीत नेण्यात आले आहे. त्यामुळे पालघर, डहाणू, दिव-दमण, जाफराबाद भागातील मच्छीमारांचे मासेमारी क्षेत्र घटले आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनात घट होत त्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे वाढत जात ते मेटाकुटीला आले आहेत.

तसेच, पर्ससीन नेट मासेमारीला बंदी असताना आजही छुप्या पद्धतीने मासेमारी सुरू आहे, मच्छिमारांना मागील काही वर्षांपासून न मिळालेला कोट्यवधी रुपयांचा डिझेल परतावा मिळावा, मच्छीमारांच्या किनाºया लगतच्या घराच्या जमिनीचे सातबारे मिळण्यास होणारा विलंब तसेच मासे विक्र ी करणाºया महिलांना मासळी मार्केट साठी जागा उपलब्ध करून देणे आदी महत्वपूर्ण प्रशांच्या सोडवणुकी साठी सोमवारी सकाळी ११ वाजता मनोर चार रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.घरोघरी संपर्क महिलांचा सहभाग मोठाच्दमण ते दातीवरे मच्छिमार धंदा संरक्षण समिती चे अध्यक्ष अशोक अंभिरे, उपाध्यक्ष हितेश भाई मेस्त्री, सुभाष तामोरे, चिटणीस रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी दमण ते उंबरगाव, डहाणू ते दांडी, नवापूर ते सातपाटी, वडराई ते दातीवरे असे चार भाग विभागण्यात आले असून प्रत्येक विभागातील घराघरात पत्रके वाटून जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक घर आंदोलनात सहभागी होतील अशी व्यूहरचना केली आहे.